शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
2
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
3
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
4
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
5
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
6
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
7
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
8
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
9
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
10
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
11
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
12
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
13
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
14
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
15
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
16
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
17
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
18
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
19
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
20
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
Daily Top 2Weekly Top 5

मंजूर क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 14:37 IST

कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी शिक्षणाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली चार भरारी पथके गठित करण्याचे आदेश शासनाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी १८ आॅगस्ट रोजी दिले आहेत.

ठळक मुद्देमहाविद्यालयांची तपासणी करून ती यादी विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शासनाकडे सादर करावी. एवढेच नाहीतर अतिरिक्त प्रवेश रद्द करण्याचे आदेशात बजावले आहे.

अकोला: यंदाच्या २0१८-१९ च्या शैक्षणिक सत्रामध्ये अनेक महाविद्यालयांनी मंजूर क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याच्या तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी शिक्षणाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली चार भरारी पथके गठित करण्याचे आदेश शासनाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी १८ आॅगस्ट रोजी दिले आहेत.क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेल्या महाविद्यालयांची तपासणी करून ती यादी विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शासनाकडे सादर करावी. एवढेच नाहीतर अतिरिक्त प्रवेश रद्द करण्याचे आदेशात बजावले आहे. ज्या कनिष्ठ महाविद्यालयाने अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असल्यास, त्या महाविद्यालयातील अधिक विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही. आदेशानुसार महाविद्यालयांनी अधिकचे विद्यार्थी प्रवेश रद्द केले नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)शहरी विद्यार्थ्यांचे ग्रामीण भागात घेतलेले प्रवेश रद्द होणार!शहरात इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविण्यात आली होती. त्यामुळे शहरातील विद्यार्थ्यांनी शहरातीलच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायला पाहिजे होते; परंतु शेकडो विद्यार्थ्यांनी शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश न घेता, ग्रामीण भागात प्रवेश घेतले. त्यांचे प्रवेश तातडीने रद्द करून त्यांना केंद्रीय पद्धतीने अकरावीत प्रवेश देण्यास बजावले आहेत.तरच बारावी परीक्षेचे अर्ज मंजूर!राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांची सरलमधील माहिती ३0 सप्टेंबरपर्यंत अपडेट करावी. महाविद्यालयांना मंजूर केलेली प्रवेश क्षमता, प्रवेशित विद्यार्थी संख्या व विद्यार्थ्यांची सरलमधील माहिती विचारात घेऊनच बारावी परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर केले जातील, असा इशारासुद्धा दिला आहे.लवकरच कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यात येईल. ज्यांनी मंजूर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश दिले आहेत. त्यांनी ते रद्द करावेत. अन्यथा त्यांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल. २प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारीमाध्यमिक जि.प. अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालय