शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
6
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
7
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
8
बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
9
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
11
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
12
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
13
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
14
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
15
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
16
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
17
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
18
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
19
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
20
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...

अकोला जिल्ह्यात सिंचन क्षेत्र घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 16:57 IST

पाटबंधारे विभागाने यावर्षी ३५ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजनही केले; परंतु शेतकऱ्यांकडून अपेक्षित मागणी नसल्याने काटेपूर्णा धरणांतर्गत यावर्षी अर्धेही सिंचन होणार नसल्याचे वृत्त आहे.

अकोला: जिल्ह्यात गतवर्षी चांगला पाऊस झाला असून, सर्व प्रकल्प तुडुंब भरल्याने यावर्षी रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाने यावर्षी ३५ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजनही केले; परंतु शेतकऱ्यांकडून अपेक्षित मागणी नसल्याने काटेपूर्णा धरणांतर्गत यावर्षी अर्धेही सिंचन होणार नसल्याचे वृत्त आहे. या धरणातून आजमितीस दररोज १३० क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. आतापर्यंत केवळ एक हजार हेक्टर क्षेत्राला पाणी सोडण्यात आले आहे.गतवर्षी सर्वच धरणात स्थिती वाईट असताना, यावर्षी पावसाने जिल्ह्याला तारले असून, सप्टेंबर महिन्यापासून सतत व दमदार पाऊस पडला. परतीच्या पावसाने त्यामध्ये आणखी भर घातल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ झाले. अकोला पूर संरक्षण योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या दगडपारवा प्रकल्पातूनही यावर्षी पाण्याचा विसर्ग करावा लागला. आजमितीस काटेपूर्णा धरणात ८६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मोर्णा, निर्गुणा, उमा प्रकल्प तसेच घुंगशी बॅरेजमध्ये जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी असल्याने सिंचनासाठी पाणी मिळण्याची शक्यता होती. तथापि, यावर्षी उशिरा पाणी सोडण्यात आले आहे.काटेपूर्णा प्रकल्पांतर्गत ८ हजार ३२५ हेक्टरवर क्षेत्र असून, या क्षेत्राला सिंंचनासाठी पाणी सोडण्यात येत असते. यावर्षी या प्रकल्पातून रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतीला पाणी सोडण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले होते. तथापि, आजमितीस केवळ एक हजार हेक्टर क्षेत्रापर्यंतच पाणी पोहोचले आहे. वान प्रकल्पातून सिंचन करण्यावर भर देण्यात आला आहे. अकोला उपविभागांतर्गत मोर्णा, निर्गुणा व दगडपारवा प्रकल्पातून १२ हजार हेक्टरवर सिंंचनासाठी पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात आजमितीस प्रकल्पातून अनुक्रमे दररोज ३० व ५० क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. उमा धरणांतर्गत २,२४१ हेक्टर लाभ क्षेत्र आहे. तथापि, या धरणाच्या क्षेत्रातही १ हजार हेक्टर सिंचन होण्याची शक्यता आहे. यावर्षी हे सर्व प्रकल्प मिळून ३५ हजार हेक्टरवर सिंचन व्यवस्था अपेक्षित आहे; परंतु यावर्षी ४ हजार हेक्टरच सिंचन होईल, असे एकूण आजचे चित्र आहे.

 अकोला उपविभागांतर्गत सिंचनअकोला उपविभागांतर्गत आता ९ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. या उपविभागांतर्गत मोर्णा, निर्गुणा, विश्वमित्री, दगडपारवा, पातूर, तुळजापूर, सावरगाव, गावंडगाव, भिलखेड, धारू ची, चिचपाणी आदी १० ते १२ प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांत आजमितीस ६१ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे; परंतु सिंचनासाठी डिसेंबर महिन्यात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली.

काटेपूर्णा धरणातून सिंचनाला पाणी सोडणे सुरू आहे. मागणीनुसार पाणी पुरवठा करण्यात येत आहे; परंतु बहुतांश शेतकºयांकडे कापूस, तूर पीक आहे. ते काढून दुसरे पीक घ्यावे लागणार आहे.- अभिजित नितनवरे,सहायक अभियंता श्रेणी-१काटेपूर्णा प्रकल्प,बोरगाव मंजू, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण