शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

विदर्भात तापमानात वाढ; पिके कोमेजली

By admin | Updated: August 25, 2015 01:50 IST

पावसाचा पुन्हा खंड, शेतकरी हवालदील.

अकोला : राज्यात दुसर्‍यांदा पावसाचा खंड पडला असून, खरीप हंगामातील पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. विदर्भात पावसाचा खंड तर पडलाच, शिवाय तापमानातही वाढ झाल्याने पिके कोमेजू लागली आहेत. या आठवड्यात पाऊस न आल्यास फळधारणेवर आलेली पिके हातची जाण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. राज्यात ९३ टक्के क्षेत्रावर, म्हणजेच १ कोटी १५ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर शेतकर्‍यांनी विविध पिकांची पेरणी केली; पण जून महिन्याच्या पावसानंतर दीड महिना दडी मारल्याने पिकांना अगोदरच फटका बसला होता. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला दोन दिवस पाऊस आला, त्यानंतर पुन्हा २0 दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने दुष्काळाचे सावट कायम आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसाचे स्वरू प सार्वत्रिक नव्हते. त्यानंतर तापमानात वाढ झाली असून, या तापमानाने पुन्हा जमीन भेगाळली आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटलेलीच आहे. विदर्भातील शेतकर्‍यांनी जून महिन्यात कापूस, सोयाबीन, कडधान्य, गळीत, तृणधान्य व धान पिकांची जवळपास ४५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली आहे. जून महिन्यात पेरणी केलेल्या काळ्य़ा, भारी जमिनीतील पिकांना ऑगस्ट महिन्यातील पावसाने दिलासा दिला. या पिकांची वाढ जरी कमी असली तरी सध्या सोयाबीनला फुलोरा व शेंगा येत आहेत, तर कापसाला पात्या, फुले धरली आहेत. शेंगा व बोंडे परिपक्व होण्यासाठी याचवेळी पावसाची नितांत गरज आहे; पण गत वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने या पिकांनी माना टाकल्या आहेत. २0 जुलै व ऑगस्ट महिन्यात पेरणी केलेल्या पिकांनासुद्धा या पावसाच्या खंडाचा फटका बसत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील स्थिती गंभीर आहे. पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ात आतापर्यंंत ५0८. ९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीच्या ४ टक्के कमी असला तरी हा पाऊस केवळ चार दिवस पडला. पावसाचे दिवस २२ असले तरी इतर दिवशी तुरळक स्वरू पाचाच पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्‍यांना चांगल्या दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.