शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठकांमध्ये अंतिम होणार खरीप हंगामाचा आराखडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:19 IST

संतोष येलकर अकोला : ग्राम कृषी उत्पादन आराखडा लोकाभिमुख करण्यासाठी राज्यातील गाव पातळीवर गठित करण्यात आलेल्या ग्राम कृषी विकास ...

संतोष येलकर

अकोला : ग्राम कृषी उत्पादन आराखडा लोकाभिमुख करण्यासाठी राज्यातील गाव पातळीवर गठित करण्यात आलेल्या ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठकांमध्ये यावर्षीच्या खरीप हंगामाचा गावनिहाय विकास आराखडा अंतिम करण्यात येणार आहे. त्यासाठी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत मे अखेरपर्यंत ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठका ऑनलाइन पध्दतीने घेण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

ग्राम कृषी उत्पादन आराखडा जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्यासाठी राज्यात गाव पातळीवरील ग्राम कृषी विकास समित्यांमध्ये ग्राम कृषी उत्पादन आराखडा अंतिम करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार ग्राम कृषी विकास समित्यांमध्ये शेतीविषयक सर्व बाबींसह गावातील जमीन, पर्जन्यमान, सिंचन सुविधा, उपलब्ध साधनसामग्री, दळणवळण इत्यादी बाबींचा विचार करून २०२१ या वर्षातील खरीप हंगामाचा ग्राम कृषी विकास आराखडा अंतिम करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत गठित करण्यात आलेल्या ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठकांमध्ये गाव पातळीवरील खरीप हंगामाचा ग्राम कृषी विकास आराखडा अंतिम करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मे अखेरपर्यंत ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठका ऑनलाइन पध्दतीने घेऊन गाव पातळीवर खरीप हंगामाचा कृषी विकास आराखडा अंतिम करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत स्थापन करण्यात आलेल्या ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठकांमध्ये ३१ मेपर्यंत खरीप हंगामाचा गावनिहाय कृषी विकास आराखडा अंतिम करण्यात येणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठका ऑनलाइन पध्दतीने घेण्यात येणार असून, त्यामध्ये गाव पातळीवरील खरीप हंगामाचा कृषी विकास आराखडा अंतिम करण्यात येणार आहे.

- शंकर तोटावार

विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग