शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

महान धरणाचे पाणलोट क्षेत्र पडले उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:07 IST

महान : काटेपूर्णा धरणाच्या क्षेत्रात दीड महिना लोटूनही पाऊस न झाल्याने धरणात केवळ ३ टक्के जलसाठा असून, १४ वर्षांनंतर धरणाचे पाणलोट क्षेत्र कोरडे पडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमहान : काटेपूर्णा धरणाच्या क्षेत्रात दीड महिना लोटूनही पाऊस न झाल्याने धरणात केवळ ३ टक्के जलसाठा असून, १४ वर्षांनंतर धरणाचे पाणलोट क्षेत्र कोरडे पडले आहे. धरणाचा चौथा व्हॉल्व्हही उघडा पडण्याच्या मार्गावर येऊन पोहोचला आहे.महान धरणाचा एकूण बुडीत क्षेत्र १२४३ हेक्टर असून, यामधून शेकडो हेक्टर बुडीत क्षेत्र आज रोजी उघड्यावर पडलेले दिसत आहे. महान धरणाच्या काठावर असलेले जांभरूण, कोथळी, वरखेड-देवदरी, धानोरा व फेट्रा या गावांतील पाणलोट क्षेत्र पूर्णपणे उघड्यावर पडलेले आहे. तसेच धरणामधील पुनर्वसन झालेले जुने गाव कोपळी, साथळी व वाघा या गावांची जागा उघड्यावर येऊन दीपमाया मंदिरदेखील संपूर्णपणे कोरडेठण्ण झाले आहे.श्रीक्षेत्र महादेव संस्थान वाघाकडील धरणाचे बुडीत क्षेत्र उघड्यावर पडले असून, गंगामातेच्या मंदिरापासून पाणी शेकडो फूट दूर गेल्याने धरणामधील टेकड्यासुद्धा उघड्या पडल्या आहेत. काटेपूर्णा अभयारण्य असून, वन्यजीव विभागामार्फत धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये पक्ष्यांना बसण्यासाठी पक्षी थांबे उभारण्यात आले आहेत. मालेगाव परिसरातून येणारी काटाकोंडाळा नदीचे पात्र कोरडे असल्याने आज रोजी गुरेढोरे चरताना दिसत आहेत. महान धरणाची अशी परिस्थिती याअगोदर २००५ मध्ये झाली होती. तब्बल १४ वर्षांच्या कालावधीनंतर यावर्षी तीच परिस्थिती पाहावयास मिळत आहे. ज्या ठिकाणी नेहमी धरणाचे पाणी दिसायचे, त्या ठिकाणी आज रोजी हिरवेगार गवत दिसत आहे.मालेगाव परिसरात दमदार मुसळधार पावसाची महान धरणाला आज रोजी अत्यंत आवश्यकता आहे. मालेगाव पाणलोट क्षेत्र ते महान धरण यादरम्यान असलेले १० लघू तलाव १०० टक्के भरल्याशिवाय त्या भागातील पाणी काटाकोंडाळा नदीने महान धरणात येऊ शकणार नाही. सर्वप्रथम हे १० लघू तलाव १०० टक्के भरणे खूप गरजेचे आहे. त्यानंतरच या भागातील पाणी काटाकोंडळा नदीपात्रातून वाहून पाणी सरळ महान धरणात येऊन मिसळणार, हे विशेष. सध्या सुरू असलेले पावसाचे पाणी असेच कासव गतीने पडल्यास महान धरणाच्या जलसाठ्यात वाढ न होता उपलब्ध असलेला जिवंत जलसाठ्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊन शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल.  

अकोला शहरावर पाणीटंंचाईचे संकट कायमच!महान धरणाच्या जलसाठ्याची झपाट्याने घट होत असल्याने अकोला शहरावर त्याचे सावट निर्माण झाले आहे. गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी धरणाच्या बुडीत क्षेत्रातून पाणी दिल्या जाते; परंतु यावर्षी पावसाला दोन महिने होत असूनही, धरणाच्या पाणी पातळीत तीळमात्रही वाढ न होऊ शकल्यामुळे शेतकरी वर्गसुद्धा मोठ्या संकटात सापडला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण