शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

वनराई बंधाऱ्यातून होणार १०० एकरावर सिंचन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 13:32 IST

परिसरातील ३५ शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : दरवर्षी दुष्काळी स्थिती आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी भंडारज बु.च्या ग्राम एकता जलसंवर्धन समितीने मोहाडी नाल्यावर वनराई बंधारा उभारला. यावर्षी आॅक्टोबरपर्यंत पाऊस झाल्याने हा वनराई बंधारा तुडुंब भरला आहे. त्यामुळे यावर्षी वनराई बंधाºयाच्या पाण्यावर परिसरातील १०० एकरावर सिंचन होणार आहे. परिसरातील ३५ शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.भंडारज बु. परिसरात दरवर्षी अल्प पाऊस असल्यामुळे दुष्काळी स्थिती असते. तसेच पाणीटंचाईमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. जलपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने सिंचन करणे जिकिरीचे झाले होते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्राम एकता जलसंवर्धन समितीचे अध्यक्ष माजी सरपंच दीपक इंगळे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील पहिला वनराई बंधारा उभारण्यात आला आहे. या बंधाºयामुळे परिसरातील ३५ विहिरींची पाण्याची पातळी वाढली असून, ती उन्हाळ्यातही कायम राहणार आहे. मोहाडी नाल्यावर दोन मीटर रुंदीच्या बंधाºयाचे पाणी दीड किमी लांब पसरले आहे. या बंधाºयात अठरा कोटी लीटर जलसाठा जमा झाला असून, ओव्हर फ्लो कायम आहे. या बंधाºयास पाच मीटर लांब प्लास्टिक कापड लागला आहे. तीन हजार रुपये खर्च आला आहे. शेतातील हिरवा झाडपाला, तरोटे, गवत याचा अंतर्भाव आहे. पर्यावरणपूरक हा बंधारा अतिशय कमी खर्चात अधिक लाभदायक असून, कमी वेळात तयार होते. याचे शास्त्रीय नाव शिवज्योती बंधारा आहे. शास्त्रोक्त मार्गदर्शन कृषी सहायक भाष्कर इंगळे यांनी दिले आहे. बंधारा निर्मिती ग्राम एकता जलसंवर्धन समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच दीपक इंगळे, गुणसागर इंगळे, राजकुमार मुरलीधर इंगळे, नारायण शेंडे, शेषराव सुरवाडे, सुरेंद्र सुरवाडे, शेषराव सुरवाडे, बाळू अमानकर, शिवाजी अमानकर, प्रमोद इंगळे या शेतकºयांनी सहकार्य केले.  सिंचनात होणार वाढ!यावर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला होता. तसेच अनेक नद्या दुथळी भरून वाहत आहेत. त्यामुळे भंडारज बु. येथील मोहाडी नाल्यावर बांधलेल्या बंधाºयात मोठ्या प्रमाणात जलसाठा जमा झाला आहे. परिसरातील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. तसेच जलपातळीत वाढ झाल्याने पाणीटंचाई दूर होणार असल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाJalyukt Shivarजलयुक्त शिवारagricultureशेती