शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

इन्स्पायर अवार्ड मुलांच्या ज्ञानास चालना देणारे माध्यम - डॉ. रवींद्र भास्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 19:39 IST

शिक्षण तज्ज्ञ व इन्स्पायर अवार्ड अकोला जिल्ह्याचे संयोजक प्रा. डॉ. रवींद्र भास्कर यांच्याशी साधलेला संवाद...

- नितीन गव्हाळेलोकमत न्यूज नेटवर्कअकोला : २00९ पासून भारत सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान इन्स्पायर अवार्ड योजनेची सुरुवात केली. आता इन्स्पायर अवार्डचे आयोजन राष्ट्रीय नवप्रवर्तन व भारत सहकार्याने केले जात आहे. हा स्टार्टअप इंडियाच्या प्रसारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, असे येथील शिक्षण तज्ज्ञ व इन्स्पायर अवार्ड अकोला जिल्ह्याचे संयोजक प्रा. डॉ. रवींद्र भास्कर यांनी सांगितले. त्यांच्याशी शनिवारी साधलेला संवाद...

मुलांना सर्वोत्तम बनविण्यासाठी का प्रोत्साहित करावे?सृजनशील, कल्पनाशील मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे. संवेदना, सृजनशीलता व सहकार्य ही भावना मुलांना योग्य नागरिक बनवतात; परंतु सर्वच मुलांची क्षमता वेगवेगळी असते. मुलांना सर्वोत्तम बनविण्यासाठी आम्हाला जोर द्यावा लागेल. भविष्यात त्यांचा हाच गुण समाजासाठी उपयुक्त ठरेल. नवाचाराच्या ऊर्जेने देशासाठी रचनात्मक व समावेशक कार्य करू शकतील. त्यासाठी इन्स्पायर अवार्ड मानक भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे संचालित एक विशिष्ट कार्यक्रम आहे. याचा मुख्य उद्देश वर्ग सहावी ते दहावीमधील प्रतिभाशाली विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून करून त्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे आहे.

इन्स्पायर अवार्ड अंतर्गत अर्ज कसे आमंत्रित केले जातात?इन्स्पायर अवार्र्डस् मानकाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांचे सर्वोत्तम विचार समाजाच्या दैनंदिन समस्यांचे समाधान करू शकेल. या व्यतिरिक्त घरगुती आणि श्रमिकांचे श्रम कमी करण्याचे उपाय ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासोबतच सेवासुद्धा सहज मिळतील.

योजनेचे कार्यान्वयन कशाप्रकारे केले जाईल?मुख्याध्यापकांद्वारे शाळेमध्ये आयडिया स्पर्धेअंतर्गत विद्यार्र्थ्याचे दोन ते तीन सर्वोत्तम विचार निवडले जातील. ज्यांचे नामांकन विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकारच्या वेबपोर्टल (ई-मॅनेजमेंट आॅफ इन्स्पायर अवार्ड स्कीम) वर केले जाईल. नवीन विद्यालय वेबपोर्टल ई-मिलासवर नोंदणी करून शकतात. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान व भारत सरकारतर्फे १ लाख विचारांना निवडले जातील. सर्व विद्यार्थ्यांना १0 हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येतील. दहा प्रकल्पांच्या राज्यस्तरीय प्रदर्शनातून १ हजार प्रकल्पांची राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड करण्यात येईल. यातून ६0 सर्वोत्तम प्रतिकृती राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडल्या जातील.

कल्पनेची स्पर्धा काय आहे?कल्पनेच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापकद्वारा सर्व शालेय मुलांना एकत्र करून त्यांना विचार, नवाचार, जसे की मशीन किंवा गॅझेट जे उपलब्ध नाही; परंतु एखादी मशीन बनवायची जिद्द आहे. कोणत्याही वर्तमान/उपलब्ध असलेल्या यंत्र किंवा गॅझेटमध्ये सुधाराची आवश्यकता आहे. यासाठी शाळेत आयडिया स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या विचारांना प्रोत्साहन द्यावे.

टॅग्स :Akolaअकोलाscienceविज्ञानinterviewमुलाखत