शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

बियाण्यांच्या काळय़ा बाजारावर लक्ष ठेवा!

By admin | Updated: April 11, 2017 01:54 IST

पालकमंत्र्यांचे निर्देश; बियाणे, खतांची कमतरता पडू नये!

अकोला: खरीप हंगामात पेरणीसाठी जिल्हय़ातील शेतकर्‍यांना बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही, यासाठी योग्य नियोजन करण्याचे सांगत, बियाण्याचा काळा बाजार होऊ नये, यासाठी भरारी पथके गठित करून विशेष लक्ष ठेवा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी कृषी विभागाला दिले.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनातील छत्रपती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार बळीराम सिरस्कार, आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, विभागीय कृषी सहसंचालक एस.आर.सरदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.प्रदीप इंगोले प्रामुख्याने उपस्थित होते. यावर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने, खरीप हंगामात सोयाबीन, कपाशी, तूर व मूग पिकाच्या क्षेत्रात वाढ होऊ शकते. या पृष्ठभूमीवर पेरणीकरिता शेतकर्‍यांना बी-बियाणे व खतांची कमतरता पडू नये, यासाठी कृषी विभागाने योग्य नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. पाऊस वेळेवर आल्यास कपाशी बियाण्याची मागणी वाढणार आहे, त्यासाठी महाबीज व इतर संबंधित नोडल संस्थांकडून कपाशीचे बियाणे उपलब्ध करण्याबाबत नियोजन करण्यात यावे. बियाण्याचा काळाबाजार होऊ, यासाठी विशेष भरारी पथके निर्माण करण्यात यावी आणि जिल्हय़ातील कृषी सेवा केंद्रांनी बियाणे व खताच्या उपलब्धतेची माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्याचे निर्देश देत बोगस बियाण्याची विक्री होणार नाही, याकडे कृषी विभागासह जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.पाटील यांनी दिले.