शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

काटेपूर्णाचे पाणी थांबले अध्र्यावरच!

By admin | Updated: May 2, 2016 02:18 IST

दोन दशलक्ष घनमीटर पाण्याचा नदीपात्रात विसर्ग; अध्र्यावरच थांबले पाणी.

अकोला : अकोलेकरांची तहान भागविणार्‍या काटेपूर्णा धरणात जेमतेम जलसाठा शिल्लक असताना, बुधवारी या धरणातून दोन दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे; परंतु हे पाणी निश्‍चित स्थळी न पोहोचता अध्र्यावरच थांबल्याने खांबोरा पाणीपुरवठा योजनेंतर्गत येणारी ६४ गावे आजमितीस तहानलेलीच आहेत. दरम्यान, मागील वर्षी पाऊस नसल्याने नदीपात्र अगोदरच कोरडेठक आहे. यावर्षीचा उन्हाळाही प्रखर असल्याने हे पाणी खांबोरा-उन्नई बंधार्‍यापर्यंत पोहोचणे शक्य नसतानाही काटेपूर्णा धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.खांबोरा पाणीपुरवठा योजनेंतर्गत येणार्‍या ६४ गावांची तहान भागविण्यासाठी बुधवारी सायंकाळी ६ वाजता या धरणातून खांबोरा-उन्नई बंधार्‍यासाठी दोन दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे; परंतु नदी कोरडी असून, धरणातून सोडलेल्या पाण्याचा प्रवास १८ किलोमीटर लांब आहे. परिणामी बुधवारी सायंकाळी सोडलेले पाणी गुरुवारी सायंकाळपर्यंत २४ तास उलटूनही नऊ किलोमीटर अंतरापर्यतच पोहाचले होते. शुक्रवारी हे पाणी दोनदपर्यंतच पोहोचले. त्यापुढे मात्र पाणी सरकले नाही. दोनद येथील डोहात जवळपास अर्धा दशलक्ष घनमीटर जलसाठा या पाण्यामुळे संचयित झाला आहे. काटेपूर्णा धरणातील सोडलेले दोन दशलक्ष घनमीटर पाणी खांबोरा-उन्नई धरणापर्यंत पोहाचणे अशक्य असताना, अकोलेकरांना संकटात टाकून या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे. काटेपूर्णा धरणात केवळ ६.८९ दशलक्ष घनमीटर (७.९७ टक्के) जलसाठा शिल्लक होता. आता या धरणात केवळ ४.८९ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आहे. दररोज वेगाने होणारे बाष्पीभवन आणि पाण्याचा होणारा अपव्यव बघता, शिल्लक असलेल्या जिवंत जलसाठय़ावर जून महिन्यापर्यंत अकोलेकरांची तहान भागवणे अशक्य आहे.