शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

विमा भरण्याची मुदत संपली; पंचनामे तातडीने करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:17 IST

जिल्ह्यात अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे माेठ्या प्रमाणात शेती खरडून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांची झालेली वित्तहानी भरून काढण्यासाठी विमा कंपन्यांकडून ...

जिल्ह्यात अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे माेठ्या प्रमाणात शेती खरडून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांची झालेली वित्तहानी भरून काढण्यासाठी विमा कंपन्यांकडून तातडीने पंचनामे करण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाने २३ जुलैपर्यंत विमा हप्त्याची रक्कम भरण्यासाठी मुदत वाढवून दिली हाेती. यावेळी झालेली अतिवृष्टी, खंडित झालेल्या विद्युत पुरवठ्यामुळे असंख्य शेतकरी विमा हप्ता भरू शकले नाहीत. पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीला कोणत्या स्वरूपात कधी व कशी देण्यात यावी, तसेच कोणत्या मुदतीत देण्यात यावी, याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे कृषी विभागाने, तसेच विमा कंपनीने शेतकऱ्यांसोबत संपर्क व संवाद साधून माहिती देणे अत्यंत गरजेचे झाल्याचा मुद्दा आ. सावरकर यांनी पत्रात नमूद केला आहे. जेणेकरून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा मोबदला लवकर मिळेल. विमा कंपन्यांबाबत शेतकऱ्यांना अत्यंत वाईट अनुभव असल्याने संबंधित कंपन्यांना तातडीने कामाला लावण्याची सूचना आ. सावरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

महसूल व मनपाने संयुक्त सर्व्हे करावा!

अकाेला पश्चिम विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टी व पुराचे पाणी असंख्य घरांमध्ये व बाजारपेठेत शिरल्याने माेठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. यामध्ये जुन्या शहरातील बहुतांश भाग प्रभावित झाला असून, महसूल व महापालिका प्रशासनाने संयुक्त सर्व्हे करून पंचनामे करावेत, अशी सूचना भाजपचे ज्येष्ठ आमदार गाेवर्धन शर्मा यांनी जिल्हाधिकारी निमा अराेरा, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांना केली आहे.