शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

अकोला जिल्ह्यात सिंचन क्षेत्र घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 16:57 IST

पाटबंधारे विभागाने यावर्षी ३५ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजनही केले; परंतु शेतकऱ्यांकडून अपेक्षित मागणी नसल्याने काटेपूर्णा धरणांतर्गत यावर्षी अर्धेही सिंचन होणार नसल्याचे वृत्त आहे.

अकोला: जिल्ह्यात गतवर्षी चांगला पाऊस झाला असून, सर्व प्रकल्प तुडुंब भरल्याने यावर्षी रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाने यावर्षी ३५ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजनही केले; परंतु शेतकऱ्यांकडून अपेक्षित मागणी नसल्याने काटेपूर्णा धरणांतर्गत यावर्षी अर्धेही सिंचन होणार नसल्याचे वृत्त आहे. या धरणातून आजमितीस दररोज १३० क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. आतापर्यंत केवळ एक हजार हेक्टर क्षेत्राला पाणी सोडण्यात आले आहे.गतवर्षी सर्वच धरणात स्थिती वाईट असताना, यावर्षी पावसाने जिल्ह्याला तारले असून, सप्टेंबर महिन्यापासून सतत व दमदार पाऊस पडला. परतीच्या पावसाने त्यामध्ये आणखी भर घातल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ झाले. अकोला पूर संरक्षण योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या दगडपारवा प्रकल्पातूनही यावर्षी पाण्याचा विसर्ग करावा लागला. आजमितीस काटेपूर्णा धरणात ८६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मोर्णा, निर्गुणा, उमा प्रकल्प तसेच घुंगशी बॅरेजमध्ये जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी असल्याने सिंचनासाठी पाणी मिळण्याची शक्यता होती. तथापि, यावर्षी उशिरा पाणी सोडण्यात आले आहे.काटेपूर्णा प्रकल्पांतर्गत ८ हजार ३२५ हेक्टरवर क्षेत्र असून, या क्षेत्राला सिंंचनासाठी पाणी सोडण्यात येत असते. यावर्षी या प्रकल्पातून रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतीला पाणी सोडण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले होते. तथापि, आजमितीस केवळ एक हजार हेक्टर क्षेत्रापर्यंतच पाणी पोहोचले आहे. वान प्रकल्पातून सिंचन करण्यावर भर देण्यात आला आहे. अकोला उपविभागांतर्गत मोर्णा, निर्गुणा व दगडपारवा प्रकल्पातून १२ हजार हेक्टरवर सिंंचनासाठी पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात आजमितीस प्रकल्पातून अनुक्रमे दररोज ३० व ५० क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. उमा धरणांतर्गत २,२४१ हेक्टर लाभ क्षेत्र आहे. तथापि, या धरणाच्या क्षेत्रातही १ हजार हेक्टर सिंचन होण्याची शक्यता आहे. यावर्षी हे सर्व प्रकल्प मिळून ३५ हजार हेक्टरवर सिंचन व्यवस्था अपेक्षित आहे; परंतु यावर्षी ४ हजार हेक्टरच सिंचन होईल, असे एकूण आजचे चित्र आहे.

 अकोला उपविभागांतर्गत सिंचनअकोला उपविभागांतर्गत आता ९ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. या उपविभागांतर्गत मोर्णा, निर्गुणा, विश्वमित्री, दगडपारवा, पातूर, तुळजापूर, सावरगाव, गावंडगाव, भिलखेड, धारू ची, चिचपाणी आदी १० ते १२ प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांत आजमितीस ६१ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे; परंतु सिंचनासाठी डिसेंबर महिन्यात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली.

काटेपूर्णा धरणातून सिंचनाला पाणी सोडणे सुरू आहे. मागणीनुसार पाणी पुरवठा करण्यात येत आहे; परंतु बहुतांश शेतकºयांकडे कापूस, तूर पीक आहे. ते काढून दुसरे पीक घ्यावे लागणार आहे.- अभिजित नितनवरे,सहायक अभियंता श्रेणी-१काटेपूर्णा प्रकल्प,बोरगाव मंजू, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण