शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठकांमध्ये अंतिम होणार खरीप हंगामाचा आराखडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:19 IST

संतोष येलकर अकोला : ग्राम कृषी उत्पादन आराखडा लोकाभिमुख करण्यासाठी राज्यातील गाव पातळीवर गठित करण्यात आलेल्या ग्राम कृषी विकास ...

संतोष येलकर

अकोला : ग्राम कृषी उत्पादन आराखडा लोकाभिमुख करण्यासाठी राज्यातील गाव पातळीवर गठित करण्यात आलेल्या ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठकांमध्ये यावर्षीच्या खरीप हंगामाचा गावनिहाय विकास आराखडा अंतिम करण्यात येणार आहे. त्यासाठी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत मे अखेरपर्यंत ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठका ऑनलाइन पध्दतीने घेण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

ग्राम कृषी उत्पादन आराखडा जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्यासाठी राज्यात गाव पातळीवरील ग्राम कृषी विकास समित्यांमध्ये ग्राम कृषी उत्पादन आराखडा अंतिम करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार ग्राम कृषी विकास समित्यांमध्ये शेतीविषयक सर्व बाबींसह गावातील जमीन, पर्जन्यमान, सिंचन सुविधा, उपलब्ध साधनसामग्री, दळणवळण इत्यादी बाबींचा विचार करून २०२१ या वर्षातील खरीप हंगामाचा ग्राम कृषी विकास आराखडा अंतिम करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत गठित करण्यात आलेल्या ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठकांमध्ये गाव पातळीवरील खरीप हंगामाचा ग्राम कृषी विकास आराखडा अंतिम करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मे अखेरपर्यंत ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठका ऑनलाइन पध्दतीने घेऊन गाव पातळीवर खरीप हंगामाचा कृषी विकास आराखडा अंतिम करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत स्थापन करण्यात आलेल्या ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठकांमध्ये ३१ मेपर्यंत खरीप हंगामाचा गावनिहाय कृषी विकास आराखडा अंतिम करण्यात येणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठका ऑनलाइन पध्दतीने घेण्यात येणार असून, त्यामध्ये गाव पातळीवरील खरीप हंगामाचा कृषी विकास आराखडा अंतिम करण्यात येणार आहे.

- शंकर तोटावार

विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग