शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

भेटी लागी जीवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:14 IST

वयाच्या विसाव्या वर्षापासून पंढरीची वारी करत आलो आहे. पण गेल्या दोन वर्षापासून वारीत खंड पडला आहे. आषाढी आली की ...

वयाच्या विसाव्या वर्षापासून पंढरीची वारी करत आलो आहे. पण गेल्या दोन वर्षापासून वारीत खंड पडला आहे. आषाढी आली की मन पांडुरंगाच्या भेटीसाठी कासावीस होते. दरवर्षी आम्ही गावातून ७० ते ८० वारकरी जात होतो. यावर्षी जाता आले नसले, तरी मन मात्र पंढरीतच आहे. डोळ्यासमोर सतत पांडुरंगाचे सुंदर रुपडे आणि वारकऱ्यांचा आनंदसोहळा तरळत राहतो. कर्नाटकातील धारवाड, बेळगाव, मराठवाड्यातील वारकरी सख्यांच्या भेटीसाठी मन आतुर झाले आहे. कोरोना महामारीमुळे वारी चुकत असल्याची खंत मनात आहे. या विश्वातून काेरोनाचा नायनाट करावा, अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे. आषाढी हुकली, तरी कार्तिकीला नक्कीच पांडुरंगाचे रूप याचि देही याचि डोळा पाहता यावे, अशी आस मनी लागून आहे.

- रमेश महाराज इस्तापे, पारस

००००००००००

‘मनी लागलीया आस, कधी भेटसी जीवास,’ अशी स्थिती झाली आहे. आषाढी आली की मन पांडुरंग भेटीसाठी आतुर होते. गेल्यावर्षी पंढरीला जाता आले नाही. यावर्षी तरी जाता येईल, अशी आस मनाला लागून होती. परंतु, यंदाही पांडुरंगाची भेट नशिबी नाही. कोरोना महामारीने पांडुरंगासोबत वारकऱ्यांची ताटातूट झाली आहे. आजही पंढरपुरातील सोहळा डोळ्यासमोर उभा राहतो. आषाढी एक दिवसावर आली आणि आपण पंढरीला जाऊ शकत नाही, यामुळे मनाला हुरहूर वाटत आहे. येथूनच पांडुरंग चरणी माथा टेकतो. जयहरी.

- मदन महाराज राठोड, चिंचखेड