शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

CoronaVirus in Akola : हे राम म्हणायची वेळ आलीच...पण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 23:15 IST

आता ‘हे राम’ म्हणत डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे; पण हे संकट संपलेले नाही.

- राजेश शेगोकारअकोला : कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी तब्बल ७३ दिवस लॉकडाऊननंतर जून महिन्यात ‘अ‍ॅनलॉक’ ची प्रक्रिया सुरू केली अन् पुनश्च हरिओम म्हणत नागरिकांवरील बंधने शिथिल केली. बाजारपेठेत लगबगही वाढली, त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली; मात्र हे सर्व होत असताना कोरोनाचे संकटही अनलॉक झाले. जुलै महिन्यात अकोला शहराने कोरोनाला बांधून ठेवण्यात यश मिळविले; पण ग्रामीण भाग पेटला अन् पाहता-पाहता कोरोनाचा वणवा पुन्हा एकदा जिल्हाभर पसरला असून, आता ‘हे राम’ म्हणत डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे; पण हे संकट संपलेले नाही.अकोल्याची स्थिती अतिशय चिंताजनक टप्प्यावर पोहोचली आहे. सप्टेंबर महिन्यात दररोज सरासरी दोन मृत्यू अन् शंभरावर रुग्ण यामुळे आता शहरात नव्या रुग्णांसाठी खाटाही शिल्लक नाही. आॅक्सिजनच्या आणीबाणीमुळे काही काळ रुग्णांसह प्रशासनाचाही श्वास कोंडला होता. सध्या तात्पुरते जीवनदान मिळाले असले तरी प्रश्न कायमच आहे. या समस्येचे उच्चाटन करण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनला विरोध करणारे आता पुन्हा लॉकडाऊनची भाषा बोलू लागले आहेत; मात्र ते आता शक्य नाही. मुळातच लॉकडाऊन हा एक उपाय होता. तो एकमेव उपाय नव्हता, त्यामुळे आता पुन्हा सारे बंद करून घरात बसणे शक्यच नाही. फक्त नागरिकांमध्ये वाढलेली बेफिकीर वृत्ती कमी करण्यासाठी प्रत्येकानेच वैयक्तिक जबाबदारी घेण्याची नितांत गरज आहे.बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. मास्क लावण्याबाबत कोणी गंभीर नाही अन् महापलिका व जिल्हा प्रशासनही दंडात्मक कारवाईचा फतवा काढून मोकळी झाली आहे. त्यामुळे कुणावरही कारवाईचा धाक नाही. अशा स्थितीत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हेच धोरण प्रत्येकाचे असले पाहिजे. सध्याच बुलडाणा, वाशिम अन् हिंगोलीचाही ताण अकोल्यावर येऊन पडला आहे. आरोग्य यंत्रणेची होणारी दमछाक पाहून अनेक रुग्ण आपले दुखणे लपवित आहेत, श्वास घेण्यास एकदमच अडचण झाल्यावर रुग्णालय गाठत असल्याने या रुग्णांचा जीव वाचविणे आरोग्य यंत्रणेलाही शक्य होत नाही. असे असले तरी बरे होणाऱ्याचे प्रमाणही लक्षणीय आहे, हे विसरता कामा नये. त्यामुळे कोरोनाच्या संकटावर मात करायचीच असेल अन् अर्थचक्रालाही गती द्यायची असेल तर नियमांचे पालन, अन् वेळीच उपचार या दोन सूत्राची प्रत्येकाने अंमलबजावणी केली पाहिजे.येणाºया काळात कोरोनासोबतच राहावे लागणार आहे अन् ज्यांना अजूनही कोरोना म्हणजे थोतांड वाटते अशा महाभागांनी कोरोनाचा शिरकाव झालेल्या कुटुंबाशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घ्यावे. उपचाराने कोरोना बरा होतोच; पण प्रतिबंधात्मक नियम पाळले तर तो दूरही राहतो, हे सुद्धा लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे अजूनही ‘हे राम’ म्हणत डोक्यावर हात ठेवला असेल तर तो काढा अन् निमयांचे बंधन हातावर बांधा. अन्यथा ‘राम नाम सत्य है’ हे म्हणायलाही शेवटच्या प्रवासात कोणी नसते, हे चित्र आपण पाहतच आहोत.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या