शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

न्यायव्यवस्था नागरिक आणि सामाजिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू - लोढा

By admin | Updated: February 8, 2016 02:33 IST

राष्ट्रीय परिषदेत माजी सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांचे प्रतिपादन; तीन दशकांमध्ये न्यायव्यवस्थेत झालेल्या परिवर्तनावर मार्गदर्शन.

अकोला: नागरिक आणि सामाजिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू न्यायव्यवस्था असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांनी व्यक्त केले. अकोला एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित अकोला विधी महाविद्यालयाच्यावतीने ६ व ७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयाच्या टिळक सभागृहात आयोजित या द्विदिवसीय परिषदेत रविवार, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १0.३0 वाजता सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांनी ह्यसामाजिक परिवर्तनात सर्वोच्च न्यायव्यवस्थेची भूमिकाह्ण या विषयावर विशेष मार्गदर्शन केले तसेच सामाजिक न्यायव्यवस्था व भारतीय संविधान यांच्यात झालेल्या परिवर्तनाची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अकोला एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब मांडवगणे, वरिष्ठ अधिकारी जी. बी. लोहिया, डॉ. एस. सी. भंडारी उपस्थित होते. माजी सरन्यायाधीश लोढा यांची ओळख करून देताना महाविद्यालयाच्या प्राचार्या रत्ना चांडक यांनी सांगितले की, १९७३ मध्ये राजस्थान उच्च न्यायालयापासून लोढा यांनी त्यांच्या कारकिर्दीला प्रारंभ केला. सर्वोच्च न्यायालयातील कार्यकाळात त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध अनेक ऐतिहासिक निर्णय दिलेत. २00८ मध्ये पाटणा उच्च न्यायालयातून त्यांची नियुक्ती सरन्यायाधीश पदावर झाली. या कार्यकाळात त्यांनी अँसिड अँटॅक, कोल ब्लॉक, भ्रष्टाचार, शिक्षण अशा अनेक बाबींवर महत्त्वपूर्ण निर्णय दिलेत. न्यायाधीश लोढा पुढे म्हणाले की, २६ जानेवारी १९५0 पासून आजपर्यंत संविधानात नागरिकांच्या हिताचे अनेक बदल करण्यात आले. लोकतांत्रिक म्हणून ओळख असलेल्या भारतातील नागरिकांच्या न्यायव्यवस्थेसाठी अनेक पावले उचलण्यात आली. पहिली दोन दशके म्हणजे १९५0 ते १९७0 या काळात संविधानात संपत्तीच्या सुरक्षेसाठी गंभीरतेने विचार केला गेला. १९७0 ते १९८७ या संविधानाच्या दुसर्‍या टप्प्यात कैदेतील बलात्काराच्या प्रकरणांवर निर्बंध घातले गेले. तिसरा टप्पा १९८७ ते १९९0 हा राहिला. त्यामध्ये भ्रष्टाचारावर लगाम कसण्यात आला. याच काळात सर्वोच्च न्यायालयासमोर ह्यटू-जीह्णसारखे घोटाळे समोर आले. ह्यराज-बालाह्ण अँसिड अँटॅक हे प्रकरण जेव्हा लोढा समितीसमक्ष आले तेव्हा त्यावर गंभीर विचार केला गेला. याबाबत लोढा समितीने मांडलेले विचार व निर्णयावर १८ देशांच्या पंतप्रधान व राष्ट्रपतींनी सहमती दर्शविली होती.