शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जनुना पुनर्वसन शेतशिवारात दूषित पाण्याने आठ शेळ्य़ा  ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:36 IST

सायखेड : जनुना पुनर्वसन शिवारात अज्ञात व्यक्तीने  कालबाह्य औषधांच्या बॉटल, सलाइन, मुदतबाह्य गोळ्या  एका नाल्यात फेकून दिल्या होत्या.त्यामुळे तलावातील  पाणी दुषित झाले होते. हे दुषित पाणी पिल्याने ८ शेळ्य़ा ठार  झाल्या तर २५ शेळ्यांचा गर्भपात झाल्याची घटना १५  ऑगस्ट रोजी घडली. गावातील इतरही गुरांना आजाराने  ग्रासले आहे. 

ठळक मुद्देमुदतबाह्य औषधसाठा टाकला साचलेल्या पाण्यात! शेळीपालन व्यवसाय करणार्‍या पशुपालकाच्या बकर्‍या 

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेड : जनुना पुनर्वसन शिवारात अज्ञात व्यक्तीने  कालबाह्य औषधांच्या बॉटल, सलाइन, मुदतबाह्य गोळ्या  एका नाल्यात फेकून दिल्या होत्या.त्यामुळे तलावातील  पाणी दुषित झाले होते. हे दुषित पाणी पिल्याने ८ शेळ्य़ा ठार  झाल्या तर २५ शेळ्यांचा गर्भपात झाल्याची घटना १५  ऑगस्ट रोजी घडली. गावातील इतरही गुरांना आजाराने  ग्रासले आहे. जनुना पुनर्वसन येथे पावसाळ्य़ाचे पाणी साचलेल्या  ठिकाणी अज्ञात इसमाने मुदतबाह्य औषध साठा टाकला.  ही औषध पाण्यात मिसळल्याने पाणी दुषित झाले.हे पाणी  तेथे चरण्यासाठी गेलेल्या शेळ्य़ांनी प्राशन केले. त्यामुळे,  त्यातील आठ शेळ्य़ांचा मृत्यू झाला तर २५ बकर्‍यांचा गर्भ पात झाला. तसेच अन्य गुरे आजारी पडले. यामध्ये प्रकाश  तुकाराम इंगळे या शेळीपालन व्यवसाय करणार्‍या पशु पालकाच्या सर्वाधिक बकर्‍या आहेत. या घटनेची माहिती  पशुसंवर्धन विभागाचे डॉ. बी. टी. अस्वार यांना देण्यात  आली. धाबा पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. रंजवे, रामराव  राठोड यांनी तातडीने जनुना येथे जाऊन आजारी बकर्‍यांवर  उपचार केले. सरकारी औषधसाठा कमी असल्यामुळे  बकर्‍यांना औषधे मिळू शकली नाहीत. पशुसंवर्धन  विभागाने आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून देऊन  आजारी व विषबाधेने गंभीर असलेल्या शेळ्य़ांवर उपचार  करावा, अशी मागणी पशुपालकांकडून केली जात आहे. 

१५ गुरांचा मृत्यूविझोरा : येथे अज्ञात आजाराने गत दहा दिवसांत  पंधराच्यावर जनावरांचा मृत्यू झाल्याने पशुपालकांत भीतीचे  वातावरण निर्माण झाले आहे. पशुधन विभागाने याची  वेळीच दखल घेऊन, या रोगाचे निदान लावून उपचार  करण्याची मागणी पशुपालकांमध्ये होत आहे.विशेषत: गाय व वासरांना या अज्ञात आजाराने ग्रासले  आहे. एकाकी एका पायावर सुज येऊन त्यामध्ये तत्काळ  जनावरांचा अचानक मृत्यू होतो. आतापर्यंत गाय व त्यांच्या  वासरांचा मृत्यू झाला आहे. या अज्ञात आजाराने पशु पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रोजच  दोन ते तीन जनावरे दगावण्याच्या घटना घडत आहेत.