शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानांमधून निकृष्ट धान्याचा पुरवठा; सडक्या मक्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:19 IST

संजय उमक मूर्तिजापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या महाराष्ट्रात पंधरा दिवसांचा लॉकडाऊन शासनाने पुन्हा जाहीर केला आहे. याच पार्श्वभूमीवर ...

संजय उमक

मूर्तिजापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या महाराष्ट्रात पंधरा दिवसांचा लॉकडाऊन शासनाने पुन्हा जाहीर केला आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने सामान्य लोकांना मदत म्हणून रेशनवर धान्य पुरवठा करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला शासनाकडून अतिशय निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

ग्रामीण जनतेला सध्या रेशनवर गहू, तांदूळ व मका दिला जात आहे, त्यात मका अतिशय निकृष्ट असून, कुजलेला, सडलेला व किडलेला असल्याचे दिसून आले.

यासंदर्भात तक्रार करूनही त्याची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात सातत्याने निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित केले जात आहे. गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे सामान्य नागरिक आधीच मेटाकुटीला आला आहे, त्यामुळे त्यांना हे निकृष्ट धान्य घेतल्याशिवाय पर्याय नाही. शासनाकडूनच निकृष्ट दर्जाचे धान्य पुरविले जात असल्यामुळे नागरिकांवर सडके धान्य खाण्याची वेळ आली आहे.

कोरोनामुळे आधीच जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईमुळे सामान्य माणसाला जीवन जगणे कठीण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून रेशन दुकानात विक्रीसाठी आलेल्या गव्हात व मक्यात मोठ्या प्रमाणात खडे, माती व भेसळयुक्त व निकृष्ट दर्जा असल्याचे आढळून आले आहे. किमान रेशनवर मिळणारे धान्यतरी चांगल्या दर्जाचे मिळावे हीच ग्रामीण जनतेची अपेक्षा असून ग्रामीण भागातील रेशन दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप होत असल्याचे लक्षात आले आहे; परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने व त्यात प्रचंड महागाई असल्याने ग्रामीण जनता हतबल झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील कित्येक कुटुंबे रेशनच्या धान्यावरच उदरनिर्वाह करीत आहेत. गोरगरीब जनतेसाठी संजीवनी ठरत असलेल्या धान्यातच भेसळ होत असल्याने नागरिकांनी काय खावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र शासनाने यासंबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सामान्य जनतेची होत असलेली थट्टा थांबवावी, अशी मागणी होत आहे.

फोटो:

नागरिकांना अनेक दिवसांपासून भेसळयुक्त धान्याचे वाटप होत आहे. त्यातही मका व गहू अत्यंत निकृष्ट दर्जाचा मिळत असल्याने सामान्य नागरिकांनी सडके व कुजके धान्य खावे का, दर्जेदार धान्याचे वाटप नागरिकांना करण्यात यावे.

-शरद गवई, नागरिक खापरवाडा