शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

किसान विकास मंचने केला चक्काजाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:17 IST

अकोला : केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विरोधी तीन कृषी कायद्यांविरोधात एल्गार पुकारत, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान विकास ...

अकोला : केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विरोधी तीन कृषी कायद्यांविरोधात एल्गार पुकारत, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान विकास मंचच्यावतीने शनिवारी अकोल्यातील वाशिम बायपास चौक, मलकापूर, बोरगावमंजू व पातूर येथे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विरोधी तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत, शेतकरी विरोधी तीन कृषी कायद्यांविरोधात किसान विकास मंचच्यावतीने ६ फेब्रुवारी रोजी दुपारी अकोला शहरातील वाशिम बायपास चौक, मलकापूर येथील राष्ट्रीय महामार्ग तसेच बोरगावमंजू व पातूर येथे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. चारही ठिकाणी शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या देत चक्काजाम केला. त्यामुळे चारही ठिकाणी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. या आंदोलनात किसान विकास मंचचे अविनाश देशमुख व विवेक पारसकर यांच्या नेतृत्वात प्रमोद देंडवे, प्रशांत गावंडे, गणेश कळसकर, सागर कावरे, नीलेश काळंके, धनंजय दांडळे, गजानन गवई, निखिलेश दिवेकर, आकाश कवडे, सचिन शिराळे, पुष्पा गुलवाड़े, मनीषा महल्ले, सुनीता धुरंदर, अनवर शेरा, मो. शारीक,राजकुमार शिरसाट, गजानन दांडगे, राहुल सारवान, राजीव इटोले, सुनील रत्नपारखी, अंकुश भेंडेकर, अभिजीत तवर, मनीष थोटांगे, उमेश टेकाडे, रेहान खान, महादेव इंगळे, युनूस शहा, अंकुश गावंडे, राहुल इंगळे, निळकंठ पाचपोहे, डिगांबर बोर्डे, आदित्य गावंडे, अंकुश राऊत, गोपाळ जायले, शुभम परनाटे, हरीश नवले, प्रसाद फाटकर, आशिष चोरे, संतोष गायकवाड, भय्यू भागडे आदी सहभागी झाले होते.

महामार्गावर वाहतूक विस्कळीत;

वाहनांच्या लागल्या होत्या रांगा

किसान विकास मंचच्यावतीने अकोला शहरातील वाशिम बायपास चौक, मलकापूर तसेच बोरगावमंजू व पातूर येथे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे अर्धा तास या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

पोलिसांनी आंदोलकांना

ताब्यात घेऊन सोडले!

चक्काजाम आंदोलनात सहभागी आंदोलक किसान विकास मंचचे पदाधिकारी व शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन, संबंधित पोलीस स्टेशनमध्ये नेले. काही वेळानंतर आंदोलक शेतकऱ्यांना सोडण्यात आले.

...........................................फोटो....................................