शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

किडनीच्या आजारामुळे मृत्यूचे तांडव थांबता थांबेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:19 IST

खेट्री : पातूर तालुक्यातील चतारी येथे किडनीच्या आजारामुळे मृत्यूचे तांडव थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. चतारी येथील बळीराम गणपत ...

खेट्री : पातूर तालुक्यातील चतारी येथे किडनीच्या आजारामुळे मृत्यूचे तांडव थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. चतारी येथील बळीराम गणपत टेवाळे (७०) या वृद्धाचा किडनीच्या आजाराने मंगळवारी ३० मार्च रोजीच्या सायंकाळी मृत्यू झाला आहे. गेल्या २०१० पासून किडनीच्या आजाराने मृत्यूचे सत्र सुरूच असून, दहा वर्षांमध्ये किडनीच्या आजाराने जवळपास २५ जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच ५० च्या वर किडनीग्रस्त उपचार घेत आहेत. चतारी येथे पाणी पिण्यायोग्य नसल्याच्या प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार निष्पन्न झाले होते. पाण्यामुळेच किडनीच्या आजाराने थैमान घातले आहे. अनेकांना किडनी विकाराची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बळीराम गणपत टेवाळे यांना गेल्या काही वर्षांपासून किडनीचा विकार झाला होता. त्यांच्या किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर वेगवेगळ्या शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले; परंतु अखेर केलेले प्रयत्न यशस्वी न झाल्याने त्यांचा ३० मार्च रोजी मृत्यू झाला. ग्रामस्थांनी शासन-प्रशासन आरोग्य विभाग व मंत्रालयापर्यंत ठोस उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.

बॉक्स

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जाताहेत बळी

चतारी येथे किडनीच्या आजाराने दहा वर्षांत जवळपास २५ बळी गेल्यावरही आरोग्य विभाग व प्रशासन झोपेतच असल्याचे चित्र आहे. गावात एखादा बळी गेल्यानंतर आरोग्य पथक दिखाव्यासाठी सर्वेक्षण करून रुग्णांची तपासणी करते; परंतु ठोस उपाययोजनेकडे दुर्लक्ष केले जाते.

मृत्यूच्या संख्येत सतत होतेय वाढ

२०२० वर्षाच्या मार्च महिन्यामध्ये आरोग्य विभागाने चतारी येथे केलेल्या सर्वेक्षणात ३५ जण किडनीच्या आजारावर उपचार घेत असल्याचे समोर आले होते. यावर्षी किडनीग्रस्तांचा आकडा वाढून पन्नासच्या वर गेल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बॉक्स

जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन हवेत विरले

चतारी येथे किडनीच्या आजाराने मृत्यूचे सत्र सुरूच असून, यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्या २०२० च्या मार्च महिन्यामध्ये प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी ठोस उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळी ग्रामस्थांना दिले होते; परंतु अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन हवेतच विरल्याने गावात नाराजीचा सूर उमटत आहे.