शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

मंजूर क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 14:37 IST

कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी शिक्षणाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली चार भरारी पथके गठित करण्याचे आदेश शासनाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी १८ आॅगस्ट रोजी दिले आहेत.

ठळक मुद्देमहाविद्यालयांची तपासणी करून ती यादी विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शासनाकडे सादर करावी. एवढेच नाहीतर अतिरिक्त प्रवेश रद्द करण्याचे आदेशात बजावले आहे.

अकोला: यंदाच्या २0१८-१९ च्या शैक्षणिक सत्रामध्ये अनेक महाविद्यालयांनी मंजूर क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याच्या तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी शिक्षणाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली चार भरारी पथके गठित करण्याचे आदेश शासनाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी १८ आॅगस्ट रोजी दिले आहेत.क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेल्या महाविद्यालयांची तपासणी करून ती यादी विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शासनाकडे सादर करावी. एवढेच नाहीतर अतिरिक्त प्रवेश रद्द करण्याचे आदेशात बजावले आहे. ज्या कनिष्ठ महाविद्यालयाने अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असल्यास, त्या महाविद्यालयातील अधिक विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही. आदेशानुसार महाविद्यालयांनी अधिकचे विद्यार्थी प्रवेश रद्द केले नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)शहरी विद्यार्थ्यांचे ग्रामीण भागात घेतलेले प्रवेश रद्द होणार!शहरात इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविण्यात आली होती. त्यामुळे शहरातील विद्यार्थ्यांनी शहरातीलच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायला पाहिजे होते; परंतु शेकडो विद्यार्थ्यांनी शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश न घेता, ग्रामीण भागात प्रवेश घेतले. त्यांचे प्रवेश तातडीने रद्द करून त्यांना केंद्रीय पद्धतीने अकरावीत प्रवेश देण्यास बजावले आहेत.तरच बारावी परीक्षेचे अर्ज मंजूर!राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांची सरलमधील माहिती ३0 सप्टेंबरपर्यंत अपडेट करावी. महाविद्यालयांना मंजूर केलेली प्रवेश क्षमता, प्रवेशित विद्यार्थी संख्या व विद्यार्थ्यांची सरलमधील माहिती विचारात घेऊनच बारावी परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर केले जातील, असा इशारासुद्धा दिला आहे.लवकरच कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यात येईल. ज्यांनी मंजूर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश दिले आहेत. त्यांनी ते रद्द करावेत. अन्यथा त्यांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल. २प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारीमाध्यमिक जि.प. अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालय