शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

राज्यात महिला अत्याचारात वाढ

By admin | Updated: December 3, 2014 23:37 IST

प्रमुख ९ महानगरांची स्थिती विदारक.

अजय डांगे/अकोलापुरोगामी महाराष्ट्रात महिला अत्याचारात वाढ झाल्याचे गत वर्षभरातील आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. सन २0१२च्या तुलनेत २0१३ मध्ये छेडखानीच्या गुन्ह्यात ११0 टक्के, बलात्कार- ६६ टक्के, महिला व तरुणींचे अपहरण-८५.९६ टक्के आणि लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात ८१.१७ टक्के वाढ झाली आहे. दिल्ली येथे घडलेल्या ह्यनिर्भयाह्ण प्रकरणानंतर महिलांवर अत्याचार करणार्‍यांना जन्माची अद्दल घडावी, यासाठी सरकारने कायद्यामध्ये सुधारणा केल्या; मात्र तरीही महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी झाले नसल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील औरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पूणे, सोलापूर, ठाणे या पोलिस आयुक्तालय असलेल्या प्रमुख महानगरांत २0१३मध्ये महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात सन २0१२च्या तुलनेने २0१३ मध्ये वाढ झाल्याचे आकडेवर नजर टाकल्यास दिसून येते. बलात्काराचे गुन्हे २0१२मध्ये ६0५ तर २0१३मध्ये १ हजार ९ घडले. २0१२ मध्ये महिला व तरुणींच्या अपहरणाचे गुन्हे ४१३ तर २0१३ मध्ये ७६८ गुन्हे घडले. २0१२मध्ये छेडखानीचे १ हजार २८४ तर सन २0१३मध्ये २ हजार ६९९ गुन्ह्यांची नोंद झाली. २0१२मध्ये लौंगिक शोषणाचे ४९४ तर २0१३मध्ये ८९५ गुन्हे दाखल करण्यात आले. पती व नातेवाईकांकडून विवाहितेच्या छळाचेही प्रमाण वाढले असून, २0१२मध्ये १ हजार ८४ तर २0१३मध्ये २ हजार १५९ गुन्हे दाखल करण्यात आले. २0१२ मध्ये हुंडाबळीचे गुन्हे ४२ तर २0१३मध्ये ७१ घडले होते. महिलांवरील अत्याचार कमी होण्यासाठी सामाजिक, पुरुषी मानसिकता बदलणे आवश्यक आहे. अत्याचार थांबण्यासाठी प्रत्येक समाजघटकाने प्रबोधन करणे आणि जबाबदारीने वागणेही गरजेचे असल्याचे मत राज्य महिला आयोगाच्या सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी लोकमतशी बोलताना नोंदविले.*सर्वच गुन्ह्यांमध्ये वाढ४औरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पूणे, सोलापूर, ठाणे या पोलिस आयुक्तालय असलेल्या प्रमख महानगरांमध्ये २0१२च्या तुलनेत २0१३मध्ये सर्वच गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. २0१२ मध्ये या महानगरांमध्ये ७९ हजार १४८, तर २0१३मध्ये ८८ हजार ८२२ दखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. दोन वर्षात गुन्ह्यांमध्ये १२. २२ टक्के वाढ झाली. खुनाचा प्रयत्न- ८.३१ टक्के, दरोडा-११.५६, लुटमार-५0.७0, चोरी-१.४५, दंगल-५.५४ आणि फसवणुकीचे गुन्ह्यांमध्ये १४.४१ टक्के वाढ झाली. खुनाच्या गुन्ह्यामध्ये मात्र ७.१४ टक्क्यांनी घट झाली.