शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
3
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
4
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
5
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
6
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
7
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
8
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
9
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
10
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
11
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
12
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
13
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
14
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
15
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
16
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
17
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
18
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
19
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
20
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!

आंतरराष्ट्रीय नदी दिन विशेष:  जीवनदायिनी नद्या बनताहेत मृत्युदायिनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 10:52 IST

आता नद्या मृत्युदायिनी बनत असल्याचे चित्र देशभरातच नव्हे तर जगभरात दिसून येत आहे.

अकोला : एकेकाळी नद्यांना जीवनदायिनी म्हटले जायचे. भारतीय संस्कृतीमध्ये नदीला महत्त्वाचे स्थान आहे. नदी काठावरच गावे, वस्ती वसायची; परंतु आता याच जीवनदायिनी असलेल्या नद्या मृत्युदायिनी बनत आहेत. अवैध रेती उत्खनन आणि कारखाने, उद्योगांमधील रसायनमिश्रित पाण्यामुळे नद्यांचे जलप्रदूषण वाढत आहे. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी कमी होत असून, काही छोट्या नद्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. या नद्यांचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले.पूर्वी नद्यांना जीवनदायिनी म्हटले जायचे. आता नद्या मृत्युदायिनी बनत असल्याचे चित्र देशभरातच नव्हे तर जगभरात दिसून येत आहे. यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना महापूर आले. महापुरांमुळे शेतीसोबतच अनेक गावे, शहरांनासुद्धा झळ पोहोचली. नद्यांमध्ये अवैधरित्या होत असलेल्या रेतीच्या उत्खनामुळे नद्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. रेती उत्खननामुळे नदीतील पाण्याची पातळी कमी होत आहे. बारमाही वाहणाऱ्या नद्या कोरड्या पडल्या आहेत. पुढील पिढीला स्वच्छ पाणी द्यायचे असेल तर आज आपल्या नद्या वाचविणे गरजेचे झाले आहे; पण शहर असो वा गाव, सगळीकडेच नदी प्रदूषित झाली आहे. प्रत्येक नदीच्या काठावर एक संस्कृती आहे. प्रत्येक नदीसोबत एक पारंपरिक कथा आहे; परंतु आता काळानुरूप तिचे महत्त्व कमी झाले आहे. त्याला कारण बोअरिंग व धरणांमुळे सहज उपलब्ध होणारे पाणी. त्यामुळे नदीचे महत्त्व कमी झाले आहे व गंगेचे स्वरूप जाऊन गटारगंगेचे स्वरूप तिला प्राप्त झाले आहे. पूर्वी नदीच्या आधारेच बारमाही शेती होत असे. आज भारतातील जास्त जास्त शेती भूजलावर होते.

भूजल पातळीवर परिणाम

एका सर्व्हेनुसार २००७ ते २०१७ या १० वर्षात भारताची भूजल पातळी ६१ टक्क्यांनी घटली आहे. नद्या विविध कारणांनी प्रदूषित होत आहे. ज्यामधील प्रमुख कारण म्हणजे कारखान्यामधून विनाप्रक्रिया सोडलेले पाणी. भारतात सुमारे ८० टक्के रोग अशुद्ध पाण्यामुळे होतात. भारतातील ५ वर्षाखालील सुमारे २ कोटी मुलांचा मृत्यू थेट अशुद्ध पाण्याशी संबंधित आहे.

 जिल्ह्यातील प्रमुख नद्यापूर्णा ही प्रमुख नदी आहे. पूर्णा नदीचे प्राचीन नाव पयोष्णी असे आहे. ही नदी तापी नदीला जळगाव जिल्ह्यातील चांगदेव येथे मिळते. आरणा नदी, आस नदी, उतावळी नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी, गांधारी नदी, गौतमा नदी, चंद्रभागा नदी, नळगंगा नदी, निपाणी नदी, निर्गुणा नदी, पेंढी नदी, बोर्डी नदी, भावखुरी नदी, मन नदी, मास नदी, मोर्णा नदी, वाण नदी, विश्वगंगा नदी, शहानूर नदी, ज्ञानगंगा नदी या पूर्णेच्या उपनद्या आहेत. पूर्णा नदी ही तापी नदीची उपनदी आहे. पूर्णा नदी अमरावती, अकोला, बुलडाणा व जळगाव या जिल्ह्यांमधून वाहते. एकेकाळी बारमाही वाहणारी ही नदी आता मृतावस्थेकडे झुकत आहेत.प्लास्टिक पिशव्या, रसायनमिश्रित पाण्यामुळे नद्या प्रदूषित होत आहेत. नद्या वाचवायच्या असतील तर प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. आपल्या भागातील नद्यांचे प्रदूषण कसे कमी होईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नदीच्या काठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करून नदीकाठांची होणारी धूप थांबविली पाहिजे. नदीतील अवैध उत्खनन, प्रदूषणामुळे नदीतील जैवविविधता धोक्यात येत आहे. भविष्यातील पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी नदी वाचविण्याची गरज आहे. - अमोल सावंत, पर्यावरण तज्ज्ञ, निसर्ग कट्टा

टॅग्स :Akolaअकोलाriverनदी