शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान २१ व्या शतकातील सर्वात मोठी ताकद

By admin | Updated: January 13, 2015 01:26 IST

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन, तुळसाबाई कावल माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाचा शताब्दी महोत्सव.

अकोला : ग्रामीण भागात शिक्षणाच्या सोयी फारशा उपलब्ध नसल्या तरी विद्यार्थी व नागरिकांमध्ये प्रयोगशीलता, प्रतिकूल परिस्थितीतही नवीन संशोधन करण्याची वृत्ती आहे, यालाच ह्यउद्यमशीलताह्ण म्हणतात. सध्या २१ व्या शतकात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान हीच सर्वात मोठी ताकद असून, याची कास धरून देशाला समृद्ध करण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी १२ जानेवारी रोजी पातूर येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना केले. बेरार एज्यूकेशन सोसायटी पातूर अंतर्गत असलेल्या तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा शताब्दी महोत्सव ३ ते १२ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम सोमवारी दुपारी पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. पांडुरंग फुंडकर होते. प्रमुख उपस्थिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. हरीश पिंपळे, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप अंधारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, भाजपचे शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, पातूर नगर परिषदेच्या उपाध्यक्ष वर्षा बगाडे, नगरसेवक राजू उगले यांची होती. मंचावर बेरार एज्यूकेशन सोसायटीच्या सचिव स्नेहप्रभादेवी गहिलोत व तुळसाबाई कावल माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाचे प्राचार्य विजयसिंह गहिलोत उपस्थित होते. पुढे नितीन गडकरी म्हणाले की, अनेक शाळांमध्ये इमारत असते तर शिक्षक नसतात, शिक्षक असतात तर शिक्षण नसते. तुळसाबाई कावल विद्यालयात मात्र या सर्व बाबी पहायला मिळाल्या. याचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यायला हवे. मूल्याधिष्ठीत शिक्षणपद्धती ही महाराष्ट्राची विशेषता आहे. आपल्या शिक्षणातील भावार्थ काय आहे, हे समजून घ्यायला हवे. शिक्षण घेऊन मोठय़ा पदावर जाणे एवढेच नाही तर चांगले नागरिक बनने, हे आपले ध्येय असायला हवे. चांगले शिक्षण घेऊन त्याचा फायदा आपल्या देशाला करून द्यायला हवा, असे आवाहन यावेळी गडकरी यांनी केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना आ. पांडुरंग फुंडकर म्हणाले की, १00 वर्षांनंतर या संस्थेच्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. शताब्दी महोत्सवानंतर आता या संस्थेचा द्विशताब्दी महोत्सव साजरा व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संचालन निलेश पाकदुने यांनी, तर प्रास्ताविक प्राचार्य विजयसिंह गहिलोत यांनी केले.