लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : चॅम्पियन्स ट्रॉफीत रविवारी झालेल्या क्रिकेटच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला तब्बल १२४ धावांनी लोळवत आयसीसीच्या या स्पर्धेची सुरुवात झोकात केली. या विजयाचा अकोला शहरासह जिल्हाभर मोठय़ा उत्साहात जल्लोष करण्यात आला.शहराच्या विविध भागांमधून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे फटाक्यांची आतषबाजी करून आपला आनंद व्यक्त केला. तब्बल तासभर फटाक्यांचे आवाज येत होते, तसेच नागरिकांनी आतषबाजीने केली. अनेक चौकांमध्ये तरुण एकत्र येत आजच्या सामन्यावर चर्चा करताना दिसून आले.
भारताच्या विजयाचा अकोल्यात जल्लोष!
By admin | Updated: June 5, 2017 02:09 IST