शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

जनुना पुनर्वसन शेतशिवारात दूषित पाण्याने आठ शेळ्य़ा  ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:36 IST

सायखेड : जनुना पुनर्वसन शिवारात अज्ञात व्यक्तीने  कालबाह्य औषधांच्या बॉटल, सलाइन, मुदतबाह्य गोळ्या  एका नाल्यात फेकून दिल्या होत्या.त्यामुळे तलावातील  पाणी दुषित झाले होते. हे दुषित पाणी पिल्याने ८ शेळ्य़ा ठार  झाल्या तर २५ शेळ्यांचा गर्भपात झाल्याची घटना १५  ऑगस्ट रोजी घडली. गावातील इतरही गुरांना आजाराने  ग्रासले आहे. 

ठळक मुद्देमुदतबाह्य औषधसाठा टाकला साचलेल्या पाण्यात! शेळीपालन व्यवसाय करणार्‍या पशुपालकाच्या बकर्‍या 

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेड : जनुना पुनर्वसन शिवारात अज्ञात व्यक्तीने  कालबाह्य औषधांच्या बॉटल, सलाइन, मुदतबाह्य गोळ्या  एका नाल्यात फेकून दिल्या होत्या.त्यामुळे तलावातील  पाणी दुषित झाले होते. हे दुषित पाणी पिल्याने ८ शेळ्य़ा ठार  झाल्या तर २५ शेळ्यांचा गर्भपात झाल्याची घटना १५  ऑगस्ट रोजी घडली. गावातील इतरही गुरांना आजाराने  ग्रासले आहे. जनुना पुनर्वसन येथे पावसाळ्य़ाचे पाणी साचलेल्या  ठिकाणी अज्ञात इसमाने मुदतबाह्य औषध साठा टाकला.  ही औषध पाण्यात मिसळल्याने पाणी दुषित झाले.हे पाणी  तेथे चरण्यासाठी गेलेल्या शेळ्य़ांनी प्राशन केले. त्यामुळे,  त्यातील आठ शेळ्य़ांचा मृत्यू झाला तर २५ बकर्‍यांचा गर्भ पात झाला. तसेच अन्य गुरे आजारी पडले. यामध्ये प्रकाश  तुकाराम इंगळे या शेळीपालन व्यवसाय करणार्‍या पशु पालकाच्या सर्वाधिक बकर्‍या आहेत. या घटनेची माहिती  पशुसंवर्धन विभागाचे डॉ. बी. टी. अस्वार यांना देण्यात  आली. धाबा पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. रंजवे, रामराव  राठोड यांनी तातडीने जनुना येथे जाऊन आजारी बकर्‍यांवर  उपचार केले. सरकारी औषधसाठा कमी असल्यामुळे  बकर्‍यांना औषधे मिळू शकली नाहीत. पशुसंवर्धन  विभागाने आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून देऊन  आजारी व विषबाधेने गंभीर असलेल्या शेळ्य़ांवर उपचार  करावा, अशी मागणी पशुपालकांकडून केली जात आहे. 

१५ गुरांचा मृत्यूविझोरा : येथे अज्ञात आजाराने गत दहा दिवसांत  पंधराच्यावर जनावरांचा मृत्यू झाल्याने पशुपालकांत भीतीचे  वातावरण निर्माण झाले आहे. पशुधन विभागाने याची  वेळीच दखल घेऊन, या रोगाचे निदान लावून उपचार  करण्याची मागणी पशुपालकांमध्ये होत आहे.विशेषत: गाय व वासरांना या अज्ञात आजाराने ग्रासले  आहे. एकाकी एका पायावर सुज येऊन त्यामध्ये तत्काळ  जनावरांचा अचानक मृत्यू होतो. आतापर्यंत गाय व त्यांच्या  वासरांचा मृत्यू झाला आहे. या अज्ञात आजाराने पशु पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रोजच  दोन ते तीन जनावरे दगावण्याच्या घटना घडत आहेत.