शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
2
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
3
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
4
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
5
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
6
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
8
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
9
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
10
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
11
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
12
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
13
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
14
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
15
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
16
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
17
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
18
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
19
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

कापूस, सोयाबीनवर किडींचा हल्ला!

By admin | Updated: July 25, 2016 01:32 IST

इतरही खरीप पिकांवर किडींची शक्यता; सर्वेक्षण करण्याची गरज.

अकोला : पश्‍चिम विदर्भात यावर्षी पिकांना पोषक पाऊस झाला असून, सर्वत्र पिके बहरली आहेत; परंतु किडींना पोषक वातावरण निर्माण झाल्याने कापूस व सोयाबीन पिकांवर किडींनी आक्रमण केल्याने शेतकर्‍यांसमोर हे नवे अस्मानी संकट उभे ठाकले आहे.पश्‍चिम विदर्भात पुरक पाऊस झाला असला, तरी धरणे अजून रितेच आहेत. मुरतोनी पाऊस झाल्याने सध्या सर्वच पिके बहरली आहेत; परंतु किडींना पोषक वातावरण तयार झाल्याने पिकांवर वेगवेगळ्य़ा किडींनी हल्ला केला आहे. सद्यस्थितीत या खरीप कापसावर तुडतुडे व सोयाबीनवर हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. पश्‍चिम विदर्भात ३२ लाख हेक्टरपैकी कापूस आणि सोयाबीनचे क्षेत्र हे २३ लाखांपर्यंत आहे. ही दोन पिके या भागात मोठय़ाप्रमाणावर घेतली जातात, यावर्षी तुरीचे क्षेत्र वाढले असून, ते ४ लाख ९0 हजार हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. इतर कडधान्याची पेरणीदेखील वाढली आहे. मागील तीन ते चार वर्षांनंतर सोयाबीनचे पीक यावर्षी चांगले बहरले आहे. वेळेवर पावसाचा शिडकावा होत असल्याने या पिकाने कात टाकली आहे. शेतकर्‍यांनी दोनदा या पिकांची कोळपणी, डवरणी केली, तणनाशकांची फवारणी केल्याने शेतातील तण कमी झाले आहे. त्यामुळे यावर्षी मागील चार वर्षांची कसर भरू न निघेल, अशी शेतकर्‍यांना आशा आहे. त्या दृष्टीने शेतकर्‍यांनी शेतीची सर्व कामे केली आहेत; परंतु पिकांवर किडींनी आक्रमण करणे सुरू केल्याने शेतकर्‍यांचा कीटकनाशकांचा खर्च वाढत आहे. कापूस या पिकावर तुडतुडे या किडींनी, तर सोयाबीनवर हिरवी उंटअळी व केसाळ अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ---कापसावर तुडतुडे व सोयाबीनवर हिरव्या उंटअळ्य़ांचा प्रादुर्भाव झाला आहे. कापसावरील तुडतुड्यांचा नायनाट करण्यासाठी सुरुवातील निंबोळी अर्काचा वापर करावा, कीड जास्त असेल, तर कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार फवारणी करावी.डॉ. प्रशांत नेमाडे, कापूस कीटक शास्त्रज्ञ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.