शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भारत राखीव बटालियन उदेगाव येथेच ; भरती प्रकिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 10:59 IST

विशेष म्हणजे १७६ पदांसाठी असलेली भरती केवळ गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व अहेरी तालुक्यातील उमेदवारांसाठीच राखीव ठेवण्यात आली आहे.

अकोला : तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर शिवारात होणाऱ्या भारत राखीव बटालियन तेल्हाराऐवजी अकोल्यातील शिसा उदेगाव व हिंगणा शिवारात करण्याबाबत ७ आॅगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला होता. या निर्णयावरून विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अकोट मतदारसंघातील राजकारण चांगलेच तापले. सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले. या मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी सारी राजकीय ताकद पणाला लावून मंत्रिमंडळाचा निर्णय फिरविला अन् ही बटालियन पूर्ववत तेल्हाºयातच होईल, असे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पत्रही दिले होते; मात्र आता या बटालियनसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे १७६ पदांसाठी असलेली भरती केवळ गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व अहेरी तालुक्यातील उमेदवारांसाठीच राखीव ठेवण्यात आली आहे.या भारत राखीव बटालियनबाबत राजकारण तापल्यावरही १३ सप्टेंबर रोजी शासनाच्या गृह विभागाने काढलेल्या शासन निर्णयात तेल्हाºयाच्या तळेगाव वडनेरऐवजी अकोल्याच्या शिसा उदेगावचाच उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर भरती कोणत्याही नावाने झाली तरी ही बटालियन तेल्हाºयातच होईल, असा विश्वास तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिला होता. आता भाजपचे सरकारच अस्तित्वात आलेले नसल्याने या बटालियनबाबत काय निर्णय होतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले असतानाच भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी ७५ टक्के पदे ही गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांमधून तर उर्वरित २५ टक्के पदे ही चंद्रपूर, गोंदिया जिल्हा व अहेरी तालुक्यामधील उमेदवारांकडूनच भरली जाणार आहेत.भारत राखीव बटालियन हा कॅम्प तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर शिवारात होणार होता. यासाठी २०० एकर जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असतानाच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते स्थळ बदलून हा कॅम्प शिसा उदेगाव शिवारात मंजूर करण्यात आला होता. राज्यात यापूर्वी तीन ठिकाणी भारत राखीव बटालियन स्थापन करण्यात आली असून, या बटालियनद्वारे कायदा-सुव्यवस्था आणखी प्रभावीपणे सांभाळण्यास मदत होत आहे. ही बाब लक्षात घेता, राज्यात दोन अतिरिक्त बटालियन स्थापन करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे करण्यात आली होती. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात कोर्टी मोक्ता येथे भारत राखीव बटालियन क्र.४ आणि अकोला जिल्ह्यातील अकोला तालुक्यात शिसा उदेगाव व हिंगणा शिवार येथे भारत राखीव बटालियन क्र.५ ची निर्मिती करण्यात येणार आहे. या सर्व कॅम्पसाठी पदांची भरती करण्याकरिता शासन निर्णय आवश्यक होता. त्यामुळे विभागाने ६७२ पदांच्या भरतीसाठी १६३ कोटी ४५ लाख ५८ हजार ४८६ रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय १२ सप्टेंबर रोजी काढला होता. दरम्यान, कॅम्पसाठी जागेच्या निर्णयाबाबत शासनाने सुधारित आदेश काढलेले नसल्याने नवा आदेश हा तळेगावचा निघतो की शिसा उदेगावचा, याबाबत संभ्रमच आहे.

टॅग्स :Akolaअकोला