शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलींच्या लग्नकार्यासाठी पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:15 IST

बाळापूर : दुष्काळ, नापिकी वा कर्जबाजारी झाल्याने पिचलेला शेतकरी क्षणार्धात जीवन संपविताे, मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांसमाेर समस्यांचा डाेंगर ...

बाळापूर : दुष्काळ, नापिकी वा कर्जबाजारी झाल्याने पिचलेला शेतकरी क्षणार्धात जीवन संपविताे, मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांसमाेर समस्यांचा डाेंगर उभा राहताे. त्यांच्या मुलींच्या विवाहाचा माेठा प्रश्न समाेर उभा राहताे. काही दानशूरांच्या पुढाकाराने हा प्रश्नही सुटताे. अशाच प्रकारे आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलींच्या लग्नकार्यासाठी बाळापूर येथील मुरलीधर राऊत यांनी पुढाकार घेतला असून, माेफत मंगल कार्यालय व पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्थेचा भारही उचलण्याचा संकल्प करून ते सामाजिक दायित्व निभवत आहेत.

आत्महत्येसारख्या सामाजिक दुर्घटनेनंतर मदतीसाठी घेतलेल्या या पुढाकारामुळे शेतकरी कुटुंबीयांना माेठा दिलासा मिळाला आहे. बाळापूर येथील ‘मराठा’ हाॅटेलचे संचालक असलेल्या मुरलीधर राऊत यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी पाहुण्यांच्या जेवणासह हाॅल व लाॅन्सची माेफत सेवा देण्याचे जाहीर केले आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. आत्महत्याग्रस्त मुलींच्या विवाह साेहळ्यासाठी ते कार्यवाहक बनले आहेत. तसेच इतर आर्थिक संकटात असलेल्यांच्याही कुटुंबातील लग्नसाेहळ्यासाठी ते अल्पदरात भाेजन उपलब्ध करून देतात. नव्याने तयार केलेल्या त्यांच्या हाॅटेलमध्ये त्यांनी दहा हजार स्क्वेअर फुटांचा लाॅन, खाेल्या, सभागृह उभारले आहे. हे सर्व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी विनामूल्य उपलब्ध करून देणार आहेत. शेतकऱ्यांच्या लेकीच्या लग्नकार्यासाठी पुढाकार घेतल्याचे पाेस्टर राउत यांनी समाजमाध्यमात पाेहाेचविले आहे.

अशी केली सेवाभावी कार्याची सुरुवात

राऊत यांचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ वर बाळापूर येथे ‘मराठा’ हाॅटेल आहे. काही वर्षांपूर्वी या महामार्गासाठी जमीन अधिग्रहित केली हाेती. त्यावेळी त्यांचे हाॅटेलही ताेडण्यात आले हाेते. त्यांनी नव्याने हाॅटेलची उभारणी केली. महामार्गासाठी जमीन गेल्याने शासनाने माेबदला दिला. या माेबदल्याच्या रकमेपैकी काही रक्कम त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नकार्यावर खर्च करण्याचे ठरविले. त्यातूनच ते अशा कुटुंबातील मुलींचे लग्न विनामूल्य करून देणार आहेत.

------------------

पंतप्रधानांनी घेतली हाेती कार्याची दखल

राऊत यांनी नाेटबंदीच्या काळात महामार्गावरून जाणाऱ्यांना जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली हाेती. त्यांचा हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात उल्लेख केला हाेता. त्यानंतर राऊत यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले हाेते.

------------------

समाजात वावरत असताना वंचित घटकांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना अनेक संकटांचा सामना करावा लागताे. याची जाणीव असल्यामुळे मी सामाजिक दायित्चाच्या भूमिकेतून मी आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलींच्या लग्नकार्याची जबाबदारी घेतली आहे.

-मुरलीधर राऊत, बाळापूर