शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

राज्यातील पाणलोटाचा अनुशेष पोहचला ३0 हजार कोटींवर!

By admin | Updated: November 11, 2014 23:41 IST

केंद्र शासनाचे नियोजन; पण राज्य पडले मागे!

राजरत्न सिरसाट/अकोलाराज्यातील पाणलोट क्षेत्राचा अनुशेष ३0 हजार कोटींच्यावर पोहचला असून, याचा फटका शेती विकासाला बसत आहे. कृषी क्षेत्रात आघाडीवर असलेलेल महाराष्ट्र राज्य पाणलोट विकासाच्या बाबतीत पिछाडल्यामुळे आर्श्‍चय व्यक्त होत आहे. आता केंद्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने पाणलोट क्षेत्र विकासाचे नवे नियोजन केले असून, जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून देशात पाणलोटाची कामे केली जाणार आहेत.केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास अभियानातंर्गत, देशातील ग्राम विकासाच्या संदर्भात केंद्र शासनाने एक महिन्यापूर्वी महत्वाची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला महाराष्ट्रातील तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. सभेत विविध राज्यांमधील सिंचन योजना, पाणलोट आदी विषयांवर तज्ज्ञांची मते जाणून घेण्यात आली. तज्ज्ञांची मते जाणून घेतल्यानंतर, आता सिंचन, पाणलोटासंदर्भात निश्‍चित धोरण ठरविण्यात येत आहे. त्यापूर्वी जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून देशात पाणलोटाची कामे केली जाणार असून, या बाबतीत महाराष्ट्रावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राज्यात पाणलोटाचा २८ हजार कोटी रुपयांचा अनुशेष शिल्लक आहे. पाणी हाच विकासासाठीचा महत्त्वाचा घटक असल्याने, त्यासाठी या निधीची गरज आहे. केंद्र शासन जागतिक बॅकेंच्या अर्थसाहाय्यातून पाणलोटाची कामे करणार असले तरी, राज्य शासनानेही या बाबतीत दखल घेण्याची गरज असल्याचे जल व भूमी व्यवस्थापन (वाल्मी), औरंगाबादचे माजी संचालक डॉ.एस.बी. वराडे यांनी सांगीतले. *पाणलोटासाठी सूक्ष्म अभ्यासाची गरज राज्यात भूजल स्तर (जीओ हायड्रोलॉजी)चा सूक्ष्म अभ्यास करण्याची गरज आहे. पाऊस कुठे जास्त होतो, कुठे नाही, हे बघून पाणी अडविण्याची गरज आहे; तथापि सध्या तसे होत नसल्याने राज्यात पाणलोटावर होत असलेला खर्च व्यर्थ जात आहे. *विदर्भात १0 हजार कोटींचा अनुशेषविदर्भातील पाणलोट विकासाचा अनुशेष दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मराठवाठय़ासाठी सहा हजार कोटी, तर इतर उर्वरित राज्य मिळून ३0 हजार कोटी रुपयांची रक्कम पाणलोट कार्यक्रमासाठी अपेक्षित आहे. विदर्भातील ९0 टक्के शेती कोरडवाहू असल्याने, या भागात ही कामे जलदगतीने होण्याची गरज आहे.