शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

किडनीच्या आजारामुळे मृत्यूचे तांडव थांबता थांबेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:19 IST

खेट्री : पातूर तालुक्यातील चतारी येथे किडनीच्या आजारामुळे मृत्यूचे तांडव थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. चतारी येथील बळीराम गणपत ...

खेट्री : पातूर तालुक्यातील चतारी येथे किडनीच्या आजारामुळे मृत्यूचे तांडव थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. चतारी येथील बळीराम गणपत टेवाळे (७०) या वृद्धाचा किडनीच्या आजाराने मंगळवारी ३० मार्च रोजीच्या सायंकाळी मृत्यू झाला आहे. गेल्या २०१० पासून किडनीच्या आजाराने मृत्यूचे सत्र सुरूच असून, दहा वर्षांमध्ये किडनीच्या आजाराने जवळपास २५ जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच ५० च्या वर किडनीग्रस्त उपचार घेत आहेत. चतारी येथे पाणी पिण्यायोग्य नसल्याच्या प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार निष्पन्न झाले होते. पाण्यामुळेच किडनीच्या आजाराने थैमान घातले आहे. अनेकांना किडनी विकाराची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बळीराम गणपत टेवाळे यांना गेल्या काही वर्षांपासून किडनीचा विकार झाला होता. त्यांच्या किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर वेगवेगळ्या शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले; परंतु अखेर केलेले प्रयत्न यशस्वी न झाल्याने त्यांचा ३० मार्च रोजी मृत्यू झाला. ग्रामस्थांनी शासन-प्रशासन आरोग्य विभाग व मंत्रालयापर्यंत ठोस उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.

बॉक्स

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जाताहेत बळी

चतारी येथे किडनीच्या आजाराने दहा वर्षांत जवळपास २५ बळी गेल्यावरही आरोग्य विभाग व प्रशासन झोपेतच असल्याचे चित्र आहे. गावात एखादा बळी गेल्यानंतर आरोग्य पथक दिखाव्यासाठी सर्वेक्षण करून रुग्णांची तपासणी करते; परंतु ठोस उपाययोजनेकडे दुर्लक्ष केले जाते.

मृत्यूच्या संख्येत सतत होतेय वाढ

२०२० वर्षाच्या मार्च महिन्यामध्ये आरोग्य विभागाने चतारी येथे केलेल्या सर्वेक्षणात ३५ जण किडनीच्या आजारावर उपचार घेत असल्याचे समोर आले होते. यावर्षी किडनीग्रस्तांचा आकडा वाढून पन्नासच्या वर गेल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बॉक्स

जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन हवेत विरले

चतारी येथे किडनीच्या आजाराने मृत्यूचे सत्र सुरूच असून, यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्या २०२० च्या मार्च महिन्यामध्ये प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी ठोस उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळी ग्रामस्थांना दिले होते; परंतु अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन हवेतच विरल्याने गावात नाराजीचा सूर उमटत आहे.