शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

बियाण्यांच्या काळय़ा बाजारावर लक्ष ठेवा!

By admin | Updated: April 11, 2017 01:54 IST

पालकमंत्र्यांचे निर्देश; बियाणे, खतांची कमतरता पडू नये!

अकोला: खरीप हंगामात पेरणीसाठी जिल्हय़ातील शेतकर्‍यांना बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही, यासाठी योग्य नियोजन करण्याचे सांगत, बियाण्याचा काळा बाजार होऊ नये, यासाठी भरारी पथके गठित करून विशेष लक्ष ठेवा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी कृषी विभागाला दिले.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनातील छत्रपती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार बळीराम सिरस्कार, आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, विभागीय कृषी सहसंचालक एस.आर.सरदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.प्रदीप इंगोले प्रामुख्याने उपस्थित होते. यावर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने, खरीप हंगामात सोयाबीन, कपाशी, तूर व मूग पिकाच्या क्षेत्रात वाढ होऊ शकते. या पृष्ठभूमीवर पेरणीकरिता शेतकर्‍यांना बी-बियाणे व खतांची कमतरता पडू नये, यासाठी कृषी विभागाने योग्य नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. पाऊस वेळेवर आल्यास कपाशी बियाण्याची मागणी वाढणार आहे, त्यासाठी महाबीज व इतर संबंधित नोडल संस्थांकडून कपाशीचे बियाणे उपलब्ध करण्याबाबत नियोजन करण्यात यावे. बियाण्याचा काळाबाजार होऊ, यासाठी विशेष भरारी पथके निर्माण करण्यात यावी आणि जिल्हय़ातील कृषी सेवा केंद्रांनी बियाणे व खताच्या उपलब्धतेची माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्याचे निर्देश देत बोगस बियाण्याची विक्री होणार नाही, याकडे कृषी विभागासह जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.पाटील यांनी दिले.