शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

गहू, हरभरा पिकासाठी विमा योजना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 15:51 IST

पीक विमा काढण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत तर उन्हाळी पिकांसाठी १ एप्रिल २०२० सहभाग घेता येणार आहे.

अकोला : रब्बी हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली असून, कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत तर उन्हाळी पिकांसाठी १ एप्रिल २०२० सहभाग घेता येणार आहे.या योजनेत राज्यात सर्वसाधारणपणे जिल्हास्तरीय पीक कर्ज दर समितीने निश्चित केलेल्या पीक कर्ज दराप्रमाणे पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे.या योजनेत उंबरठा उत्पादन काढण्यासाठी आवश्यक असलेल्या पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेले मागील सात वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनाचे मागील पाच वर्षांचे सरासरी उत्पन्न पिकाखालील क्षेत्र आणि चालू हंगामात पुरेसे पीक कापणी प्रयोग घेण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ या बाबी विचारात घेऊन राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीने पीकनिहाय विमा क्षेत्र घटक अनुसूचित केलेले आहेत. असे करताना राज्यातील सर्व जिल्ह्यामधील प्रमुख पिके अंतर्भूत करण्यात आलेली आहेत. अधिसूचित केलेल्या सर्र्व पिकांसाठी उत्पन्नाचा अंदाज काढण्याचा मानक पद्धतीनुसार आवश्यक तेवढ्या पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले आहे.या योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना अनिवार्य आहे. गहू, हरभरा व कांदा आदी पिकांसाठी ही योजना लागू आहे. बिगर कर्जदार शेतकºयांनाही ३१ डिसेंबरपर्यंत विमा प्रस्ताव सादर करण्याची मुदत आहे.

जिल्हा समितीजिल्ह्यात पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी भारत एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. जिल्हा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचा या समितीत समावेश आहे.

पीक विमा हप्ताया योजनेत वेगवेगळ््या पिकांसाठी शेतकºयांना वेगवेगळी रक्कम भरावी लागणार असून, बागायती गहू पिकाला हेक्टरी ५२५ रुपये, हरभरा पिकासाठी ३६० रुपये, भुईमुगासाठी हेक्टरी ५७० रुपये तर रब्बी कांद्यासाठी ३,६५० रुपये भरावे लागणार आहेत.

कांदा पिकासाठी या तालुक्याचा समावेशकांदा पिकासाठी अकोला, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर व बार्शीटाकळी तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून, भुईमुगासाठी अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर व बार्शीटकाळी तालुक्यांचा समावेश आहे.

 

रब्बी हंगामासाठी यावर्षी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली असून, अधिसूचित केलेले तालुके व पिकांसाठी या योजनेत ३१ डिसेंबरपर्यंत शेतकºयांना विमा प्रस्ताव सादर करता येणार आहे.मोहन वाघ ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAkolaअकोलाagricultureशेती