शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

कोविडच्या दुसऱ्या लाटेचा रक्तसंकलनाला फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:13 IST

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम असल्याने यंदा रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्टोबर नंतर परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच फेब्रुवारीपासून ...

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम असल्याने यंदा रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्टोबर नंतर परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्ण वाढण्यास सुरूवात झाल्याने रक्तदान शिबिरे, सार्वजनिक कार्यक्रम आदींवर मर्यादा आल्या आहेत. परिणामी रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे कोरोना संकटाच्या काळात शासकीय रुग्णालयात नॉनकोविड रुग्णांची संख्या कमी असली तरी प्रसूती, अपघात आणि अत्यावश्यक शस्त्रक्रिया तसेच थॅलेसिमिया आणि सिकलसेल या रुग्णांना रक्ताची गरज भासतच आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रक्तदात्यांशी संपर्क करून किंवा नातेवाईकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करून रक्ताची गरज भागविली जात आहे, मात्र यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे डॉक्टर सांगतात.

रक्ताशी निगडित आजारी जिल्हानिहाय रुग्ण

जिल्हा सिकलसेल - थॅलेसेमिया -हिमोफिलिया

अकोला - १०३ - ३१ - ४२

अमरावती - ४६ - १५ - २०

बुलडाणा - ०४ - १०४ - ०६

वाशिम - ०२ - ७५ - ०४

यवतमाळ - ४१ - १३ - ००

एकूण - १९६ - २३८ -७२

निगेटिव्हसह पॉझिटिव्ह रक्तगटही उपलब्ध नाही

जिल्ह्यात आठ प्रमुख रक्तपेढ्या असून, यातील बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. प्रामुख्याने एबी पॉझिटिव्ह, एबी निगेटिव्ह या गटातील रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. गत महिनाभरात क्वचितच रक्तसंकलन झाल्याने ही स्थिती ओढवली आहे.