शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कलेमुळे कसे जगायचे ते कळते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:52 IST

प्रत्येक जण आपल्या उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करत असतो. ते पोटापाण्याचे साधन असते; मात्र आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांना, आपण जोपासलेल्या छंदाला आपण वेळ दिला, ती जोपासली तर कशासाठी जागायचे, याचे भान कलेमधून मिळते. बदलत्या काळात माध्यमांचे स्वरूप बदलले, अनेक स्थित्यंतरे झालीत; मात्र कलेवर प्रेम करणारे व त्यासाठी जिवापाड मेहनत करणारे आजही आहेत. याचे प्रत्यंतर अकोल्यात विश्‍वास करंडकाच्या निमित्ताने आले आहे.

ठळक मुद्देविजय दळवी यांचे प्रतिपादन विश्‍वास करंडक बालनाट्य स्पध्रेला थाटात प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: प्रत्येक जण आपल्या उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करत असतो. ते पोटापाण्याचे साधन असते; मात्र आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांना, आपण जोपासलेल्या छंदाला आपण वेळ दिला, ती जोपासली तर कशासाठी जागायचे, याचे भान कलेमधून मिळते. बदलत्या काळात माध्यमांचे स्वरूप बदलले, अनेक स्थित्यंतरे झालीत; मात्र कलेवर प्रेम करणारे व त्यासाठी जिवापाड मेहनत करणारे आजही आहेत. याचे प्रत्यंतर अकोल्यात विश्‍वास करंडकाच्या निमित्ताने आले आहे. बालनाट्य चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेला हा विश्‍वास करंडक बाल कलाकारांमध्ये विश्‍वास निर्माण करण्यचे काम करून निश्‍चितच पुरुषोत्तम करंडकसारखा नावलौकिक मिळवेल, असा आशावाद आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी तथा प्रख्यात साहित्यिक विजय दळवी यांनी व्यक्त केला. स्थानिक प्रमिलाताई ओक हॉलमध्ये विश्‍वास करंडकाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधु जाधव, ‘ज्ञान हब’च्या संचालिका स्वर्णलता राठी, जेआरडी टाटा स्कूलचे संचालक प्रशांत गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते. दळवी यांनी विश्‍वास करंडक स्पर्धा ही बालनाट्य चळवळीला गतिमान करण्याचे काम करेल, असे स्पष्ट करून अकोल्याच्या नाट्य क्षेत्राचा थोडक्यात आढावा घेतला.  प्रा. मधु जाधव यांनी विश्‍वास करंडकाच्या निमित्ताने बालनाट्य लेखकांनाही नवी प्रेरणा मिळाली असून, ही स्पर्धा  बालकलाकारांमधील प्रतिभेचा शोध घेणारा उपक्रम ठरेल, अशा आशा पल्लवित झाल्याचे स्पष्ट केले. प्रास्ताविकात प्रशांत गावंडे यांनी विश्‍वास करंडकामागील भूमिका स्पष्ट करून स्पध्रेच्या नियमावलीवर प्रकाश टाकला. या स्पध्रेत ३७ बालनाट्य सहभागी झाले आहेत. ही चांगली सुरुवात असल्याचे स्पष्ट केले. यावेळी जेआरडी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी नांदी सादर करून या स्पध्रेचा शुभांरभ केला. सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रशांत गावंडे, प्रा. मधू जाधव, डॉ. सुनील गजरे, प्रदीप खाडे, अविनाश पाटील, हिरल गावंडे, प्रतिभा फोकमारे, स्नेहल गावंडे, विद्या गाडगे, अरुण गावंडे, रितेश महल्ले, नीलेश गाडगे, दिनेश अवारे, माधव जोशी, अविनाश कुळकर्णी, अमोल सावंत, लिलाधर तायडे, सुमित पांडे यांचे सहकार्य लाभत आहे. कार्यक्रमाचे संचालन, आभारप्रदर्शन आदिती बनसोड व प्रतिषा गावंडे यांनी केले.

बालकलावंतांनी रसिकांना जिंकले! पातूर तालुक्यातील शिर्ला येथील एजुविला स्कुलच्या विद्यार्थ्यांनी ‘छान छोटे, वाईट मोठे’ हे नाटक प्रथम सादर करून स्पर्धेचा शुभारंभ केला. दिवसभरचाललेल्या या स्पर्धेत लढाईला गेला राजा, पर्यावरणाचा वाजला बाजा, पर्याय म्हणून फाशीच का?, दारूने मेला वं माय, नया आगाज, रणरागिणीचे बलिदान, ओम मित्रायं नम:, सार्वजनिक उत्सवांचा बिगुल, स्वप्न कश्मकश, श्यामची आई ही नाटके सादर करण्यात आली. ७, ८, ९ व ११ सप्टेंबर असे चार दिवस सदर स्पर्धा चालणार आहे. रोज सकाळी १0 वाजतापासून स्पर्धेतील नाटके सादर करण्यात येतील. सदर स्पर्धेत परीक्षक म्हणून अशोक ढेरे, गिरीष पडके व सतीन माजिरे हे नाट्य क्षेत्रातील दिग्गज काम करीत आहेत. 

८ सप्टेंबर रोजी होणारी नाटकेमी तुमची मुलगी बोलते, मला पण बोलू द्या, घुसमट, नो दि वर्ल्ड, एकच प्रेरणा महत्वाची, बेटी बचाव, प्रकाशवाट, ताई सोहनचे स्वप्न