शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आत्महत्यांच्या अंधारातील ‘ज्योती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 02:33 IST

नवदुर्गेच्या संघर्षाची प्रेरणादायी कथा.

नीलिमा शिंगणे-जगड अकोला, दि. 0२- शेतीतील कर्जबाजारीपणामुळे सहा वर्षांत पती, दीर आणि सासर्‍याने आत्महत्या केली. सारं आयुष्यच उद्ध्वस्त झालेल्या एका सामान्य महिलेने गेल्या नऊ वर्षांत आपल्या घरासह शेतीचा नेटाने सांभाळ करीत ह्यप्रगतिशील शेतकरीह्ण असा पल्ला गाठला. संकटं आणि दु:ख पचवत नियतीवर मात करणार्‍या ज्योती देशमुख या शेतीतल्या नवदुर्गेच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कथा.२00१ ते २00७ ही सहा वर्ष या माउलीचे अक्षरश: सर्वस्व हिरावून घेणारी ठरली. अकोला जिल्ह्यातील कट्यार गावातील ज्योती देशमुख यांचं पारंपरिक शेती करणारं एकत्रित शेतकरी कुटुंब. घरी २९ एकर वडिलोपार्जित शेती. घरात सासरे पुरुषोत्तम, दीर सुनील आणि पती संतोष, दोन जावा आणि दोन भावांचे एक मुलगा-मुलगी असं ह्यगोकुळाह्णसारखं कुटुंब. पण, २00१ पासून या घरावर नियती आणि आणि परिस्थितीने असे काही आघात केले, की ऐकून आपल्या काळजाचा ठोकाच चुकावा. शेतीतील नापिकीमुळे ज्योती यांचे सासरे पुरुषोत्तम यांनी २00१ मध्ये आत्महत्या केली. तेथून तीन वर्षांनी २00४ मध्ये त्यांचे दीर सुनील यांनी शेती आणि व्यवसायातील अपयशामुळे मृत्युला कवटाळले. यानंतर ज्योती यांचे पती संतोष यांचा पत्नीच्या मदतीने संकटांना तोंड देण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, शेतीतील नापिकीचा फेरा संपता संपत नव्हता. अन् यातच हतबल झालेल्या संतोष यांनी २00७ मध्ये आत्महत्येचाच मार्ग निवडला. ज्योती यांच्यावर तर जणू आभाळच कोसळलं. दहा-बारा वर्षांचा मुलगा हेमंत, दिराची पत्नी आणि मुलगी आणि २९ एकर शेतीसह घराचा गाडा हाकण्याचे आभाळभर आव्हान त्यांच्यासमोर होते. पती असताना कधी घराचा उंबरठा न ओलांडणार्‍या ज्योती यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शेतीतील कोणतंच ज्ञान नसल्यानं आपल्याला हे खरंच झेपणार का? असा प्रश्न त्यांना पडायचा. ज्योतीताईंचा शेती करण्याचा निर्णय अनेक आव्हानांनी भरलेला होता. मात्र, ध्येय निश्‍चित केलेल्या ज्योतीताईंनी हा खाचखळग्यांचा प्रवास जिद्दीने सुरू ठेवला. पतीच्या आ त्महत्येनंतर अनेकांनी त्यांना शेती विकण्याचा सल्ला दिला. यासाठी दबाव, धमक्यांचाही वापर करण्यात आला. गावातील एका नातेवाईकाने तर शेती हडपण्याचाही प्रयत्न केला. पण, त्यांनी या सर्व संकटांना परतवून लावत शेती कसण्याला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना बियाणे, पीक पद्धती, खते, बाजार, कीटकनाशके याविषयी काहीच ज्ञान नव्हते. मात्र, शिकण्याची जिद्द असलेल्या ज्योती यांनी हळूहळू शेतीतील बारकावे आणि यशाचे अनेक मूलमंत्र आत्मसात केले. कापूस, सोयाबीन, तूर, या पारंपरिक िपकांच्या साथीने आपली शेती सुरू केली. शेतात बोअर केल्यानंतर खारपाणपट्टा असलेल्या त्यांच्या शेतात गोडे पाणी लागले, वीजही आली. त्यामुळे ज्योतीताईंनी बागायती शेती सुरू केली. दहावीपयर्ंत शिक्षण झालेल्या ज्योतीताई पतीच्या निधनापयर्ंत शेती आणि व्यावहारिक जगातील गोष्टींपासून अनभिज्ञ होत्या. आता स्वत:च दुचाकीने शेतात जातात. बैलगाडी जुंपण्यापासून, तर शेतातील प्रत्येक काम ज्योतीताई लिलया करतात. घरातील कर्त्या पुरुषांच्या अकाली निधनाने त्यांच्यावर कुटुंबप्रमुखाचीही जबाबदारी आली. ज्योती यांनी मुलगा हेमंतला संगणक अभियंता बनविले. तसेच दिराच्या मुलीला आकोट येथे तिच्या आईसह शिक्षणासाठी ठेवले. शेतीच्या भरवशावरच त्यांनी नवं घर बांधलं. तर लवकरच शेतातील कामासाठी त्या स्वत:चा ट्रॅक्टर घेणार आहेत.ज्योतीताईंच्या संघर्षाला समाजही सलाम करू लागला. त्यांच्या शेतीतील नव्या प्रयोगांबद्दल आणि योगदानाबद्दल त्यांचा अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्या पीठाने यशस्वी शेतकरी म्हणून गौरव केला. याशिवाय जिल्हा पोलीस दलाने त्यांचा ह्यजननी सप्ताहाह्णत विशेष सत्कार केला. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत नियतीवर मात करणार्‍या ज्योतीताई यांनी परिस्थितीने हतबल झालेल्या महिलांना ह्यउमेद हरू नका, संघर्ष करत राहाह्ण असा संदेश दिला.