शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

अवकाळी पावसाने वीट उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान

By admin | Updated: March 15, 2015 01:29 IST

विटांचा कच्चा माल भिजला; स्वामीत्वधनाची रक्कम माफ करण्याची मागणी.

चोहोट्टा बाजार (अकोला): शुक्रवार, १३ मार्च रोजी रात्री चोहोट्टा बाजार परिसरात पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांसह येथील वीट उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वीट उत्पादक पुन्हा संकटात सापडले आहेत.चोहोट्टा बाजार परिसरात सुमारे ३00 वीटभट्टय़ा आहेत. यावर्षी येथील वीट उत्पादकांनी लाखो रुपये खर्च करून भुसा, राख, भसवा व इतर साहित्याची खरेदी करून वीट निर्मिती सुरू केली. मजुरांनी विटांचा कच्चा माल तयार करून ठेवला. परंतु, यापूर्वी आलेल्या पावसाने अशा विटांच्या कच्च्या मालाचे लाखो रुपयांचे नुकसान केले होते. त्यानंतरही परिसरातील वीट उत्पादकांनी ती नुकसानी सोसूनही पुन्हा विटांचा कच्चा माल तयार केला होता. परंतु, शुक्रवारी रात्री पडलेल्या अवकाळी पावसाने विटांचा कच्चा माल भिजून वीट उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. यामुळे महसूल विभागाच्यावतीने वसूल करण्यात येणारी स्वामित्वधनाची (रॉयल्टी) रक्कम भरावी तरी कशी, या चिंतेने वीट उत्पादक हवालदिल झाले आहेत.शासनाने वीट उत्पादकांकडून वसूल केली जाणारी स्वामित्वधनाची रक्कम माफ करावी, अशी मागणी वीट उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र एखे तसेच बंडू राठी व अन्य वीट उत्पादकांनी त्यांच्या संघटनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे