शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीला बसला ‘हिट शॉक’

By admin | Updated: July 3, 2015 23:27 IST

कृषी विद्यापीठाचा निष्कर्ष, लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात.

विवेक चांदूरकर/ अकोला : विदर्भात लाखो हेक्टरवर पेरणी करण्यात आलेल्या कपाशीची झाडे सुकत आहेत. कोणताही रोग नसताना झाडे सुकण्याच्या प्रकारात वाढ होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाची दांडी आणि तापमान वाढीमुळे कपाशीच्या रोपांना 'हिट शॉक' बसल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. विदर्भात ओलिताची व्यवस्था असलेल्या शेतकर्‍यांनी लाखो हेक्टरवर १५ मे ते जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात कपाशीची पेरणी केली. दरवर्षीच मोठय़ा प्रमाणात विदर्भात कपाशीची धूळ पेरणी करण्यात येते. पावसाळ्यात आलेल्या पावसाचा या पिकांना फायदा होतो व उत्पादनात वाढ होते; मात्र यावर्षी धूळ पेरणी केलेल्या या कपाशीची रोपे सुकायला लागली. दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. शेतकर्‍यांनी तक्रार केल्यानंतर कृषी विभागाने कपाशीच्या रोपट्यांचे नमुने तपासणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे पाठविले. विद्यापीठाच्या चमूने रोपांच्या नमुन्यांची तपासणी केली आणि शेतात जाऊन पाहणीही केली. त्यानंतर कपाशीच्या रोपांना हिट शॉक बसल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला. मे महिन्यात विदर्भात ४0 डिग्रीपेक्षा जास्त तापमान होते. जूनच्या पहिल्या आवठड्यातही तापमान कायम होते. जूनच्या दुसर्‍या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर पावसाने दडी मारली असून, तापमानात पुन्हा वाढ झाली. त्यामुळे कपाशीची रोपे सुकत आहेत. कपाशीची रोपे ३४ ते ३५ डिग्री तापमानात तग धरू शकतात; मात्र मे महिना व जूनच्या पहिल्या आठवड्यात तापमान ४0 डिग्रीपेक्षा जास्त होते, त्यामुळे रोपे सुकत आहेत. आता पाऊस येत नसल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट आहे. ओलिताची सोय असलेले शेतकरी पिकांना पाणी देत असले, तरी तापमानात वाढ कायम आहे. त्यामुळे रोपे सुकण्याचा प्रकार सुरूच आहे. कपाशीवर कोणताही रोग आला नसल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले. यासंदर्भात कृषी विद्यापीठाचे संशोधक टी एच राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कपाशीची रोपे ३५ डिग्री तापमानापर्यंत तग धरू शकतात; मात्र मे महिन्यात कपाशीची पेरणी करण्यात आली, त्यावेळी तापमान जास्त होते. याशिवाय गत आठ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने तापमान वाढले आहे. परिणामी कपाशीला हिट शॉक बसला असून, त्यामुळे रोपे सुकत असल्याचे स्पष्ट केले.

*एक आठवड्यात रोपे जळतील

     तापमान जास्त असल्यामुळे कपाशीची रोपे जळत आहेत. शेतात दिसत असलेल्या या रोपांची वाढ होत नाही. ही रोपे पूर्णत: मृत झाली नाही; मात्र रोपे जगणारही नाहीत. एका आठवड्यात ती पूर्णत: जळणार आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे.

*मॉन्सूनमध्ये पेरणी केलेल्या कपाशीवर परिणाम नाही

         मॉन्सूनच्या पावसानंतर, जूनच्या पंधरवड्यानंतर कपाशीची पेरणी केलेल्या कपाशीची रोपे चांगल्या अवस्थेत असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे. मे महिन्यात पेरणी करण्यात आलेल्या रोपांनाच हिट शॉक बसला असून, ही रोपे जळत असल्याचे त्यांनी सांगितले.