शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
2
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
3
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
4
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
5
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
6
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
7
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
8
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
9
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
10
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
11
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
12
आजचा अग्रलेख: पुन्हा गोंधळात गोंधळ!
13
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
14
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
15
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
16
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
17
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
18
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
19
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
20
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलींच्या लग्नकार्यासाठी पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:15 IST

बाळापूर : दुष्काळ, नापिकी वा कर्जबाजारी झाल्याने पिचलेला शेतकरी क्षणार्धात जीवन संपविताे, मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांसमाेर समस्यांचा डाेंगर ...

बाळापूर : दुष्काळ, नापिकी वा कर्जबाजारी झाल्याने पिचलेला शेतकरी क्षणार्धात जीवन संपविताे, मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांसमाेर समस्यांचा डाेंगर उभा राहताे. त्यांच्या मुलींच्या विवाहाचा माेठा प्रश्न समाेर उभा राहताे. काही दानशूरांच्या पुढाकाराने हा प्रश्नही सुटताे. अशाच प्रकारे आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलींच्या लग्नकार्यासाठी बाळापूर येथील मुरलीधर राऊत यांनी पुढाकार घेतला असून, माेफत मंगल कार्यालय व पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्थेचा भारही उचलण्याचा संकल्प करून ते सामाजिक दायित्व निभवत आहेत.

आत्महत्येसारख्या सामाजिक दुर्घटनेनंतर मदतीसाठी घेतलेल्या या पुढाकारामुळे शेतकरी कुटुंबीयांना माेठा दिलासा मिळाला आहे. बाळापूर येथील ‘मराठा’ हाॅटेलचे संचालक असलेल्या मुरलीधर राऊत यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी पाहुण्यांच्या जेवणासह हाॅल व लाॅन्सची माेफत सेवा देण्याचे जाहीर केले आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. आत्महत्याग्रस्त मुलींच्या विवाह साेहळ्यासाठी ते कार्यवाहक बनले आहेत. तसेच इतर आर्थिक संकटात असलेल्यांच्याही कुटुंबातील लग्नसाेहळ्यासाठी ते अल्पदरात भाेजन उपलब्ध करून देतात. नव्याने तयार केलेल्या त्यांच्या हाॅटेलमध्ये त्यांनी दहा हजार स्क्वेअर फुटांचा लाॅन, खाेल्या, सभागृह उभारले आहे. हे सर्व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी विनामूल्य उपलब्ध करून देणार आहेत. शेतकऱ्यांच्या लेकीच्या लग्नकार्यासाठी पुढाकार घेतल्याचे पाेस्टर राउत यांनी समाजमाध्यमात पाेहाेचविले आहे.

अशी केली सेवाभावी कार्याची सुरुवात

राऊत यांचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ वर बाळापूर येथे ‘मराठा’ हाॅटेल आहे. काही वर्षांपूर्वी या महामार्गासाठी जमीन अधिग्रहित केली हाेती. त्यावेळी त्यांचे हाॅटेलही ताेडण्यात आले हाेते. त्यांनी नव्याने हाॅटेलची उभारणी केली. महामार्गासाठी जमीन गेल्याने शासनाने माेबदला दिला. या माेबदल्याच्या रकमेपैकी काही रक्कम त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नकार्यावर खर्च करण्याचे ठरविले. त्यातूनच ते अशा कुटुंबातील मुलींचे लग्न विनामूल्य करून देणार आहेत.

------------------

पंतप्रधानांनी घेतली हाेती कार्याची दखल

राऊत यांनी नाेटबंदीच्या काळात महामार्गावरून जाणाऱ्यांना जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली हाेती. त्यांचा हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात उल्लेख केला हाेता. त्यानंतर राऊत यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले हाेते.

------------------

समाजात वावरत असताना वंचित घटकांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना अनेक संकटांचा सामना करावा लागताे. याची जाणीव असल्यामुळे मी सामाजिक दायित्चाच्या भूमिकेतून मी आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलींच्या लग्नकार्याची जबाबदारी घेतली आहे.

-मुरलीधर राऊत, बाळापूर