शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

खारपानपट्टयातील तेलकट पाण्याची चौकशी करा!

By admin | Updated: May 25, 2016 02:14 IST

अकोला जिल्हा परिषद जलव्यस्थापन समितीच्या सभेत मागणी

अकोला: खारपानपट्टयातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ३५ गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये काही टँकरव्दारे तेलकट पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी मंगळवारी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत करण्यात आली. भीषण पाणीटंचाईच्या परिस्थितीत खारपानपट्टयातील अकोला तालुक्यातल्या खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ५५ गावांपैकी ३५ गावांना खासगी टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्यामध्ये काही टँकर तेल वाहतूक करणारे असल्याने, ग्रामस्थांना तेलकट पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. यासंबधीचे वृत्त सोमवार, २३ मे रोजी ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित झाले होते. यया वृत्ताची दखल घेत, जिल्हा परिषद सदस्य सरला मेश्राम यांनी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत खारपानपट्टयात काही टँकरव्दारे तेलकट पाणी मिळत असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. टकरव्दारे पाणीपुरवठयात तेलकट पाण्याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी सभेत केली. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गुडधी येथे शौचालय बांधकामांसाठी खड्डे करण्यात आले असून, पावसाळा सुरु होण्यापूर्वी शौचालयांची कामे पूर्ण करण्याची मागणीही सदस्य सरला मेश्राम यांनी सभेत केली. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, दुष्काळी गावांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी व इतर सवलती जाहीर करण्यात आल्या; मात्र याबाबतची अंमलबजावणी होत नसल्याचा मुद्दा सदस्य गोपाल कोल्हे यांनी सभेत उपस्थित केला.