शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेतीत महिलांचा वाढता सहभाग प्रेरणादायी

By admin | Updated: March 22, 2017 02:38 IST

कृषी विद्यापीठात महिला दिन; विदर्भातील कर्तबगार महिलांच्या सत्कारप्रसंगी स्मिता कोल्हेंचे प्रतिपादन.

अकोला, दि. २१-आधुनिकीकरणाचा स्वीकार केलेल्या आपल्या देशात ग्रामीण आणि शहरी जीवनमान विसंगत होत असून, ग्रामीण भागाच्या विकासासाठी महिलांच्या सक्षमिकरणासोबतच कौशल्यवृद्धी साधने काळाची गरज असल्याचे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे यांनी मंगळवारी येथे केले. शेती व्यवसायातील महिलांचा वाढता सहभाग प्रेरणादायी असल्याचे त्या म्हणाल्या.डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, आर्थिक विकास महामंडळ, कृषी विज्ञान केंद्र आणि रिलायंस फाउंडेशनच्यावतीने मंगळवारी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कृषी विद्यापीठाच्या डॉ.के.आर.ठाकरे सभागृहात विदर्भातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.पंदेकृविचे कुलगुरू डॉ.रविप्रकाश दाणी यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र कोल्हे, समाजसेविका अँड. ललिता पाटील, श्याम पाटील खान्देश, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले,महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वर्षा खोब्रागडे,हास्य कवी अँड अनंत खेळकर,डॉ.उमेश ठाकरे, विजय बारापात्रे,गणेश देशमुख डॉ.पंदेकृविचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे आदींची उपस्थिती होती.डॉ.कोल्हे यांनी महिला करीत असलेल्या प्रेरणादायी कार्यासोबतच आदिवासीबहुल भागातील महिलांची प्रेरणादायी उदाहरणे येथे मांडली.आदिवासी भागात महिलांना आजही पुरुषांबरोबरीचे स्थान आहे.पंचायतीमध्ये महिलांचा सहभाग हे अधोरेखित करतो.शहरी भागात वृद्धाश्रमांची व्याप्ती वाढत असताना आदिवासी भागात याचा लवलेश नाही.एकही वृद्धाश्रम नाही. कुटुंबात वृद्धांना महत्त्वाचे स्थान आहे. आदिवासी संस्कृती प्रेरणादायी असल्याचे त्या म्हणाल्या.आदिवासी भागात काम करण्यापूर्वी माझ्या पतीने चार अटी घातल्या होत्या. त्यामध्ये कुटुंबाचा गाडा हाकताना त्यामध्ये बडेजाव नको, अर्थात खर्चाला लगाम ही एक अट होती.आदिवासी भागात गेल्यावर मला हे शिकता आले. महिलांमध्ये उपजतच बचतीचा गुण आहे.तो आदिवासी महिला कशा सत्कारणी लावतात, हे मी अनुभवले असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी संस्कृती दिशादर्शक आहे. तेथे आजही मुलींना तेवढेच स्थान आहे. गर्भात तिची हत्या केली जात नाही, हे पुढारलेल्या समाजापुढे मोठे उदाहरण असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले. ग्रामीण कष्टकरी, कामकरी महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत स्त्री-पुरुष समानता साधने व दोहोंनी मिळून परिवार सावरणे गरजेचे आहे, असे सांगताना शहरी आणि ग्रामीण भारतातील आर्थिक, सामाजिक दुरी स्पष्ट करताना शेती आणि शेतीपूरक व्यवसायात महिलांनी आता पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी उपस्थित महिलांना आवर्जून सांगितले.आर्थिक संपन्न स्त्रीच परिवाराला आणि समाजाला सावरू शकते, हे आजच्या सत्कारमूर्तींनी आपल्या कृतीतून दाखवून दिले, असे गौरोद्गारअमळनेर येथील अँड. ललिता पाटील यांनी आपल्या मनोगतात केले. महिला समाजात आणि आईच्या पोटातही सुरक्षित नाही, हे मोठं शल्य आहे, त्यासाठी महिलांनी सक्षम होणं तद्वतच स्वत:च्या पायावर उभे राहावे, असे आवाहन केले. शेती आणि तत्सम क्षेत्रात आता महिलांनी पुढाकार घेतला असून, कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने स्वयंरोजगार आणि कौशल्यप्राप्तीमध्ये समाधानकारक वृद्धी होत असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.सत्कार सोहळ्यात विदर्भातील एकूण १७ महिलांचा कार्यगौरव करण्यात आला. यामध्ये बुलडाणा येथील अलका निर्मळ, शेगाव येथील सुवर्णा फुंडकर, अकोला येथील अनुराधा ठाकरे, मंगरूळपीर येथील सोनाली राऊत, पोही येथील वंदना मुळे, अकोला येथील पौर्णिमा घटाले, माला गिरी, यवतमाळ जिल्ह्यातील वंदना नेताम, अमरावती जिल्ह्यातील पद्मशिला तिरपुडे, वाशिम तेथील विमल राजगुरू, वर्धा जिल्ह्यातील रूपाली पाटील, अकोला येथील प्रणाली सातारकर, कळंब येथील वंदना दिगंबर, गडचिरोली येथील संगीता कुथे, बाळापूर येथील वंदना वाकोडे, अकोट येथील सुनीता चांदेलकर, बुलडाणा येथील जनाबाई गोरे आदींचा समावेश होता. अलका निर्मळ यांचा व पोलीस निरीक्षक पदमीनी तिरपुडे यांचा संघर्ष प्रेरणादायी आहे. अलका निर्मळ यांच्या दिव्यांग मुलांच्या चारचाकी वाहनासाठी युवाराष्ट्रचे धनजंय मिश्रा, डॉ. नीलेश पाटील व अविनाश नाकट यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश दिला. डॉ.पंजाबराव देयमुख कर्मचारी पथसंस्थेच्यावतीने डॉ. विनोद ढोरे यांनी ३२ हजार तर गणेश देशमुख यांनी वाहन खरेदीचा संपूर्ण खर्च देण्याची घोषणा केली.