शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

अकोटात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:44 IST

अकोट : शहर तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. तसेच शहरात आठवडी बाजारात आसपासच्या खेड्यांतील ...

अकोट : शहर तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. तसेच शहरात आठवडी बाजारात आसपासच्या खेड्यांतील ग्रामस्थांसह महिला मोठ्या संख्येने येतात. शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने नागरिकांसह महिलांची अडचण होत आहे. याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

अकोट बसस्थानक परिसरात खड्डेच खड्डे

अकोट : येथील बसस्थानक परिसरात खड्डेच खड्डे असल्याने एसटी चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. तसेच या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहकचालकांसह प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.

ढगाळ वातावरणामुळे तुरीचे पीक संकटात

पिंजर: गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तूर, हरभरा पिकावर परिणाम होत आहे. ढगाळ वातावरणात तुरीचा फुलोरा गळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. तसेच अळ्यांचा प्रादुर्भावसुद्धा वाढत आहे. याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात

बाळापूर : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बंद पडल्यामुळे रस्त्यावर खोदून ठेवलेले खड्डे तसेच कायम सोडून दिल्यामुळे अपघात वाढले आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्ढे बुजविण्याची मागणी होत आहे.

रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी

दहिहांडा : दहिहांडा ते दहिहांडा फाटापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. रस्त्यावरील गिट्टी व डांबर निघून गेल्यामुळे रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

बाळापूर शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य

बाळापूर : शहरात सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. नियमित स्वच्छता होत नाही. नाल्या तुंबल्या आहेत. याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. गावात स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पथदिवे बंद; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

निहिदा: गावातील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे अंधार पसरला आहे. रात्रीच्या वेळी बाहेर पडताना नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासकाने गावातील पथदिवे सुरू करण्याची मागणी होत आहे.

रस्त्यावरील धुळीमुळे पिकांचे नुकसान

चौहोट्टा बाजार : अकोला ते अकोट राज्यमार्गाचे काम रखडले असून, कंत्राटदाराने रस्ता खोदून ठेवल्यामुळे धूळ साचली आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावरील धूळ लगतच्या शेतांमधील पिकांवर उडत आहे. त्यामुळे कपाशी, तूर व हरभरा आदी पिकांचे नुकसान होत आहे.

पीकविम्यापासून शेतकरी वंचित

हातरुण : शेतकऱ्यांनी गतवर्षी पिकांचा विमा काढला. यंदासुद्धा मूग, उडीद, सोयाबीन आणि कपाशी पिकांचा विमा काढला. अतिवृष्टीमुळे यंदा मूग, उडीद व सोयाबीन पिकांचे मोेठे नुकसान झाले. परंतु, अद्यापपर्यंत परिसरातील शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळाली नाही.

नाल्या तुंबल्या, डासांचा प्रादुर्भाव वाढला

कुरूम : गावात अस्वच्छता आहे. नाल्या तुंबल्या असून, ठिकठिकाणी कचरा साचला आहे. नाल्यांमधील सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने नाल्यांची सफाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अवैध प्रवासी वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष

पातूर : तालुक्यातील गावांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक होत आहेे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनांमध्ये बसविण्यात येत आहेत. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.