शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

खरिपाचा २८ टक्के खत साठा गोदामातच!

By admin | Updated: October 13, 2016 03:07 IST

एकूण साठय़ापैकी केवळ ७२ टक्केच खतांची विक्री झाली आहे.

अकोला, दि. १२- खरीप हंगामात पिकांसाठी लागणार्‍या खतांचा वापर बराच घटला आहे. जिल्ह्यात प्राप्त झालेल्या एकूण साठय़ापैकी केवळ ७२ टक्केच खतांची विक्री झाली आहे. २८ टक्के साठा गोदामातच पडून आहे. त्यामुळे वापर कमी होण्याच्या कारणांचा शोध उत्पादक कंपन्या घेत आहेत. त्यातच आता रब्बी हंगामासाठी मागणीच्या ६५ टक्केच खत देण्याला शासनाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात खरिपासाठी सप्टेंबर अखेरपर्यंंत विविध खतांचा ६७0८५ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला. त्यामध्ये गेल्यावर्षीचा शिल्लक १५३७२ मे.टन मिळून एकूण ८२४५७ मे.टन साठा झाला. त्यापैकी आतापर्यंत ५९७५८ मे.टन खतांची विक्री झाली. एकूण उपलब्ध साठय़ाशी हे प्रमाण ७२ टक्के आहे. २८ टक्के खते गोदामातच पडून आहेत. म्हणजे, २२६६९ मे.टन खतांची उचलच झालेली नाही. रासायनिक खते उत्पादक कंपन्यांसाठी ही बाब चिंतेची झाली आहे. गेल्या यापूर्वी हंगामात खतांसाठी शेतकर्‍यांची कमालीची धावपळ व्हायची. काही वेळा तर पोलीस बंदोबस्तात खतांची विक्री करण्याची वेळ आली होती. त्यानंतर शेतकर्‍यांच्या थेट बांधावर खते देण्याचा निर्णयही शासनाला घ्यावा लागला होता. या परिस्थितीत चालू वर्षात खतांच्या वापराचे प्रमाण कमालीचे घटले. खतांच्या समतोल वापरासाठी शेतकर्‍यांना जागरुक केले जात आहे. माती परीक्षणामुळे त्या शेतात आवश्यक घटक असलेली खतेच दिली जात आहे. यामुळे काही प्रमाणात खत वापरामध्ये र्मयादा आल्या आहे. त्यासाठी शेतकर्‍यांची जागरुकता वाढण्याची गरज आहे. आरसीएफकडून त्यासाठी किसान सुविधा केंद्र सुरू केली जात आहेत. - सतीश वाघोडे, उपप्रबंधक, आरसीएफ, अकोला विभाग.