शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

भारत राखीव बटालियन उदेगाव येथेच ; भरती प्रकिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 10:59 IST

विशेष म्हणजे १७६ पदांसाठी असलेली भरती केवळ गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व अहेरी तालुक्यातील उमेदवारांसाठीच राखीव ठेवण्यात आली आहे.

अकोला : तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर शिवारात होणाऱ्या भारत राखीव बटालियन तेल्हाराऐवजी अकोल्यातील शिसा उदेगाव व हिंगणा शिवारात करण्याबाबत ७ आॅगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला होता. या निर्णयावरून विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अकोट मतदारसंघातील राजकारण चांगलेच तापले. सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले. या मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी सारी राजकीय ताकद पणाला लावून मंत्रिमंडळाचा निर्णय फिरविला अन् ही बटालियन पूर्ववत तेल्हाºयातच होईल, असे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पत्रही दिले होते; मात्र आता या बटालियनसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे १७६ पदांसाठी असलेली भरती केवळ गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व अहेरी तालुक्यातील उमेदवारांसाठीच राखीव ठेवण्यात आली आहे.या भारत राखीव बटालियनबाबत राजकारण तापल्यावरही १३ सप्टेंबर रोजी शासनाच्या गृह विभागाने काढलेल्या शासन निर्णयात तेल्हाºयाच्या तळेगाव वडनेरऐवजी अकोल्याच्या शिसा उदेगावचाच उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर भरती कोणत्याही नावाने झाली तरी ही बटालियन तेल्हाºयातच होईल, असा विश्वास तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिला होता. आता भाजपचे सरकारच अस्तित्वात आलेले नसल्याने या बटालियनबाबत काय निर्णय होतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले असतानाच भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी ७५ टक्के पदे ही गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांमधून तर उर्वरित २५ टक्के पदे ही चंद्रपूर, गोंदिया जिल्हा व अहेरी तालुक्यामधील उमेदवारांकडूनच भरली जाणार आहेत.भारत राखीव बटालियन हा कॅम्प तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर शिवारात होणार होता. यासाठी २०० एकर जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असतानाच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते स्थळ बदलून हा कॅम्प शिसा उदेगाव शिवारात मंजूर करण्यात आला होता. राज्यात यापूर्वी तीन ठिकाणी भारत राखीव बटालियन स्थापन करण्यात आली असून, या बटालियनद्वारे कायदा-सुव्यवस्था आणखी प्रभावीपणे सांभाळण्यास मदत होत आहे. ही बाब लक्षात घेता, राज्यात दोन अतिरिक्त बटालियन स्थापन करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे करण्यात आली होती. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात कोर्टी मोक्ता येथे भारत राखीव बटालियन क्र.४ आणि अकोला जिल्ह्यातील अकोला तालुक्यात शिसा उदेगाव व हिंगणा शिवार येथे भारत राखीव बटालियन क्र.५ ची निर्मिती करण्यात येणार आहे. या सर्व कॅम्पसाठी पदांची भरती करण्याकरिता शासन निर्णय आवश्यक होता. त्यामुळे विभागाने ६७२ पदांच्या भरतीसाठी १६३ कोटी ४५ लाख ५८ हजार ४८६ रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय १२ सप्टेंबर रोजी काढला होता. दरम्यान, कॅम्पसाठी जागेच्या निर्णयाबाबत शासनाने सुधारित आदेश काढलेले नसल्याने नवा आदेश हा तळेगावचा निघतो की शिसा उदेगावचा, याबाबत संभ्रमच आहे.

टॅग्स :Akolaअकोला