शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महान धरणाचे पाणलोट क्षेत्र पडले उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:07 IST

महान : काटेपूर्णा धरणाच्या क्षेत्रात दीड महिना लोटूनही पाऊस न झाल्याने धरणात केवळ ३ टक्के जलसाठा असून, १४ वर्षांनंतर धरणाचे पाणलोट क्षेत्र कोरडे पडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमहान : काटेपूर्णा धरणाच्या क्षेत्रात दीड महिना लोटूनही पाऊस न झाल्याने धरणात केवळ ३ टक्के जलसाठा असून, १४ वर्षांनंतर धरणाचे पाणलोट क्षेत्र कोरडे पडले आहे. धरणाचा चौथा व्हॉल्व्हही उघडा पडण्याच्या मार्गावर येऊन पोहोचला आहे.महान धरणाचा एकूण बुडीत क्षेत्र १२४३ हेक्टर असून, यामधून शेकडो हेक्टर बुडीत क्षेत्र आज रोजी उघड्यावर पडलेले दिसत आहे. महान धरणाच्या काठावर असलेले जांभरूण, कोथळी, वरखेड-देवदरी, धानोरा व फेट्रा या गावांतील पाणलोट क्षेत्र पूर्णपणे उघड्यावर पडलेले आहे. तसेच धरणामधील पुनर्वसन झालेले जुने गाव कोपळी, साथळी व वाघा या गावांची जागा उघड्यावर येऊन दीपमाया मंदिरदेखील संपूर्णपणे कोरडेठण्ण झाले आहे.श्रीक्षेत्र महादेव संस्थान वाघाकडील धरणाचे बुडीत क्षेत्र उघड्यावर पडले असून, गंगामातेच्या मंदिरापासून पाणी शेकडो फूट दूर गेल्याने धरणामधील टेकड्यासुद्धा उघड्या पडल्या आहेत. काटेपूर्णा अभयारण्य असून, वन्यजीव विभागामार्फत धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये पक्ष्यांना बसण्यासाठी पक्षी थांबे उभारण्यात आले आहेत. मालेगाव परिसरातून येणारी काटाकोंडाळा नदीचे पात्र कोरडे असल्याने आज रोजी गुरेढोरे चरताना दिसत आहेत. महान धरणाची अशी परिस्थिती याअगोदर २००५ मध्ये झाली होती. तब्बल १४ वर्षांच्या कालावधीनंतर यावर्षी तीच परिस्थिती पाहावयास मिळत आहे. ज्या ठिकाणी नेहमी धरणाचे पाणी दिसायचे, त्या ठिकाणी आज रोजी हिरवेगार गवत दिसत आहे.मालेगाव परिसरात दमदार मुसळधार पावसाची महान धरणाला आज रोजी अत्यंत आवश्यकता आहे. मालेगाव पाणलोट क्षेत्र ते महान धरण यादरम्यान असलेले १० लघू तलाव १०० टक्के भरल्याशिवाय त्या भागातील पाणी काटाकोंडाळा नदीने महान धरणात येऊ शकणार नाही. सर्वप्रथम हे १० लघू तलाव १०० टक्के भरणे खूप गरजेचे आहे. त्यानंतरच या भागातील पाणी काटाकोंडळा नदीपात्रातून वाहून पाणी सरळ महान धरणात येऊन मिसळणार, हे विशेष. सध्या सुरू असलेले पावसाचे पाणी असेच कासव गतीने पडल्यास महान धरणाच्या जलसाठ्यात वाढ न होता उपलब्ध असलेला जिवंत जलसाठ्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊन शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल.  

अकोला शहरावर पाणीटंंचाईचे संकट कायमच!महान धरणाच्या जलसाठ्याची झपाट्याने घट होत असल्याने अकोला शहरावर त्याचे सावट निर्माण झाले आहे. गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी धरणाच्या बुडीत क्षेत्रातून पाणी दिल्या जाते; परंतु यावर्षी पावसाला दोन महिने होत असूनही, धरणाच्या पाणी पातळीत तीळमात्रही वाढ न होऊ शकल्यामुळे शेतकरी वर्गसुद्धा मोठ्या संकटात सापडला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण