शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

बचत खात्यात पुरेशी रक्कम ठेवा, अन्यथा दंड! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:26 IST

अकोला : बचत खात्यात तीन महिन्यांच्या कार्यकाळात किमान एक हजार एवढी रक्कम नसल्यास १८0 रुपये दंड भरावा लागणार आहे. देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकांकडून या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली असून, बँकांच्या विविध शुल्कात वाढ करण्यात आली आहे. नव्याने लागलेल्या या नियमावलीमुळे बँक खात्यांवर अतिरिक्त भुर्दंड टाकल्या जात असून, ग्राहक मात्र यापासून अजूनही अनभिज्ञ आहेत.

ठळक मुद्देबँकांचा निर्णय राष्ट्रीयीकृत बँकांच्या सेवा शुल्कात होतेय वाढ

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बचत खात्यात तीन महिन्यांच्या कार्यकाळात किमान एक हजार एवढी रक्कम नसल्यास १८0 रुपये दंड भरावा लागणार आहे. देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकांकडून या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली असून, बँकांच्या विविध शुल्कात वाढ करण्यात आली आहे. नव्याने लागलेल्या या नियमावलीमुळे बँक खात्यांवर अतिरिक्त भुर्दंड टाकल्या जात असून, ग्राहक मात्र यापासून अजूनही अनभिज्ञ आहेत.व्यावसायिकदृष्ट्या काढल्या जाणार्‍या चालू (करंट) खात्यांसाठी दोन वर्षांआधी पुरेशी रक्कम ठेवण्याचा नियम करण्यात आला आहे. त्याला मोठय़ा प्रमाणात विरोधही झाला; मात्र चालू खात्याची नियमावली लागू झाली. ठरावीक रक्कम चालू खात्यात नसल्याचे जाणवताच बँक अधिकार्‍यांकडून दंड ठोठाविल्या जात आहे. चालू खात्याला जास्त विरोध उफाळून आल्याने आता राष्ट्रीयीकृत सर्वच बँकांनी एकत्रित येऊन बचत खात्यावरही हे निर्बंध टाकले आहेत. एक बँक खाते चालविण्यासाठी बँकेला लागणारा खर्च आणि त्यांच्या नोंदीची आकडेवारी काढली गेली. दरम्यान, शून्य बॅलेन्सवर सुरू झालेले बँक खाते आणि जनधन बँक खाते यावरचा बँकेचा खर्च वाढला आहे. या खात्यांचा सांभाळ करण्यात बँकांना तोटा सहन करावा लागत आहे. शासनाच्या योजनांचे खाते यामध्ये जास्त आहे. त्यात कर्ज बुडवी खाते वेगळे आहेत. या सर्व बाबींचा विचार करून बँकांना भविष्यात जिवंत ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे; मात्र याबाबत ग्राहकांना अजूनही याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. केवळ बँक परिसरात फलक लावून सेवाशुल्कात वाढ झाल्याचे कळविले गेले आहे. जेव्हा ग्राहकाच्या बँक खात्यातून रकमा कमी होतील, तेव्हा त्यांना दंड पडल्याची जाणीव होणार आहे. देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या या नवीन धोरणामुळे बँक खात्यांवर किती परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

एकापाठोपाठ एक आता सर्वच राष्ट्रीयीकृत बँका आपापल्या नियमावलीनुसार सेवा कर आकारणार आहे. काही वर्षांआधी स्टेट बँकेने सेवा कर लावला. ऑगस्टपासून सेंट्रल बँकेने सेवा कर सुरू केला आहे. शून्य रकमेवर बँक खाते उघडले जाईल; मात्र त्यात पुरेशी रक्कम ठेवावी लागेल.- तुकाराम गायकवाड, जिल्हा लीड बँक मॅनेजर, अकोला.