शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जालना-छपरा एक्स्प्रेस मनमाड मार्गे; पूर्णा-अकोला ब्रॉडगेजच्या पदरी उपेक्षाच

By atul.jaiswal | Updated: November 2, 2022 15:09 IST

परभणी-पूर्णा-हिंगोली-वाशिम-अकोला मार्गे प्रस्तावित असलेली जालना-छपरा ही साप्ताहिक विशेष गाडी अखेर जालना-औरंगाबाद-मनमाड मार्गे छपराकडे वळविण्यात आली आहे.

अतुल जयस्वाल

अकोला: परभणी-पूर्णा-हिंगोली-वाशिम-अकोला मार्गे प्रस्तावित असलेली जालना-छपरा ही साप्ताहिक विशेष गाडी अखेर जालना-औरंगाबाद-मनमाड मार्गे छपराकडे वळविण्यात आली आहे. यामुळे ब्रॉडगेज होऊन अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही मोजक्याच गाड्या सुरू असलेल्या पूर्णा-अकोला मार्गाच्या पदरी पुन्हा एकदा उपेक्षाच आली आहे, तर दुसरीकडे उत्तर भारतात जाण्यासाठी थेट रेल्वेची मागणी करणाऱ्या अकोला, वाशिम व हिंगोली जिल्ह्यांतील प्रवासी संघटनांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

जालना-छपरा या साप्ताहिक विशेष गाडीला २६ ऑक्टोबर रोजी रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली. ही गाडी जालना, परभणी, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला मार्गे जाणार होती, असे दानवे यांनी या कार्यक्रमात स्वतःच सांगितले. मनमाड-भुसावळ मार्गे उत्तर भारतात जाणाऱ्या अनेक गाड्या अगोदरच धावत असताना जालना-छपरा ही गाडी परभणी-पूर्णा-अकोला मार्गे जावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून होत होती. परंतु, औरंगाबाद येथील बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना सोयीचे व्हावे, यासाठी ही गाडी औरंगाबाद-मनमाड मार्गे वळविण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

यामुळे केवळ औरंगाबाद जिल्ह्याचा फायदा झाला असला, तरी परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला या जिल्ह्यातील प्रवाशांना मात्र त्याचा फटका बसला आहे. या जिल्ह्यांमध्ये उत्तर भारतीय नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. या भागातील प्रवाशांना मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व बिहारकडे जायचे असल्यास भुसावळ, खंडवा किंवा नागपूर येथून रेल्वे पकडावी लागते. या प्रवाशांसाठी जालना-छपरा ही रेल्वे खूप सोयीची होणार होती. परंतु, या रेल्वेचा मार्ग रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बदलल्यामुळे या जिल्ह्यातील जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jalanaजालना