शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

कपाशीला बसला ‘हिट शॉक’

By admin | Updated: July 3, 2015 23:27 IST

कृषी विद्यापीठाचा निष्कर्ष, लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात.

विवेक चांदूरकर/ अकोला : विदर्भात लाखो हेक्टरवर पेरणी करण्यात आलेल्या कपाशीची झाडे सुकत आहेत. कोणताही रोग नसताना झाडे सुकण्याच्या प्रकारात वाढ होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाची दांडी आणि तापमान वाढीमुळे कपाशीच्या रोपांना 'हिट शॉक' बसल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. विदर्भात ओलिताची व्यवस्था असलेल्या शेतकर्‍यांनी लाखो हेक्टरवर १५ मे ते जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात कपाशीची पेरणी केली. दरवर्षीच मोठय़ा प्रमाणात विदर्भात कपाशीची धूळ पेरणी करण्यात येते. पावसाळ्यात आलेल्या पावसाचा या पिकांना फायदा होतो व उत्पादनात वाढ होते; मात्र यावर्षी धूळ पेरणी केलेल्या या कपाशीची रोपे सुकायला लागली. दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. शेतकर्‍यांनी तक्रार केल्यानंतर कृषी विभागाने कपाशीच्या रोपट्यांचे नमुने तपासणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे पाठविले. विद्यापीठाच्या चमूने रोपांच्या नमुन्यांची तपासणी केली आणि शेतात जाऊन पाहणीही केली. त्यानंतर कपाशीच्या रोपांना हिट शॉक बसल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला. मे महिन्यात विदर्भात ४0 डिग्रीपेक्षा जास्त तापमान होते. जूनच्या पहिल्या आवठड्यातही तापमान कायम होते. जूनच्या दुसर्‍या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर पावसाने दडी मारली असून, तापमानात पुन्हा वाढ झाली. त्यामुळे कपाशीची रोपे सुकत आहेत. कपाशीची रोपे ३४ ते ३५ डिग्री तापमानात तग धरू शकतात; मात्र मे महिना व जूनच्या पहिल्या आठवड्यात तापमान ४0 डिग्रीपेक्षा जास्त होते, त्यामुळे रोपे सुकत आहेत. आता पाऊस येत नसल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट आहे. ओलिताची सोय असलेले शेतकरी पिकांना पाणी देत असले, तरी तापमानात वाढ कायम आहे. त्यामुळे रोपे सुकण्याचा प्रकार सुरूच आहे. कपाशीवर कोणताही रोग आला नसल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले. यासंदर्भात कृषी विद्यापीठाचे संशोधक टी एच राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कपाशीची रोपे ३५ डिग्री तापमानापर्यंत तग धरू शकतात; मात्र मे महिन्यात कपाशीची पेरणी करण्यात आली, त्यावेळी तापमान जास्त होते. याशिवाय गत आठ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने तापमान वाढले आहे. परिणामी कपाशीला हिट शॉक बसला असून, त्यामुळे रोपे सुकत असल्याचे स्पष्ट केले.

*एक आठवड्यात रोपे जळतील

     तापमान जास्त असल्यामुळे कपाशीची रोपे जळत आहेत. शेतात दिसत असलेल्या या रोपांची वाढ होत नाही. ही रोपे पूर्णत: मृत झाली नाही; मात्र रोपे जगणारही नाहीत. एका आठवड्यात ती पूर्णत: जळणार आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे.

*मॉन्सूनमध्ये पेरणी केलेल्या कपाशीवर परिणाम नाही

         मॉन्सूनच्या पावसानंतर, जूनच्या पंधरवड्यानंतर कपाशीची पेरणी केलेल्या कपाशीची रोपे चांगल्या अवस्थेत असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे. मे महिन्यात पेरणी करण्यात आलेल्या रोपांनाच हिट शॉक बसला असून, ही रोपे जळत असल्याचे त्यांनी सांगितले.