शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

महाराष्ट्रात कबड्डी अकादमी सुरू  कराव्या - विजय जाधव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 01:51 IST

अकोला : महाराष्ट्रात कबड्डीसाठी पोषक वातावरण आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रातून उत्कृष्ट खेळाडू तयार होण्याकरिता प्रत्येक जिल्हय़ात एक कबड्डी अकादमी शासनाने सुरू  करावी. यासाठी महाराष्ट्र कबड्डी फेडरेशनचे तसेच नामवंत ज्येष्ठ कबड्डीपटूंचे सहकार्य घ्यावे, असे मत कबड्डीचे महागुरू  विजय जाधव यांनी ‘लोकमत’शी विशेष बातचीत करताना व्यक्त केले.

ठळक मुद्देकबड्डीचे महागुरू  विजय जाधव यांचे मत

नीलिमा शिंगणे-जगड । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्रात कबड्डीसाठी पोषक वातावरण आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रातून उत्कृष्ट खेळाडू तयार होण्याकरिता प्रत्येक जिल्हय़ात एक कबड्डी अकादमी शासनाने सुरू  करावी. यासाठी महाराष्ट्र कबड्डी फेडरेशनचे तसेच नामवंत ज्येष्ठ कबड्डीपटूंचे सहकार्य घ्यावे, असे मत कबड्डीचे महागुरू  विजय जाधव यांनी ‘लोकमत’शी विशेष बातचीत करताना व्यक्त केले.खासदार चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेनिमित्त शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त विजय जाधव केळीवेळी (अकोला) येथे आले आहेत. हरयाणाच्या खेळाडूंचे सध्या कबड्डीवर वर्चस्व आहे. उत्तम शारीरिक क्षमता आणि कठोर मेहनत घेण्याची खेळाडूंची तयारी असते. त्याहीपेक्षा शासनाने साई प्रशिक्षण केंद्र आणि कबड्डी अकादमी स्थापन केल्या आहेत. तेथील प्रशिक्षण, क्रीडा सुविधांचा लाभ निश्‍चितच खेळाडूंना होतो, असेही जाधव म्हणाले.विदर्भ ही कबड्डीची पंढरी आहे. विदर्भाच्या खाणीमध्ये नीळकंठ खानझोडे, प्यारेलाल पवार, देवी सरभरे, अनिल भुते, रामभाऊ पोवार, प्रकाश बोलाखे, वासुदेव नेरकर, गुलाबराव गावंडे, नंदू पाटील, वासुदेव गरवाले, शरद नेवारे, शेखर पाटील, आमिर खान पठाण, मुश्ताक खान, काशीनाथ रिठे असे अनेक हिरे कबड्डीत जन्माला आलेले आहेत. विदर्भात पूर्वी भारतातील ८0 टक्के ऑल इंडिया कबड्डी स्पर्धा विदर्भातच व्हायच्या. यवतमाळ, नागपूर, दिग्रस, मूर्तिजापूर, बडनेरा, अमरावती, पांढरकवडा, वर्धा, कारंजा, अकोला येथे सातत्याने स्पर्धांचे यशस्वी आयोजन व्हायचे. आता विदर्भात कबड्डी सामने फारसे होत नाहीत. आयोजन खर्चाचे बजेट हे त्यामागचे कारण आहे, अशी खंत जाधव यांनी व्यक्त केली.१९५४ ते १९७४ पर्यंत महाराष्ट्राचे कर्णधारपद मुंबईकडे होते. तब्बल २0 वर्षानंतर कोल्हापूरकडे हे कर्णधारपद आणणारे विजय जाधव पहिले खेळाडू ठरले. महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषविताना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सामने जिंकले. एलआयसीमधून सेवानवृत्त झाल्यानंतर कोल्हापूरला महालक्ष्मी क्लब आणि श्री शिवाजी उदय मंडळ चालू केले. खेळाडूंना पूर्णवेळ प्रशिक्षण देणे सुरू  केले. अनेक राष्ट्रीय खेळाडू निर्माण झालेत. यामधूनच शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त उमा भोसले, मुक्ता चौगुले आणि दादोजी कोंडदेव पुरस्कारप्राप्त तथा थायलंड महिला विश्‍वचषक विजेता संघाचे प्रशिक्षक रमेश भेंडेगिरी (सध्या दिल्ली दबंग प्रशिक्षक) सारखे कबड्डीचे महारथी घडले. तसेच या संस्थांमधून कबड्डी सोबतच सायकलिंग व कॅरमचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरKabaddiकबड्डी