शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

रोहनखेड येथे २५ वर्षांपासून जलकुंभ कोरडा ठण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:19 IST

रोहनखेड : ग्रामस्थांना पाणी उपलब्ध व्हावे. यासाठी जीवन प्राधिकरण विभागाने रोहनखेड येथे लाखो रुपये खर्च करून जलकुंभ बांधण्यात ...

रोहनखेड : ग्रामस्थांना पाणी उपलब्ध व्हावे. यासाठी जीवन प्राधिकरण विभागाने रोहनखेड येथे लाखो रुपये खर्च करून जलकुंभ बांधण्यात आला. मात्र या जलकुंभात पाणीच चढत नसल्याने हा जलकुंभ शोभेची वस्तू ठरला आहे. परिणामी या जलकुंभासाठी खर्च करण्यात आलेला पैसाही पाण्यात गेला.

८४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत युती शासनाच्या काळात हा जलकुंभ उभारण्यात आला. वन प्रकल्पाच्या जलसाठ्याचा विचार करून सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे काम गत पंचवीस वर्षांपासून रखडले असून बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या टाक्या अर्धवट स्थितीत उभ्या आहेत. रोहनखेड येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने १९९६ मध्ये जलकुंभ बांधण्यात आला. गत जलकुंभ बांधून पंचवीस वर्षे पूर्ण झाले. मात्र या गावातील जलकुंभात पाणी आले नाही. टाकीच्या बांधकामात लाखाेच्यावर पैसा खर्च झाला. परंतु पैसा खर्च होऊनही जलकुंभ अद्यापही तहानलेलेच आहे.

रोहनखेड येथे भीषण पाणीटंचाई

सध्याच्या स्थितीत उन्हाळ्याचे दिवस असल्याने रोहनखेड येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावाला आठवड्यातून एकदा पाणी मिळते. काही भागात पाणी मिळते तर गौतम नगर भागात पंधरा दिवस पाणी मिळत नाही. ग्रामस्थांना भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

पाण्यासाठी रात्रभर जागरण

ग्रामस्थ पाण्यासाठी रात्रभर जागरण करतात. अशी बिकट परिस्थिती आहे. जलकुंभात पाणी आले असते तर भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला नसता. जलकुंभात पाणी चढविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. अशी मागणी होत आहे.