शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाचा २८ टक्के खत साठा गोदामातच!

By admin | Updated: October 13, 2016 03:07 IST

एकूण साठय़ापैकी केवळ ७२ टक्केच खतांची विक्री झाली आहे.

अकोला, दि. १२- खरीप हंगामात पिकांसाठी लागणार्‍या खतांचा वापर बराच घटला आहे. जिल्ह्यात प्राप्त झालेल्या एकूण साठय़ापैकी केवळ ७२ टक्केच खतांची विक्री झाली आहे. २८ टक्के साठा गोदामातच पडून आहे. त्यामुळे वापर कमी होण्याच्या कारणांचा शोध उत्पादक कंपन्या घेत आहेत. त्यातच आता रब्बी हंगामासाठी मागणीच्या ६५ टक्केच खत देण्याला शासनाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात खरिपासाठी सप्टेंबर अखेरपर्यंंत विविध खतांचा ६७0८५ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला. त्यामध्ये गेल्यावर्षीचा शिल्लक १५३७२ मे.टन मिळून एकूण ८२४५७ मे.टन साठा झाला. त्यापैकी आतापर्यंत ५९७५८ मे.टन खतांची विक्री झाली. एकूण उपलब्ध साठय़ाशी हे प्रमाण ७२ टक्के आहे. २८ टक्के खते गोदामातच पडून आहेत. म्हणजे, २२६६९ मे.टन खतांची उचलच झालेली नाही. रासायनिक खते उत्पादक कंपन्यांसाठी ही बाब चिंतेची झाली आहे. गेल्या यापूर्वी हंगामात खतांसाठी शेतकर्‍यांची कमालीची धावपळ व्हायची. काही वेळा तर पोलीस बंदोबस्तात खतांची विक्री करण्याची वेळ आली होती. त्यानंतर शेतकर्‍यांच्या थेट बांधावर खते देण्याचा निर्णयही शासनाला घ्यावा लागला होता. या परिस्थितीत चालू वर्षात खतांच्या वापराचे प्रमाण कमालीचे घटले. खतांच्या समतोल वापरासाठी शेतकर्‍यांना जागरुक केले जात आहे. माती परीक्षणामुळे त्या शेतात आवश्यक घटक असलेली खतेच दिली जात आहे. यामुळे काही प्रमाणात खत वापरामध्ये र्मयादा आल्या आहे. त्यासाठी शेतकर्‍यांची जागरुकता वाढण्याची गरज आहे. आरसीएफकडून त्यासाठी किसान सुविधा केंद्र सुरू केली जात आहेत. - सतीश वाघोडे, उपप्रबंधक, आरसीएफ, अकोला विभाग.