शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’मध्ये अमरावती विभागातील ९५0 गावांचा नव्याने समावेश

By admin | Updated: January 30, 2016 02:19 IST

२0१६- १७ या सत्रासाठी ९५0 गावांचा लक्ष्यांक निर्धारित.

दादाराव गायकवाड / कारंजा लाड (जि. वाशिम): राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानात अमरावती विभागासाठी २0१६- १७ या सत्रासाठी ९५0 गावांचा लक्ष्यांक निर्धारित करण्यात आला आहे. राज्यात जवळपास ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. गतवर्षी राज्यातील १८८ तालुक्यांतील २ हजार २३४ गावांतील भूजल पातळीत दोन मीटरपेक्षा जास्त घट झाल्याचे निदर्शनास आले होते. राज्यात पावसाच्या अनियमिततेमुळे सातत्याने टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. त्यामुळेच राज्यात मागील चार दशकांत कोरडवाहूू क्षेत्रातील पीक उत्पादनात मोठय़ा प्रमाणात चढउतार दिसून आला आहे. यासाठी पाण्याची कमतरता हाच मुख्य घटक कारणीभूत असल्याचे दिसून येते. यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानांतर्गत पाणलोट क्षेत्राची कामे करणे, साखळी सिमेंट नाला बंधार्‍याचे रुंदीकरण/खोलीकरण, जुन्या जलसंरचनांचे पुनरुज्र्जीवन करणे, अस्तित्वातील लघू पाटबंधारे संरचनांची दुरुस्ती करण्याची कामे करण्यात येत आहेत. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात अमरावती विभागातील १ हजार ३९६ गावांची निवड करण्यात आली आणि या सर्व गावांत जलयुक्त शिवार अभियानाची कामेही सुरू करण्यात आली. आता या अभियानांतर्गत २0१५-१६ या सत्रासाठी आणखी काही गावांचा समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, या निर्णयानुसार अमरावती विभागासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नव्याने ९५0 गावांचा लक्ष्यांक निर्धारित करण्यात आला आहे. विभागातील पाच जिल्ह्यांतील मिळून नव्या ९५0 गावांत जलयुक्त शिवार अभियानाची कामे करण्यात येतील. यासाठी विभागीय आयुक्तांनी त्यांच्या अधिकार कक्षेनुसार विविध जिल्ह्यांचे लक्ष्य निर्धारित केले असून, या लक्ष्यात ऐनवेळी होणारे बदल लक्षात घेता २५ गावे शिल्लक ठेवली आहेत. दरम्यान, या अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली असून, त्यापैकी काही निधी अमरावती विभागाला प्राप्त झाल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाकडून मिळाली आहे. जलयुक्त शिवारातील नव्या गावांची जिल्हावार संख्या १) अमरावती २२५ २) यवतमाळ २२५ ३) बुलडाणा २२५ ४) वाशिम १२५ ५) अकोला १२५ ६) इतर २५