शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बहरलेल्या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:22 IST

वाडेगाव: परिसरात गत दोन-तीन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत असल्याने पिकांना लाभदायक ठरत आहे. शेतशिवारात पिके बहरली असून, बहरलेल्या पिकांवर ...

वाडेगाव: परिसरात गत दोन-तीन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत असल्याने पिकांना लाभदायक ठरत आहे. शेतशिवारात पिके बहरली असून, बहरलेल्या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. दरम्यान, दमदार पावसाने शेतकरी सुखावला असून, सोयाबीन फुलोरा अवस्थेत आहे.

वाडेगाव शिवारात खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिल्याने सोयाबीनचा पेरा वाढला आहे. परिसरात शेतकरी कपाशीला पसंती देत होते; मात्र बोंडअळी, बोंडसळ, मावा, लाल्या आदी रोगांच्या आक्रमणाने कपाशीचे उत्पादन दरवर्षी घटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे. नगदी पीक म्हणून समजले जाणारे उडीद, मूग पिकाने गतवर्षीच्या हंगामात दगा दिल्याने यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. सध्यस्थितीत शेती पिकांच्या आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. पिके बहरली आहेत; मात्र रोगराई तसेच किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी फवारणी करीत आहेत.

--------------------------

यावर्षीच्या खरीप हंगामाच्या प्रारंभीपासून पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. सध्याच्या परिस्थितीत पडत असलेला पाऊस उपयुक्त ठरत असून, पिके बहरली आहेत.

- सुनील मानकर, शेतकरी

----------------------

पावसाच्या सरीमुळे पिके बहरली आहेत. काही दिवसांपूर्वी पिके सुकण्याच्या मार्गावर होती, परंतु या पावसाने संजीवनी मिळाली आहे.

-शिवाजी म्हैसने, देगाव शेतकरी.

-----------------------------------

निंबा फाटा परिसरात पाऊस; पिकांना जीवदान

नया अंदुरा: कारंजा रमजानपूर, हाता, अंदुरा, अंत्री, शिंगोली, बहादुरा, कवठा, निंबा, मोखा, जानोरी, दगडखेड,निंबी, सागद या परिसरात पेरण्यांना उशीर झाल्याने पिके वर आल्यानंतर सतत पावसाने दांडी मारली होती. दोन ते तीन दिवसांपासून निंबा फाटा परिसरात पाऊस सुरू आहे. चांगल्या प्रमाणात पावसाचे आगमन झाले. त्यामुळे हा पाऊस पिकांना वरदान ठरत आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, ज्वारी, तुर, उडीद, मूग पिकांचा पेरा केलेला आहे; परंतु पाऊस पाहिजे त्या प्रमाणात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सामोरे जात आहेत. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरा केलेला होता; मात्र या पिकांना लागलेला खर्चसुद्धा निघाला नाही. या वर्षी तीच परिस्थिती ओढावते की काय या विवंचनेत शेतकरी आहे. पावसाने २० दिवसांपासून खंड दिल्याने शेतकऱ्यांनी - खुरपणी, टवरणी, वखरणी, खते देणे इत्यादी कामे आटोपून घेतली. आता पावसाने हजेरी लावल्यामुळे निंबा फाटा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.