शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

खारपाणपट्टय़ातील सिंचन प्रकल्प रखडलेलेच!

By admin | Updated: March 13, 2017 02:39 IST

नेरधामणा, उमा बॅरेजचे कामही थंडबस्त्यात!

अकोला, दि. १२- जिल्हय़ातील शापित खारपाणपट्टय़ात सिंचन प्रकल्पाची कामे रखडली आहेत. नेर-धामणा, उमा, काटेपूर्णासह सर्वच बॅरेजची कामे ठप्प पडली आहेत. सातत्याने खारेपाणी व पावसाच्या अनिश्‍चिततेचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना या बॅरेजमुळे दिलासा वाटत होता; पण कामेच बंद पडल्याने शेतकर्‍यांचे लक्ष या बांधकामाकडे लागले आहे.खारपाणपट्टय़ातील पाणी समुद्राच्या पाण्यासारखे खारे आहे. आरोग्यासाठी घातक असलेले हे पाणी पिकांवर परिणाम करणारे असल्याने या भागात धरणं व्हावीत, असे सातत्याने प्रयत्न झाले; पण या भागातील भूगर्भात ४0 ते ५0 मीटर खाली खडक नसल्याने धरण होऊ शकत नाही, असे सात त्याने जलसंपदा विभागाच्या विविध तज्ज्ञ समित्यांकडून सांगण्यात येत हो ते. यावर उपाय म्हणून नवीन तंत्रज्ञान वापरण्याचे ठरले. सुरुवातीला नेरधामणा बॅरेजचे काम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा काढण्यात आल्या. अखेर येथील कंत्राटदाराकडून या बॅरेजच्या कामाची मागील सात वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. खारपाणपट्टय़ातील पहिले बॅरेज आहे, जे डायफाम वॉलवर उभे करण्यात आले. सध्या या बॅरेजचे काम थंडबस्त्यात पडले आहे. प्रायोगिक तत्त्वावर बांधण्यात येणार्‍या नेरधामणा बॅरेजनंतर खारपाणपट्टय़ात बॅरेजची शृंखला तयार करण्यात आली आहे. अकोला जिल्हय़ातील बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा बॅरेज, नेरधामणा (पूर्णा-२) बॅरेज आहे. या बॅरेजला लागूनच मूर्तिजापूूर तालुक्यात घुंगशी बॅरेज आहे. या बॅरजेच्यावर काटेपूर्णा बॅरेज काटेपूर्णा नदीवर होणार आहे. लागनूच उमा बॅरेज आहे. या बॅरेजच्यावर अमरावती जिल्ह्यात पूर्णा बॅरेज आहे. या सर्व बॅरेजचे काम थंडबस्त्यात आहे. या शृंखलेत काटीपाटीच्या बॅरेजचे काम रखडले आहे. बॅरेज झाल्यास ८.२४ दलघमी जलसाठा संकलित होईल, तसेच १८00 हेक्टर क्षेत्रावर सिंचन होईल.काटीपाटी बॅरेजची किंमत वाढली!शृंखलेला पूर्ण करणार्‍या काटीपाटी बॅरेजचे काम रखडले आहे. काटी पाटीची व्यवहार्यता तपासून काम सुरू करावे, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दोनदा दिलेला आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने या शृंखलेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिमाणी, काटीपाटी प्रकल्पाची किंमत सातत्याने वाढत असून, ६५ कोटींचे हे बॅरेज आता ३२५ कोटींचे झाले आहे.