शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

शेतीची कामे ‘रोहयो’ अंतर्गत समाविष्ट करा!

By admin | Updated: January 14, 2015 23:39 IST

अकोला येथे पत्रकार परिषदेमध्ये बच्चू कडू यांची शासनाकडे मागणी.

अकोला- श्रमावर आधारित योजना राबवून शेतीचा उत्पादन खर्च कमी केला जाऊ शकतो. त्यासाठी शेतीची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात यावी. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पादनावरील खर्च कमी होऊन कष्ट करणारा शेतकरी नफ्याचा वाटेकरी होईल. त्यामुळे शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत सांगितले. प्रहार संघटनेच्या अकोला जिलतील कार्यकर्त्यांंची आढावा बैठक घेण्यासाठी अकोला येथे आलेले आ. कडू यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधारी भाजप सरकार काँग्रेस आघाडी सरकारचेच धोरण राबवित असल्याचा आरोप केला. शेतकरीविरोधी निर्णय घेणार्‍या शासनाविरुद्ध रायगडाच्या पाथ्याशी उपोषण करून एल्गार पुकारणार असल्याचे आ. कडू यांनी जाहीर केले. केंद्रात आणि राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर शेतकर्‍यांना ह्यअच्छे दिनह्णची प्रतीक्षा होती, मात्र शेतीमालाचे हमी दर वाढण्याऐवजी कमी होत आहेत. वस्तूंचे दर कधी कमी होताना आढळत नाहीत. शेतीमालाचे दर कमी होणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर कमी झाले आहेत. कांद्याचे दर वाढत आहे आणि शासनाला ते स्वस्तात द्यावयाचे आहे तर त्यांनी रास्त भाव दुकानातून द्यावे. त्यासाठी शेतकर्‍यांना वेठीस धरणे योग्य नाही. शेतकर्‍यांचा उत्पादनावरील एकूण खर्चापैकी ७५ टक्के खर्च हा मजुरीवर होतो. ही कामे एमआयईजीएसअंतर्गत केल्यास अल्पभूधारक शेतकर्‍यांना त्याचा फायदा मिळेल. गावातच रोजगार निर्मिती झाल्यामुळे शहराकडे रोजगाराच्या शोधात येणार्‍यांची संख्या कमी होईल. तसेच मजुरीवरील खर्च कमी झाल्यामुळे उत्पादनावरील खर्चात कमी होऊन नफ्यात वाढ होईल. त्यातून आर्थिक संपन्नता येऊन शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील, असा दावा आमदार कडू यांनी केला. *उद्योगपूर्ण गावांची संकल्पना राबवाजेथे कचरा नाही, तेथे स्वच्छता अभियान राबविले जात आहे. गावांमध्ये शौचालयांचा आग्रह धरला जातो. शहरातील घाण मात्र कुणाला दिसत नाही. अशा योजना राबविण्यापूर्वी गावातील माणसाला आर्थिकदृष्ट्या संपन्न करा. त्यासाठी उद्योगपूर्ण गावांची संकल्पना शासनाने राबविली पाहिजे. जेणेकरून गावातील माणसाला त्याच्याच गावात रोजगार मिळू शकेल, असे आमदार कडू म्हणाले. कष्टकर्‍यांना विद्रूप करू नका!अकोला शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली जात आहे. ही मोहीम राबविताना गरिबांचे व्यवसाय उद्ध्वस्त केले जात आहेत. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी अतिक्रमण काढले जात असताना कष्टकरी आर्थिकदृष्ट्या ह्यविद्रूपह्ण होणार नाही, याकडे लक्ष देण्याची गजर असल्याचे आ. कडू म्हणाले. कष्टकर्‍यांसाठी आंदोलन उभारण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले.