शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

कपाशीला बसला ‘हिट शॉक’

By admin | Updated: July 3, 2015 23:27 IST

कृषी विद्यापीठाचा निष्कर्ष, लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात.

विवेक चांदूरकर/ अकोला : विदर्भात लाखो हेक्टरवर पेरणी करण्यात आलेल्या कपाशीची झाडे सुकत आहेत. कोणताही रोग नसताना झाडे सुकण्याच्या प्रकारात वाढ होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाची दांडी आणि तापमान वाढीमुळे कपाशीच्या रोपांना 'हिट शॉक' बसल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. विदर्भात ओलिताची व्यवस्था असलेल्या शेतकर्‍यांनी लाखो हेक्टरवर १५ मे ते जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात कपाशीची पेरणी केली. दरवर्षीच मोठय़ा प्रमाणात विदर्भात कपाशीची धूळ पेरणी करण्यात येते. पावसाळ्यात आलेल्या पावसाचा या पिकांना फायदा होतो व उत्पादनात वाढ होते; मात्र यावर्षी धूळ पेरणी केलेल्या या कपाशीची रोपे सुकायला लागली. दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. शेतकर्‍यांनी तक्रार केल्यानंतर कृषी विभागाने कपाशीच्या रोपट्यांचे नमुने तपासणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे पाठविले. विद्यापीठाच्या चमूने रोपांच्या नमुन्यांची तपासणी केली आणि शेतात जाऊन पाहणीही केली. त्यानंतर कपाशीच्या रोपांना हिट शॉक बसल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला. मे महिन्यात विदर्भात ४0 डिग्रीपेक्षा जास्त तापमान होते. जूनच्या पहिल्या आवठड्यातही तापमान कायम होते. जूनच्या दुसर्‍या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर पावसाने दडी मारली असून, तापमानात पुन्हा वाढ झाली. त्यामुळे कपाशीची रोपे सुकत आहेत. कपाशीची रोपे ३४ ते ३५ डिग्री तापमानात तग धरू शकतात; मात्र मे महिना व जूनच्या पहिल्या आठवड्यात तापमान ४0 डिग्रीपेक्षा जास्त होते, त्यामुळे रोपे सुकत आहेत. आता पाऊस येत नसल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट आहे. ओलिताची सोय असलेले शेतकरी पिकांना पाणी देत असले, तरी तापमानात वाढ कायम आहे. त्यामुळे रोपे सुकण्याचा प्रकार सुरूच आहे. कपाशीवर कोणताही रोग आला नसल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले. यासंदर्भात कृषी विद्यापीठाचे संशोधक टी एच राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कपाशीची रोपे ३५ डिग्री तापमानापर्यंत तग धरू शकतात; मात्र मे महिन्यात कपाशीची पेरणी करण्यात आली, त्यावेळी तापमान जास्त होते. याशिवाय गत आठ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने तापमान वाढले आहे. परिणामी कपाशीला हिट शॉक बसला असून, त्यामुळे रोपे सुकत असल्याचे स्पष्ट केले.

*एक आठवड्यात रोपे जळतील

     तापमान जास्त असल्यामुळे कपाशीची रोपे जळत आहेत. शेतात दिसत असलेल्या या रोपांची वाढ होत नाही. ही रोपे पूर्णत: मृत झाली नाही; मात्र रोपे जगणारही नाहीत. एका आठवड्यात ती पूर्णत: जळणार आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे.

*मॉन्सूनमध्ये पेरणी केलेल्या कपाशीवर परिणाम नाही

         मॉन्सूनच्या पावसानंतर, जूनच्या पंधरवड्यानंतर कपाशीची पेरणी केलेल्या कपाशीची रोपे चांगल्या अवस्थेत असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे. मे महिन्यात पेरणी करण्यात आलेल्या रोपांनाच हिट शॉक बसला असून, ही रोपे जळत असल्याचे त्यांनी सांगितले.