शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

कामाच्या शोधात मजूर परप्रांतात

By admin | Updated: March 20, 2015 00:39 IST

लोणार तालुक्यातील गंधारी निर्मनुष्य होण्याच्या मार्गावर; रोहयो ठरतेय कुचकामी.

लोणार (बुलडाणा): रोहयोच्या कामांमधून मजूरांना रोजगार मिळत नसल्याने, मजुरांचे स्थलांतर वाढत आहे. यातूनच तालुक्यातील गंधारी या एकाच गावातील तब्बल १५00 पेक्षा जास्त मजूर रोजगारासाठी स्थलांतरीत झाल्याची माहिती असून, स्थलांतराची प्रक्रीया सुरूच असल्याने गाव निर्मनुष्य होण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यातील गंधारी हे ३ हजार लोकसंख्या असलेले गाव. येथील ७0 टक्के कुटुंबांचा उदरनिर्वाह मजुरीवरच चालतो. परंतु परिसरात हाताला काम मिळत नसल्याने या कुटुंबांना कामाच्या शोधात परप्रांतात धाव घ्यावी लागली. रोजगार हमी योजनेतील कामे जेसीबीसारख्या यंत्राने पूर्ण होत असल्याने ही योजना रोहयो मजुरांसाठी मृगजळ ठरत आहे. यावर्षी गावातील जवळपास १५00 ते १८00 मजूर आपल्या कुटुंबासह मुंबई, पुणे, नाशिक, पनवेल, सुरत, धुळे आदी ठिकाणी पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरीत झाली आहेत. गावातील बहुतांश कुटुंब मजुरीवर अवलंबून असल्याने त्यांच्यासाठी शासनाकडून कामे सुरू होणे गरजेचे आहे. २00७ साली मजुरीसाठी स्थलांतरित झालेल्या या गावातील १७ मजुरांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर गावकर्‍यांच्या हाताला गावातच काम उपलब्ध करून देण्याचा मुद्दा प्रशासन गांभीर्याने घेईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात काहीही फरक पडला नाही. गंधारी येथे वनविभागाकडून सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामावर १00 मजूर, रोहयोच्या सिंचन विहिरींच्या कामावर १0 मजूर व सामाजिक वनिकरण विभागाच्या वृक्षलागवडीच्या कामावर ८ मजूर कार्यरत आहेत. रोजगार हमी योजनेतून कामे सुरू झाल्यास मजुरांना परप्रांतात स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही.