शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

रोहनखेड येथे २५ वर्षांपासून जलकुंभ कोरडा ठण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:19 IST

रोहनखेड : ग्रामस्थांना पाणी उपलब्ध व्हावे. यासाठी जीवन प्राधिकरण विभागाने रोहनखेड येथे लाखो रुपये खर्च करून जलकुंभ बांधण्यात ...

रोहनखेड : ग्रामस्थांना पाणी उपलब्ध व्हावे. यासाठी जीवन प्राधिकरण विभागाने रोहनखेड येथे लाखो रुपये खर्च करून जलकुंभ बांधण्यात आला. मात्र या जलकुंभात पाणीच चढत नसल्याने हा जलकुंभ शोभेची वस्तू ठरला आहे. परिणामी या जलकुंभासाठी खर्च करण्यात आलेला पैसाही पाण्यात गेला.

८४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत युती शासनाच्या काळात हा जलकुंभ उभारण्यात आला. वन प्रकल्पाच्या जलसाठ्याचा विचार करून सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे काम गत पंचवीस वर्षांपासून रखडले असून बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या टाक्या अर्धवट स्थितीत उभ्या आहेत. रोहनखेड येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने १९९६ मध्ये जलकुंभ बांधण्यात आला. गत जलकुंभ बांधून पंचवीस वर्षे पूर्ण झाले. मात्र या गावातील जलकुंभात पाणी आले नाही. टाकीच्या बांधकामात लाखाेच्यावर पैसा खर्च झाला. परंतु पैसा खर्च होऊनही जलकुंभ अद्यापही तहानलेलेच आहे.

रोहनखेड येथे भीषण पाणीटंचाई

सध्याच्या स्थितीत उन्हाळ्याचे दिवस असल्याने रोहनखेड येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावाला आठवड्यातून एकदा पाणी मिळते. काही भागात पाणी मिळते तर गौतम नगर भागात पंधरा दिवस पाणी मिळत नाही. ग्रामस्थांना भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

पाण्यासाठी रात्रभर जागरण

ग्रामस्थ पाण्यासाठी रात्रभर जागरण करतात. अशी बिकट परिस्थिती आहे. जलकुंभात पाणी आले असते तर भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला नसता. जलकुंभात पाणी चढविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. अशी मागणी होत आहे.