शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

जीएमसीत कोविड रुग्णांना पुन्हा निकृष्ट दर्जाचे जेवण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:18 IST

दोन शब्दही कोणी धड बोलेना जेवणासोबतच येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे वागणेही धड नसल्याचे रुग्णांचे मत आहे. रुग्णांना चांगल्या दर्जाचे ...

दोन शब्दही कोणी धड बोलेना

जेवणासोबतच येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे वागणेही धड नसल्याचे रुग्णांचे मत आहे. रुग्णांना चांगल्या दर्जाचे जेवण आणि चांगली वागणूक मिळाल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो, मात्र येथे दोन शब्दही कोणी धड बोलत नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.

बाहेरगावच्या रुग्णांवर उपासमारीची वेळ

सर्वोपचार रुग्णालयातील जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याने स्थानिक रुग्ण घरून जेवणाचा डबा बोलावत आहेत, मात्र शहराबाहेरील जे रुग्ण येथे दाखल आहेत त्यांना नाईलाजाने हेच जेवण घ्यावे लागत आहे. ज्येष्ठांना पोळ्या चावणेही कठीण होत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

मी स्वत: कोविड रुग्ण म्हणून सर्वोपचार रुग्णालयात दाखल आहे. या ठिकाणी रुग्णांसोबत उद्धटपणे बोलण्यात येत आहे. गृह विलगीकरणाचाही प्रस्ताव मान्य करण्यात येत नाही. जेवण निकृष्ट दर्जाचे असून त्यातील दाळही शिजलेली नसते, तर पोळ्या खाणेही कठीण आहे. अशा वातावरणात रुग्ण बरा होण्या ऐवजी आणखी आजारी होण्याची जास्त भीती आहे.

आशिष सावळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रुग्णसेवक संघटना, अकोला

जीएमसीबद्दल आजपर्यंत फक्त ऐकले होते, आता मात्र प्रत्यक्षात अनुभव घेत आहे. येथील व्यवस्था चांगली आहे, पण स्वच्छता गृहात पाणी नाही. निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या रुग्णांना उपाशी राहण्याची वेळ. वयस्क लोकांना अर्धवट शिजलेली डाळ, पोळ्याही चावणे कठीण आहेे. अन्नात कस नाही. जेवण चांगले दिल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.

- वर्षा धनोकार, सदस्य, अभ्यंगत समिती, जीएमसी