शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जीवन विद्येतून जीवन जगण्याचा मूलमंत्र

By admin | Updated: September 24, 2015 01:09 IST

जीवन विद्येचे प्रणोते ए.नागराज यांची लोकमतशी बातचित.

बुलडाणा : प्रत्येक मनुष्याची इच्छा ही फक्त आणि फक्त सुखी समाधानी होणे हीच असते. दु:ख, आर्थिक विषमता, सामाजिक उच्च-निच भेद हे सूजान नागरिकांना नको असते. त्यामुळे रचनात्मक, वंचितांना न्याय मिळवून देणारी विश्‍वबंधुत्वाची संकल्पना मांडून, तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी काही मानवीय सुत्र आवश्यक असतात. मानवी आवश्यकतांना पूर्ण करण्याचे, किंबहुना जगण्याचे एक सर्वसामान्य स्वरूप जीवन विद्येतून हाती येते. जीवन जगण्याचा मूलमंत्र देण्याचे काम जीवन विद्या करत आहे, असे प्रतिपादन जीवन विद्येचे प्रणेते ए.नागराज यांनी केले. मोताळा येथे आयोजित संमेलनासाठी ते बुधवारी जिल्ह्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी लोकमतशी संवाद साधला

प्रश्न : जीवनविद्या काय आहे ?

मानवी गरजांना पूर्ण करणारे, जगण्याचे एक सर्वमान्य स्वरूप म्हणजे जीवनविद्या. सर्वसमावेशक विचारांचे अस्तित्व स्वीकारत असताना समजावून घेण्याची प्रक्रिया सर्वांनाच करता आली तर सार्थक समाजकार्याची जाणीव निर्माण करणारी एक परंपरा तयार होईल. व्यक्तीवाद, संप्रदायवाद, रहस्यवाद यापासून मुक्त होत सर्व मानवांसाठी जगण्याचा प्रस्ताव म्हणजे जीवनविद्या.

प्रश्न : या विचारधारेचा मूळ गाभा काय आहे?

ही विचारधारा व्यक्तीवाद, संप्रदायवाद, रहस्यवादापासून मुक्त आहे. हा सर्व मानवांसाठी जगण्याचा प्रस्ताव आहे. व्यक्ती-व्यक्तीमधील परस्पर संबंध समजून घेतल्याने आणि त्या संबंधाचा निर्वाह केल्याने एका अखंड समाजाची व्देष, मत्सरविरहीत समाज रचना होवू शकेल, हा आशावाद ही विचारधारा सांगते.

प्रश्न : कोणत्या मुद्यांवर आपण भर देता?

समाज व्यवस्था हे उद्दीष्ट आहे. यासाठी शिक्षण व परिवार या माध्यमातून जीवन विद्येचा प्रसार, प्रचार करताना शिक्षणाला मानवीय चेहरा देण्याचे काम केले जात आहे. समाज व्यवस्था सदृढ होण्यासाठी प्रत्येकाला वैचारिक समाधान हवे असते व हे समाधान आपले प्रश्न सुटले तर नक्कीच मिळते. त्यामुळे मानवाचे प्रश्न सुटतील, असा विश्‍वास प्रत्येकामध्ये यायला हवा. त्यासाठी परिवार हाच समाज व्यवस्थेचा मूळ घटक समजून आम्ही कार्य करत आहोत.

प्रश्न : आपल्या कार्याला कसा प्रतिसाद आहे ?

मुल्य, चरित्र आणि नैतिकता यांच्या स्पष्टतेने समाजातील प्रत्येक घटकामधील संबंध गाव, देश व विश्‍व पातळीवर प्रमाणित झाले तर विश्‍व हेच एक निकोप कुटुंब होईल. त्या दृष्टीने प्रयत्न करत असताना छत्तीसगढसारख्या राज्याने प्राथमिक स्तरावरील शिक्षणात या विचारांचा अंगीकार केला. उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाना आदी राज्यांमध्ये उच्च व तंत्रशिक्षणात याचा समावेश करण्यात आला.

प्रश्न : राज्याच्या बाहेरही कार्य चालते का ?

ही एक विचार व्यवस्था आहे. यामध्ये कुठलेही अवडंबर नाही, गंडेदोरे नाहीत, गुरूशिष्य नाही, प्रत्येक जण हा स्वतंत्र अस्तीत्व असणारी व्यवस्था आहे. त्यामुळे येथे सहभागी होणारा प्रत्येक जण हा परिवाराचा सदस्य असतो. असा हा परिवार महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, आंधप्रदेश यासोबतच भूतान आणि कॅनडा अशा देशांपर्यंत पोहोचला आहे. ज्यांना विचार भावतात ते त्याचा अंगीकार करतात. येथे विचारांच्या प्रतिवादालाही तेवढेच महत्व आहे.

प्रश्न : या संमेलनातून काय संदेश देणार आहात ?

हे विसावे आंतरराष्ट्रीय जीवनविद्या संमेलन आहे. कोणताही विचार हा समाजमान्य होण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे या व्यवस्थेत समजून घेणे याला महत्व आहे. या संमेलनातून अनेक प्रश्न समजून घेताना, मानवीय जीवन जगण्याचे मूलमंत्र देण्याचा प्रयत्न केला जाईल.