शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

कामाच्या शोधात मजूर परप्रांतात

By admin | Updated: March 20, 2015 00:39 IST

लोणार तालुक्यातील गंधारी निर्मनुष्य होण्याच्या मार्गावर; रोहयो ठरतेय कुचकामी.

लोणार (बुलडाणा): रोहयोच्या कामांमधून मजूरांना रोजगार मिळत नसल्याने, मजुरांचे स्थलांतर वाढत आहे. यातूनच तालुक्यातील गंधारी या एकाच गावातील तब्बल १५00 पेक्षा जास्त मजूर रोजगारासाठी स्थलांतरीत झाल्याची माहिती असून, स्थलांतराची प्रक्रीया सुरूच असल्याने गाव निर्मनुष्य होण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यातील गंधारी हे ३ हजार लोकसंख्या असलेले गाव. येथील ७0 टक्के कुटुंबांचा उदरनिर्वाह मजुरीवरच चालतो. परंतु परिसरात हाताला काम मिळत नसल्याने या कुटुंबांना कामाच्या शोधात परप्रांतात धाव घ्यावी लागली. रोजगार हमी योजनेतील कामे जेसीबीसारख्या यंत्राने पूर्ण होत असल्याने ही योजना रोहयो मजुरांसाठी मृगजळ ठरत आहे. यावर्षी गावातील जवळपास १५00 ते १८00 मजूर आपल्या कुटुंबासह मुंबई, पुणे, नाशिक, पनवेल, सुरत, धुळे आदी ठिकाणी पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरीत झाली आहेत. गावातील बहुतांश कुटुंब मजुरीवर अवलंबून असल्याने त्यांच्यासाठी शासनाकडून कामे सुरू होणे गरजेचे आहे. २00७ साली मजुरीसाठी स्थलांतरित झालेल्या या गावातील १७ मजुरांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर गावकर्‍यांच्या हाताला गावातच काम उपलब्ध करून देण्याचा मुद्दा प्रशासन गांभीर्याने घेईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात काहीही फरक पडला नाही. गंधारी येथे वनविभागाकडून सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामावर १00 मजूर, रोहयोच्या सिंचन विहिरींच्या कामावर १0 मजूर व सामाजिक वनिकरण विभागाच्या वृक्षलागवडीच्या कामावर ८ मजूर कार्यरत आहेत. रोजगार हमी योजनेतून कामे सुरू झाल्यास मजुरांना परप्रांतात स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही.