शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

काटेपूर्णाचे पाणी थांबले अध्र्यावरच!

By admin | Updated: May 2, 2016 02:18 IST

दोन दशलक्ष घनमीटर पाण्याचा नदीपात्रात विसर्ग; अध्र्यावरच थांबले पाणी.

अकोला : अकोलेकरांची तहान भागविणार्‍या काटेपूर्णा धरणात जेमतेम जलसाठा शिल्लक असताना, बुधवारी या धरणातून दोन दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे; परंतु हे पाणी निश्‍चित स्थळी न पोहोचता अध्र्यावरच थांबल्याने खांबोरा पाणीपुरवठा योजनेंतर्गत येणारी ६४ गावे आजमितीस तहानलेलीच आहेत. दरम्यान, मागील वर्षी पाऊस नसल्याने नदीपात्र अगोदरच कोरडेठक आहे. यावर्षीचा उन्हाळाही प्रखर असल्याने हे पाणी खांबोरा-उन्नई बंधार्‍यापर्यंत पोहोचणे शक्य नसतानाही काटेपूर्णा धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.खांबोरा पाणीपुरवठा योजनेंतर्गत येणार्‍या ६४ गावांची तहान भागविण्यासाठी बुधवारी सायंकाळी ६ वाजता या धरणातून खांबोरा-उन्नई बंधार्‍यासाठी दोन दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे; परंतु नदी कोरडी असून, धरणातून सोडलेल्या पाण्याचा प्रवास १८ किलोमीटर लांब आहे. परिणामी बुधवारी सायंकाळी सोडलेले पाणी गुरुवारी सायंकाळपर्यंत २४ तास उलटूनही नऊ किलोमीटर अंतरापर्यतच पोहाचले होते. शुक्रवारी हे पाणी दोनदपर्यंतच पोहोचले. त्यापुढे मात्र पाणी सरकले नाही. दोनद येथील डोहात जवळपास अर्धा दशलक्ष घनमीटर जलसाठा या पाण्यामुळे संचयित झाला आहे. काटेपूर्णा धरणातील सोडलेले दोन दशलक्ष घनमीटर पाणी खांबोरा-उन्नई धरणापर्यंत पोहाचणे अशक्य असताना, अकोलेकरांना संकटात टाकून या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे. काटेपूर्णा धरणात केवळ ६.८९ दशलक्ष घनमीटर (७.९७ टक्के) जलसाठा शिल्लक होता. आता या धरणात केवळ ४.८९ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आहे. दररोज वेगाने होणारे बाष्पीभवन आणि पाण्याचा होणारा अपव्यव बघता, शिल्लक असलेल्या जिवंत जलसाठय़ावर जून महिन्यापर्यंत अकोलेकरांची तहान भागवणे अशक्य आहे.