शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

‘प्लास्टिक मुक्ती’साठी सरसावले शासन; गावागावांतून करणार कचऱ्याची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 15:46 IST

खुल्या जागा, नाल्या, रस्त्यांवर पडलेला प्लास्टिक कचरा गोळा करून परिसर प्लास्टिकमुक्त केला जाणार आहे.

- सदानंद सिरसाटअकोला: जमिनीवर कुठेही पडून असलेला प्लास्टिक कचरा गोळा करून त्याचा रस्ता कामात वापर किंवा नष्ट करण्यासाठी शासनस्तरावर जोरकस प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी (महापालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत) प्लास्टिक गोळा करावे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून त्याची विल्हेवाट लावली जाईल, असे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्तांना शुक्रवारी दिले.प्लास्टिक कचºयामुळे व मायक्रो प्लास्टिकमुळे सागरी जीव, नदी-नाल्यातील जलचर व जैवविविधतेवर परिणाम होतो. शेती, वने या ठिकाणी प्लास्टिकमुळे उपयुक्त नैसर्गिक घटक व साधन संपत्तीचा ºहास होतो. त्याशिवाय, मानवी आरोग्यावरही भयंकर परिणाम होतो. त्यासाठी प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी गंभीरपणे करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी शासनाने २३ मार्च २०१८ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत प्लास्टिक बंदीसाठी कारवाईची जबाबदारी महापालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत आणि प्रदूषण नियंत्रण मंडळावर सोपवली. प्लास्टिक निर्मिती रोखण्याच्या मुद्यावर कारवाई करणेही गरजेचे आहे. त्याच वेळी सर्वत्र जमा झालेल्या प्लास्टिक कचºयाची विल्हेवाट लावणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यभरात एकाच वेळी प्लास्टिक कचरा गोळा करण्याची मोहीम श्रमदानातून राबवण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्तांनी तातडीने ती सुरू करावी, असेही बजावण्यात आले.

- कचºयाची उचल प्रदूषण मंडळ करणारप्रत्येक शहर, ग्रामपंचायत हद्दीतील खुल्या जागा, नाल्या, रस्त्यांवर पडलेला प्लास्टिक कचरा गोळा करून परिसर प्लास्टिकमुक्त केला जाणार आहे. गोळा केलेला प्लास्टिक कचरा उचलण्याची तसेच विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. मंडळाकडे असलेल्या नियोजनानुसार कचºयाचा वापर किंवा नष्ट केला जाणार आहे.

- प्रत्येक जिल्हा परिषद गटातून ४ टन कचराअकोला जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटातून १ ट्रक (४ टन) प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी शनिवारी सर्व जिल्हा परिषद, माध्यमिक, खासगी शाळांच्या परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. उद्या रविवारी सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, संस्था, ग्रामस्थांच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जाणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPlastic banप्लॅस्टिक बंदी