शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

युती-आघाडी तुटणे कार्यकर्त्यांच्या जिव्हारी

By admin | Updated: September 30, 2014 00:17 IST

बुलडाणा जिल्ह्यातील मतदारांच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष : चर्चेचे गु-हाळ जाणीवपूर्वक लांबविले.

बुलडाणा : विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असताना भाजप-सेना यांच्यासह घटक पक्षांची महायुती दुभंगली व काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतही काडीमोड झाला. आता हे पक्ष एकमेकांच्या विरोधात स्वबळावर लढत आहेत; मात्र या चारही पक्षाच्या कार्यकर्त्यांना असे ह्यदुभंगणेह्ण जिव्हारी लागले आहे. लोकमतने आज खामगाव व बुलडाणा शहरात सर्वेक्षण केले असता युती किंवा आघाडी तुटायला पाहिजे होती काय? या प्रश्नावर ह्यनाहीह्ण असे उत्तर बहुमताने मिळाले आहे. यावरुन हा महाघटस्फोट कार्यकर्त्यांना आवडलेला नसल्याचे स्पष्ट होते. युती तुटायला नको होती, असे ८१ टक्के मतदारांना वाटते तर १९ टक्के मतदारांना युती तुटायलाच पाहिजे होती, असे मत होते. आघाडीच्या संदर्भातही आघाडी तुटायला हवी होती, असे म्हणणारे मतदार २७ टक्के तर नको होती, असे म्हणणारे मतदारांची संख्या ७३ टक्के आहे. युती आणि आघाडी दुभंगने अटळ होते; मात्र तरीही चर्चेचे गुर्‍हाळ सुरु ठेवले, असे युतीच्या संदर्भात ७0 टक्के नागरिकांना तर आघाडीच्या संदर्भात ६४ टक्के नागरिकांना वाटत आहे. तर याच प्रश्नाच्या संदर्भात २९ टक्के लोकांनी प्रतिक्रिया नोंदविण्यास नकार दिला आहे. स्वबळावर लढल्यामुळे कार्यकर्त्यांत राजकीय वैर वाढेल, असे ६६.६६ टक्के मतदारांना वाटते तर २२.६१ टक्के नाही म्हणतात, १४.२८ टक्के मतदारांना असे वैर वाढण्याची शक्यता वाटत आहे.