शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनशून्यतेमुळे कोल्हापुरी बंधारा कोरडाठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:18 IST

वाडेगाव : येथील निर्गुणा नदीच्या पात्रात बांधलेला कोल्हापुरी बंधारा लघुसिंचन विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे कोरडाठाक पडला आहे. गत अनेक ...

वाडेगाव : येथील निर्गुणा नदीच्या पात्रात बांधलेला कोल्हापुरी बंधारा लघुसिंचन विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे कोरडाठाक पडला आहे. गत अनेक वर्षांपासून तुटलेल्या गेटच्या दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पाणी वाहून गेल्याने वाडेगाव व परिसरातील गावांमध्ये आज रोजी पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

बाळापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या वाडेगाव येथील निर्गुणा नदीवरील कोल्हापुरी बंधारा परिसरासाठी वरदान ठरला आहे. वाडेगाव, देगाव, मानकी, नकाशी, भरतपूर, खिरपुरी, बारलिंगा आदी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची जलपातळी वाढण्याच्या दृष्टीने हा बंधारा महत्त्वापूर्ण आहे. तसेच सिंचन व वापरण्याच्या पाण्यासाठीही बंधारा उपयोगी ठरत आला आहे. पावसाळ्यात मोठा जलसंचय होतो. तथापि, बंधाऱ्याचे गेट आता जीर्ण झाल्यामुळे त्यामधून पाणी वाहून जाते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच बंधाऱ्याने तळ गाठल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अंदाजे २५ हजार लोकसंख्या असलेल्या वाडेगावला खैवाडी तामशी, पाच देवूळ व चान्नी फाटा येथील विहिरीतून तसेच दोन विंधनविहिरींमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु हा पाणीपुरवठा अपूर्ण पडत आहे. गावातील काही भागात वीस ते पंचवीस दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

पाणी अडविण्यासाठी ताडपत्रीचा आधार

कोल्हापुरी बंधाऱ्याचे सर्व गेट जीर्ण झाले असून, काही गेट तुटून पडले आहेत. गेटच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थ दरवर्षी लोकवर्गणीतून उच्च दर्जाची ताडपत्री खरेदी करून, बंधाऱ्याच्या गेटला त्याचे आवरण करतात. यामुळे पाणी अडविले जाते. हा प्रकार मर्यादित कालावधीसाठी उपयोगी असला, तरी दीर्घकालीन साठवणुकीसाठी नवीन गेट बसविणे गरजेचे आहे.

वीस-पंचवीस दिवस झाले तरी नळाला पाणी आले नाही. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जास्त दिवस साठवून ठेवलेले पाणी प्यावे लागत आहे. हे आजाराला निमंत्रण देण्यासारखे आहे.

जान्हवी राजेंद्र घाटोळ, ग्रामस्थ

नदीवरील धरणाचे पाणी सोडण्यात आले तर बंधाऱ्यात पाणी येईल व पाणीटंचाई बाबतीत मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

केशव सरप, ग्रामस्थ

धरणातून पाणी सोडण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडून संबंधित विभागाला पत्र सादर केलेले आहे. लघुसिंचन विभागाने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन पाणी सोडण्याचा निर्णय घेतला तर नागरिकांना दिलासा मिळेल.

सचिन धनोकार,

ग्रामपंचायत सदस्य