शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कोविड रुग्णांना दररोज लागतात एक हजार ऑक्सिजन सिलिंडर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:18 IST

गत महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. रुग्णसंख्या वाढ आणि मृतकांचा आकडा पाहता, आतापर्यंतची जिल्ह्यातील ही सर्वात गंभीर परिस्थिती ...

गत महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. रुग्णसंख्या वाढ आणि मृतकांचा आकडा पाहता, आतापर्यंतची जिल्ह्यातील ही सर्वात गंभीर परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, यंदा कोविडच्या गंभीर रुग्णांचे प्रमाणही जास्त आहे. मागील पंधरा दिवसांत ऑक्सिजनची मागणी दीड पटीने वाढली असून, दररोज सुमारे ९०० ते एक हजार ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडर लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात हीच स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, मार्च महिन्यात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे उपलब्ध ऑक्सिजनचा साठाही अपुरा ठरत आहे. सोमवारी जिल्ह्याला आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोरोनावर नियंत्रणाची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे दिसताच कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.

न्यूमोनियाच्या नावावर कोविड रुग्णांवर बेकायदेशीर उपचार

जिल्ह्यात अनेक कोविड रुग्णांवर केवळ सीटीस्कॅन अहवालाच्या आधारावर उपचार केले जात आहेत. या रुग्णांना न्यूमोनिया असल्याचे सांगत रुग्णालयात दाखल केले जात असून, अशा रुग्णांसाठीही खासगी रुग्णालयात अतिरिक्त ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वाढली आहे.

सर्वोपचार रुग्णालयात ९ केएलचा टँकर दाखल

खासगी रुग्णालयात गरजेनुसार ऑक्सिजनचा साठा उपलब्ध नसल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, सर्वोपचार रुग्णालयात लावण्यात आलेल्या १० केएल ऑक्सिजन टँकमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सर्वोपचार रुग्णालयातील ऑक्सिजन टँकसाठी ९ केएल क्षमतेचा टँकर आला आहे. त्यामुळे सध्यातरी सर्वोपचार रुग्णालयात मुबलक ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे.