शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय नदी दिन विशेष:  जीवनदायिनी नद्या बनताहेत मृत्युदायिनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 10:52 IST

आता नद्या मृत्युदायिनी बनत असल्याचे चित्र देशभरातच नव्हे तर जगभरात दिसून येत आहे.

अकोला : एकेकाळी नद्यांना जीवनदायिनी म्हटले जायचे. भारतीय संस्कृतीमध्ये नदीला महत्त्वाचे स्थान आहे. नदी काठावरच गावे, वस्ती वसायची; परंतु आता याच जीवनदायिनी असलेल्या नद्या मृत्युदायिनी बनत आहेत. अवैध रेती उत्खनन आणि कारखाने, उद्योगांमधील रसायनमिश्रित पाण्यामुळे नद्यांचे जलप्रदूषण वाढत आहे. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी कमी होत असून, काही छोट्या नद्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. या नद्यांचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले.पूर्वी नद्यांना जीवनदायिनी म्हटले जायचे. आता नद्या मृत्युदायिनी बनत असल्याचे चित्र देशभरातच नव्हे तर जगभरात दिसून येत आहे. यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना महापूर आले. महापुरांमुळे शेतीसोबतच अनेक गावे, शहरांनासुद्धा झळ पोहोचली. नद्यांमध्ये अवैधरित्या होत असलेल्या रेतीच्या उत्खनामुळे नद्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. रेती उत्खननामुळे नदीतील पाण्याची पातळी कमी होत आहे. बारमाही वाहणाऱ्या नद्या कोरड्या पडल्या आहेत. पुढील पिढीला स्वच्छ पाणी द्यायचे असेल तर आज आपल्या नद्या वाचविणे गरजेचे झाले आहे; पण शहर असो वा गाव, सगळीकडेच नदी प्रदूषित झाली आहे. प्रत्येक नदीच्या काठावर एक संस्कृती आहे. प्रत्येक नदीसोबत एक पारंपरिक कथा आहे; परंतु आता काळानुरूप तिचे महत्त्व कमी झाले आहे. त्याला कारण बोअरिंग व धरणांमुळे सहज उपलब्ध होणारे पाणी. त्यामुळे नदीचे महत्त्व कमी झाले आहे व गंगेचे स्वरूप जाऊन गटारगंगेचे स्वरूप तिला प्राप्त झाले आहे. पूर्वी नदीच्या आधारेच बारमाही शेती होत असे. आज भारतातील जास्त जास्त शेती भूजलावर होते.

भूजल पातळीवर परिणाम

एका सर्व्हेनुसार २००७ ते २०१७ या १० वर्षात भारताची भूजल पातळी ६१ टक्क्यांनी घटली आहे. नद्या विविध कारणांनी प्रदूषित होत आहे. ज्यामधील प्रमुख कारण म्हणजे कारखान्यामधून विनाप्रक्रिया सोडलेले पाणी. भारतात सुमारे ८० टक्के रोग अशुद्ध पाण्यामुळे होतात. भारतातील ५ वर्षाखालील सुमारे २ कोटी मुलांचा मृत्यू थेट अशुद्ध पाण्याशी संबंधित आहे.

 जिल्ह्यातील प्रमुख नद्यापूर्णा ही प्रमुख नदी आहे. पूर्णा नदीचे प्राचीन नाव पयोष्णी असे आहे. ही नदी तापी नदीला जळगाव जिल्ह्यातील चांगदेव येथे मिळते. आरणा नदी, आस नदी, उतावळी नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी, गांधारी नदी, गौतमा नदी, चंद्रभागा नदी, नळगंगा नदी, निपाणी नदी, निर्गुणा नदी, पेंढी नदी, बोर्डी नदी, भावखुरी नदी, मन नदी, मास नदी, मोर्णा नदी, वाण नदी, विश्वगंगा नदी, शहानूर नदी, ज्ञानगंगा नदी या पूर्णेच्या उपनद्या आहेत. पूर्णा नदी ही तापी नदीची उपनदी आहे. पूर्णा नदी अमरावती, अकोला, बुलडाणा व जळगाव या जिल्ह्यांमधून वाहते. एकेकाळी बारमाही वाहणारी ही नदी आता मृतावस्थेकडे झुकत आहेत.प्लास्टिक पिशव्या, रसायनमिश्रित पाण्यामुळे नद्या प्रदूषित होत आहेत. नद्या वाचवायच्या असतील तर प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. आपल्या भागातील नद्यांचे प्रदूषण कसे कमी होईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नदीच्या काठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करून नदीकाठांची होणारी धूप थांबविली पाहिजे. नदीतील अवैध उत्खनन, प्रदूषणामुळे नदीतील जैवविविधता धोक्यात येत आहे. भविष्यातील पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी नदी वाचविण्याची गरज आहे. - अमोल सावंत, पर्यावरण तज्ज्ञ, निसर्ग कट्टा

टॅग्स :Akolaअकोलाriverनदी